शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री माणिकराव कोकाटे नॉट रिचेबल; वकिलांनी उच्च न्यायालयातही केली कायदेशीर कोंडी, कधीही अटक होऊ शकते...
2
काँग्रेसचा 'हात' सुटला, आमदार प्रज्ञा सातव भाजपच्या वाटेवर; कार्यकर्ते मुंबईकडे रवाना
3
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
4
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
5
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
6
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
7
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
8
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
9
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
10
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
11
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
12
Yashasvi Jaiswal: यशस्वी जैस्वालची प्रकृती अचानक बिघडली, तातडीने रुग्णालयात दाखल, काय झालं?
13
कल्याणमध्ये मनसेला मोठा धक्का; एकाचवेळी २ नेत्यांचा राजीनामा, भाजपात प्रवेशाची चर्चा
14
एपस्टीन सेक्स स्कँडल: जगभरातील नेत्यांची झोप उडाली! दोन दिवस उरले, भारतीय नेत्यांचेही नाव?
15
BJP vs MVA: तुळजापुरात भाजप-मविआच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा; काग्रेस उमेदवाराचा पुतण्या गंभीर जखमी
16
आलिशान राजवाडा, 1000 घोडे अन् यॉट्सचा ताफा; PM मोदींना भेटणारे ओमानचे सुलतान किती श्रीमंत?
17
बाबा वेंगाची भारत आणि जगासाठी १० आनंदाची भाकिते; २०२६ पासून सुरू होणार 'सुवर्णकाळ'?
18
पुण्यात पुन्हा एकदा कोयता गँगची दहशत, वाघोलीमध्ये दुकानांच्या लाईटची तोडफोड; घटनेचा सीसीटीव्ही समोर
19
Manikrao Kokate: "आता तरी लाजेखातर..."; माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्यासाठी मविआ आक्रमक
20
दिल्लीत ५० टक्के कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्याचे सरकारचे आदेश; कुणाला मिळणार १० हजार?
Daily Top 2Weekly Top 5

मुसळधार पावसानंतरही उष्णतेत वाढ, वातावरणातील बदलामुळे विविध आजार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2024 12:13 IST

काळजी घेण्याचे आरोग्य विभागाचे आवाहन

कणकवली : कधी तापमान वाढते तर कधी कमी होते. कधी ढग दाटून येतात, तर कधी पावसाचा शिडकावा होतो. काही तासांत होणाऱ्या वातावरणातील बदलांमुळे याचा त्रास सिंधुदुर्गवासीयांना होत आहे. त्यातच शनिवारी ३६ अंश सेल्सिअसपेक्षा तापमान वाढलेले असतानाच जिल्ह्यात ठिकठिकाणी वळिवाच्या पावसाने हजेरी लावली. काही प्रमाणात तापमान कमी झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी पुन्हा तापमानात वाढ झाली. वातावरणात वारंवार होणाऱ्या बदलामुळे नागरिकांना विविध आजारांचा सामना करावा लागत आहे.

जिल्ह्यात अधून मधून ढगाळ वातावरण असते. मात्र, असे दिवस वगळता पडलेल्या कडक उन्हामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला. कडक उन्हाचा सामना करत असताना तापमान अचानक वाढत असून मध्येच कमीदेखील होत आहे. याचा फटका नागरिकांना बसत असून आरोग्याच्या समस्या वाढत आहेत.

शनिवारी, ११ मे रोजी ढगाळ वातावरणामुळे तापमानात घट झाली होती. जोराचा वारा वाहून पावसाचा शिडकावा झाला. त्यामुळे तापमान ३० अंश सेल्सिअसवर गेले. लगेच दुसऱ्या दिवशी १२ मे रोजी तापमान ३६ अंश सेल्सिअसवर पोहोचले. त्यामुळे शनिवारच्या पावसामुळे दिलासा मिळणे दूर राहून उलट रविवारी उकाडाच जास्त जाणवला.

रुग्णसंख्येत वाढ!उन्हाळा सुरू असूनही अधून-मधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे यंदाच्या वर्षी उष्णतेची तीव्र लाट असून उकाड्याबरोबर दमट हवेचा सामना करावा लागत आहे. जेव्हा वातावरणातील उष्णता वाढते, तेव्हा आपल्या शरीरातही काही बदल होतात. यात डिहायड्रेशन होणे, उष्माघात होणे, भूक मंदावणे, उन्हाळा लागणे, ब्लड प्रेशर वाढणे, ॲसिडिटी होणे, डोके दुखणे, अस्वस्थ वाटणे, प्रचंड थकवा जाणवणे असे आजार उद्भवत आहेत. दरम्यान, शासकीय व खासगी रुग्णालयामध्ये अनेक रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यातील जास्त रुग्ण उष्णतेबाबतच्या समस्येबाबत येत आहेत.जोरदार पावसाच्या सरी !कणकवलीसह जिल्ह्यातील काही भागात रविवारी रात्री सव्वानऊ वाजेच्या सुमारास जोरदार वारा सुटला. त्यानंतर आकाशात विजा चमकू लागल्या काही वेळातच पावसाच्या सरी कोसळू लागल्या होत्या, तर काही भागात तत्पूर्वी पाऊस पडला. त्यामुळे वातावरणात पुन्हा बदल झाला.

...असे होतंय कमी- जास्त तापमान!वाढत जाणारे तापमान आणि ढगाळ वातावरण यांचा परिणाम तापमानावर होत आहे. त्यामुळे कमान व किमान तापमानात मोठी तफावत जाणवत आहे. याचा परिणाम आरोग्यावर होत असून अंगदुखी, ताप, डोकेदुखी अशा नागरिकांच्या तक्रारी वाढत आहेत. त्यामुळे आरोग्याची काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात येत आहे.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गTemperatureतापमानRainपाऊसHealthआरोग्य