शहरं
Join us  
Trending Stories
1
भर सभागृहात निशिकांत दुबे आणि वर्षा गायकवाड यांच्यात तू- तू मै मै!
2
भीक मागण्यासाठी पुण्यातून चिमुरडीचे अपहरण; तुळजापुरातील ५ जणांची टोळी गजाआड
3
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
4
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
5
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
6
"बबिताजींसोबत माझं शूटिंग असतं तेव्हा..."; 'तारक मेहता' फेम जेठालालने सांगितली 'मन की बात'
7
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
8
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
9
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
10
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
11
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
12
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
13
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
14
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
15
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
16
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
17
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
18
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
19
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
20
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!

मुसळधार पावसानंतरही उष्णतेत वाढ, वातावरणातील बदलामुळे विविध आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:13 IST

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

कणकवली : कधी तापमान वाढते तर कधी कमी होते. कधी ढग दाटून येतात, तर कधी पावसाचा शिडकावा होतो. काही तासांत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे याचा त्रास सिंधुदुर्गवासीयांना होत आहे. त्यातच शनिवारी ३६ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढलेले असतानाच जिल्ह्यात ठिकठिकाणी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. काही प्रमाणात तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी पुन्हा तापमानात वाढ झाली. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात अधून मधून ढगाळ वातावरण असते. मात्र, असे दिवस वगळता पडलेल्या कडक उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कडक उन्हाचा सामना करत असताना तापमान अचानक वाढत असून मध्येच कमीदेखील होत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

शनिवारी, ११ मे रोजी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. जोराचा वारा वाहून पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे तापमान ३० अंश सेल्सिअसवर गेले. लगेच दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे शनिवारच्या पावसामुळे दिलासा मिळणे दूर राहून उलट रविवारी उकाडाच जास्त जाणवला.

रुग्णसंख्येत वाढ!उन्हाळा सुरू असूनही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्याबरोबर दमट हवेचा सामना करावा लागत आहे. जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते, तेव्हा आपल्या शरीरातही काही बदल होतात. यात डिहायड्रेशन होणे, उष्माघात होणे, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, ॲसिडिटी होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे असे आजार उद्भवत आहेत. दरम्यान, शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यातील जास्त रुग्ण उष्णतेबाबतच्या समस्येबाबत येत आहेत.जोरदार पावसाच्या सरी !कणकवलीसह जिल्ह्यातील काही भागात रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जोरदार वारा सुटला. त्यानंतर आकाशात विजा चमकू लागल्या काही वेळातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या, तर काही भागात तत्पूर्वी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला.

...असे होतंय कमी- जास्त तापमान!वाढत जाणारे तापमान आणि ढगाळ वातावरण यांचा परिणाम तापमानावर होत आहे. त्यामुळे कमान व किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानRainपाऊसHealthआरोग्य