शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील चुरशीच्या लढतीत आणखी एक ट्विस्ट; शेवटच्या दिवशी नवा उमेदवार मैदानात!
2
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
3
"काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
4
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
5
कोविशील्ड लसीचे नेमके किती दुष्परिणाम?; कोरोना काळातील 'सुपरमॅन'ने सांगितलं 'सत्य'
6
"टीएमसी बंगालचे नाव खराब करत आहे", नरेंद्र मोदींचा ममता सरकारवर हल्लाबोल
7
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
8
अमिताभ बच्चन यांची एक पोस्ट अन् भाजप-ठाकरे गटात रंगलं ट्विटर वॉर, नेमकं काय घडलं ?
9
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
10
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
11
MRF Share Price: एमआरएफ देणार आतापर्यंतचा सर्वाधिक डिविडंड, मोठ्या विक्रीमुळे शेअर्स ४ टक्क्यांपर्यंत घसरले
12
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
13
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
14
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
15
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
16
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
17
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
18
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
19
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
20
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!

कणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2020 7:53 PM

Bjp, pravin darekar, Farmer, sindhudurgnews सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.

ठळक मुद्देकणकवलीत परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीची पाहणीसरकारकडून शेतकऱ्यांची थट्टा : प्रवीण दरेकर

कणकवली : सरकारने शेती नुकसानीसाठी जाहीर केलेले पॅकेज अत्यंत तुटपुंजे आहे. कोकणातील शेतकरी अवकाळी पावसाच्या संकटात पुरता उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र पॅकेजची सरकारने घोषणा करावी. तसेच ठाकरे सरकारने कोकणातील शेतकऱ्यांची थट्टा केली आहे, असा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे.सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर आलेल्या प्रवीण दरेकर यांनी ओसरगाव, वागदे आदी भागातील अवकाळी व परतीच्या पावसाने नुकसान झालेल्या भातशेतीच्या नुकसानीची शेताच्या बांधावर जाऊन रविवारी प्रत्यक्ष पाहणी केली. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधत पंचनामे झाले काय? याबाबत विचारपूस केली.यावेळी आमदार नीतेश राणे, प्रसाद लाड, भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत, जिल्हा परिषद सदस्या सायली सावंत, कणकवली तहसीलदार रमेश पवार, कृषी अधिकारी, गटविकास अधिकारी आदी उपस्थित होते.शासनावर कडाडून टीका करताना दरेकर म्हणाले, शासनाने निकष शिथिल करून, स्वतंत्र तरतूद करून कोकणाला शेती नुकसानीसाठी वेगळे पॅकेज द्यावे. या सरकारमध्ये योजनाचा अभाव आहे. निसर्ग चक्रीवादळातील ६० टक्के मदत अजूनही लोकांपर्यंत पोहोचलेली नाही. त्यामुळे अत्यंत बारकाईने नियोजन करून मदत सरकारला जनतेपर्यंत पोहोचवावी लागेल. तीन पक्षांच्या आघाडी सरकारमध्ये कोणाचाही कोणाला मेळ नाही, असेही दरेकर यांनी यावेळी सांगितले .यावेळी दरेकर यांनी वागदे, ओसरगाव येथील भातशेतीची पाहणी करीत तेथील शेतकऱ्यांशी संवाद साधला. यावेळी भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणारयावेळी प्रवीण दरेकर म्हणाले, आम्हांला वाटले होते की सरकार शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देताना भरीव मदत करेल. मात्र, सरकारने १० हजार रुपयांची जी मदत केलेली आहे, ती अत्यंत तुटपुंजी आहे. कारण पश्चिम महाराष्ट्रात ५ एकरच्या वर शेती बागायती आहेत. तिथले शेतकरी बऱ्यापैकी सधन आहेत.कोकणात जास्तीत जास्त ४० गुंठ्यांपर्यंत शेती आहे. १० हजार हेक्टरी पकडले तर येथील शेतकऱ्याला गुंठ्याला १०० रुपये मिळणार आहेत. याचाच अर्थ १० गुंठे शेती असेल त्याला १ हजार रुपये मिळणार आहेत. ही शेतकऱ्याची थट्टा आहे. कारण त्याला कापणीचा खर्चच तेवढा येणार आहे.पाचशे, हजार रुपये देऊन थट्टा कसली करता?१० हजार कोटींमधले ५ हजार ५०० कोटी फक्त शेतीसाठी आहेत. बाकी ३०० कोटी नगरविकासला आहेत. उर्जा विभागाला २३९ कोटी आहेत. रस्ते, पुलांसाठी २६०० कोटी रुपये आहेत. अशाप्रकारे हिशेब घातला तर गुंठ्याला फक्त ५ हजार ५०० कोटींतून ५५ रुपये येत आहेत. त्यामुळे तुम्ही असे पाचशे, हजार रुपये देऊन कशाला शेतकऱ्याची थट्टा करता? असा प्रश्न त्यांनी यावेळी विचारला. 

टॅग्स :BJPभाजपाpravin darekarप्रवीण दरेकरsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी