शहरं
Join us  
Trending Stories
1
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
2
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
3
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
4
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
5
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
6
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
7
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
8
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?
9
दादर रेल्वे स्टेशनवर धक्कादायक प्रकार! तरुणाने स्वत:वरच केला चाकूहल्ला.. घटना CCTVमध्ये कैद
10
'आपण मोठी चूक करतोय', भारतावर कर लादल्यामुळे माजी अमेरिकन मंत्र्यांची ट्रम्प सरकारवर टीका
11
"टीम इंडियावर कारवाई करायची नाही... BCCIकडून आलेला फोन"; माजी मॅच रेफरीच्या आरोपांमुळे खळबळ
12
अजानमुळे सोनू निगमने कॉन्सर्ट थांबवला, आधी कौतुक झाले मग आठवला जुना वाद, एका ट्वीटमुळे झालेला गोंधळ
13
कर्नाटकमध्ये संघावर निर्बंध, हायकोर्टाचा काँग्रेस सरकारला दणका, दिले असे आदेश 
14
सलमान खानने केलेलं लाँच, आता १० वर्षांनंतर प्रसिद्ध स्टारकिडने बॉलिवूडमधून घेतला संन्यास, चाहत्यांना धक्का!
15
लोकांत असंतोष, भारतात नेपाळसारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते: प्रकाश आंबेडकरांचा इशारा
16
Viral Video : हे कसं शक्य आहे? सील न फाडता उघडला आयफोनचा बॉक्स! व्हिडीओ बघून सगळेच शॉक्ड 
17
योगिता-सौरभनंतर 'आई कुठे काय करते' फेम अभिनेत्रीच्या संसारात आलं वादळ? एकमेकांना केलं अनफॉलो अन्....
18
देशी ‘कमांडो डॉग्स’ करणार भारतीय सीमेची संरक्षण; रामपूर-मुधोळ हाउंड BSF पथकात दाखल
19
फसवणूक अमेरिकेतील नागरिकांची, रॅकेट छत्रपती संभाजीनगरमध्ये; तब्बल ११६ जण ताब्यात
20
किडनी फेल नाही तर 'या' कारणामुळे झालं सतीश शाहांचं निधन, राजेश कुमारचा खुलासा

मुसळधार पावसानंतरही उष्णतेत वाढ, वातावरणातील बदलामुळे विविध आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:13 IST

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

कणकवली : कधी तापमान वाढते तर कधी कमी होते. कधी ढग दाटून येतात, तर कधी पावसाचा शिडकावा होतो. काही तासांत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे याचा त्रास सिंधुदुर्गवासीयांना होत आहे. त्यातच शनिवारी ३६ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढलेले असतानाच जिल्ह्यात ठिकठिकाणी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. काही प्रमाणात तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी पुन्हा तापमानात वाढ झाली. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात अधून मधून ढगाळ वातावरण असते. मात्र, असे दिवस वगळता पडलेल्या कडक उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कडक उन्हाचा सामना करत असताना तापमान अचानक वाढत असून मध्येच कमीदेखील होत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

शनिवारी, ११ मे रोजी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. जोराचा वारा वाहून पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे तापमान ३० अंश सेल्सिअसवर गेले. लगेच दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे शनिवारच्या पावसामुळे दिलासा मिळणे दूर राहून उलट रविवारी उकाडाच जास्त जाणवला.

रुग्णसंख्येत वाढ!उन्हाळा सुरू असूनही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्याबरोबर दमट हवेचा सामना करावा लागत आहे. जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते, तेव्हा आपल्या शरीरातही काही बदल होतात. यात डिहायड्रेशन होणे, उष्माघात होणे, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, ॲसिडिटी होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे असे आजार उद्भवत आहेत. दरम्यान, शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यातील जास्त रुग्ण उष्णतेबाबतच्या समस्येबाबत येत आहेत.जोरदार पावसाच्या सरी !कणकवलीसह जिल्ह्यातील काही भागात रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जोरदार वारा सुटला. त्यानंतर आकाशात विजा चमकू लागल्या काही वेळातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या, तर काही भागात तत्पूर्वी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला.

...असे होतंय कमी- जास्त तापमान!वाढत जाणारे तापमान आणि ढगाळ वातावरण यांचा परिणाम तापमानावर होत आहे. त्यामुळे कमान व किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानRainपाऊसHealthआरोग्य