शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
2
हिंसा हे प्रश्नांचं उत्तर नाही, लोकशाहीतूनच आमूलाग्र बदल शक्य; सरसंघचालकांनी टोचले राजकीय पक्षांचे कान
3
१९२९ मध्ये बनवलेलं हे क्रीम, आजही घराघरात होतो वापर; कोलकाताच्या या व्यक्तीनं उभी केली १६० कोटींची कंपनी
4
'पीओके'मध्ये निदर्शने हिंसक झाली, पाकिस्तानी सुरक्षा दलांनी गोळीबार केला; १२ नागरिकांचा मृत्यू
5
ट्रम्प टॅरिफमुळे भारताच्या प्रगतीला ब्रेक लागेल? रिझर्व्ह बँकेचा इशारा, 'फक्त जीएसटी कपात पुरेशी नाही...'
6
Video: "आय लव्ह मराठी! मी मराठी शिकतोय, माझ्याशी मराठीत बोला..."; अबू आझमींना झाली उपरती
7
Post Office च्या ‘या’ स्कीममध्ये संपेल पेन्शनचं टेन्शन, दर महिन्याला मिळतील ₹२००००
8
महात्मा गांधींच्या पणतीला पाहिलंत का? दिसायला आहे खूप ग्लॅमरस, गाजवतेय हॉलिवूड
9
भारतासाठी नवीन संकट? अमेरिकेसह सात देश करत आहेत मोठी तयारी; रशियासोबत कनेक्शन
10
'मानवी इतिहासाचा मार्ग बदलला', पंतप्रधान मोदींनी राजघाटावर महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहिली
11
आता चीनला जाण्यासाठी भारतातून मिळणार थेट विमान सेवा; प्रवाशांचा वेळ अन् पैसा वाचणार
12
डायबिटीज रुग्णांसाठी गुडन्यूज! ब्लड शुगर आणि लठ्ठपणा गुणकारी औषधीच्या विक्रीला केंद्राची मंजुरी
13
तृप्ती, शर्वरी की अनन्या, कोणती अभिनेत्री दिसणार 'चांदनी बार'च्या सीक्वलमध्ये मुख्य भूमिकेत?
14
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
15
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
16
चार आरोपींवर १९ वर्षांनंतर झाले आरोप निश्चित मालेगाव बॉम्बस्फोट; विशेष न्यायालयांत सुनावणी
17
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
18
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
19
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
20
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे

नुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2020 15:15 IST

कणकवली तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

ठळक मुद्देनुकसानग्रस्तांना तत्काळ नुकसान भरपाई द्या !संदेश सावंत यांची तहसीलदाराकडे निवेदनाव्दारे मागणी

कणकवली : तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हयात होत असलेल्या अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील गोर गरीब शेतकऱ्याच्या शेतीचे मोठे नुकसान होत आहे.यामध्ये पिकांना कीड लागणे, ती काळी पडणे तसेच शेतीत पाणी साचून पीकांचे नुकसान होत असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.शेती पूर्ण होवून देखील हाता तोंडाशी आलेले पीक उद्धवस्त होताना दिसत आहे. त्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्याच्या शेतीपिकांची प्रत्यक्ष पहाणी करून नुकसान भरपाई तत्काळ द्यावी, अशी मागणी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश उर्फ गोट्या सावंत यांनी तहसीलदार आर.जे.पवार यांच्याकडे निवेदनाव्दारे केली आहे.यावेळी बुलंद पटेल,पंचायत समिती सदस्य मिलींद मेस्त्री,सरपंच संजय सावंत, संतोष आग्रे,राजू पेडणेकर, नितीन गावकर,प्रफुल्ल काणेकर,स्वप्नील चिंदरकर,हरकूळ उपसरपंच परब आदी उपस्थित होते.यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,जिल्ह्यात पडणाऱ्या अवकाळी पावसामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.यामध्ये शेतीला कीड लागणे,शेती काळी पडणे तसेच शेतीत पाणी साचून पीकांचे नुकसान होत असून शेतकरी पुरता हवालदिल झाला आहे.शेती पूर्ण होवून देखील हाता तोंडाशी आलेले पीक उद्धवस्त होताना दिसत आहे.आपण या पूर्ण कणकवली तालुक्यातील शेतीची प्रत्यक्ष पहाणी करून स्थानिक पातळीवरच पंचनामे करून त्यानुसार त्यांची नुकसान भरपाई तत्काळ मिळेल.यासाठी प्रस्ताव तयार करून शासनस्तरावर पाठपुरावा करावा.जेणे करून गोरगरीब शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीची किमान भरपाई तरी मिळेल. तसेच संबंधित शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने न्याय मिळेल.यावर तहसिदार आर.जे.पवार म्हणाले ,तालुक्यातील शेतीचे पंचनामे पूर्ण झाले असून शासनाकडून निधी आल्यास त्याचे वाटप लवकरात लवकर करू असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. 

टॅग्स :FarmerशेतकरीTahasildarतहसीलदारsindhudurgसिंधुदुर्ग