शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

शिवसैनिकांना त्रास दिल्यास मंत्री उदय सामंतांचेही भ्रष्टाचार बाहेर काढू, विनायक राऊतांचा इशारा

By सुधीर राणे | Updated: January 2, 2023 17:54 IST

येत्या दोन ते तीन महिन्यात भाजपच स्वतःहून हे सरकार पाडणार

कणकवली: ज्यांच्या ताटात खायचे त्यांच्याच तोंडाला पाने पुसायची अशी दीपक केसरकर यांची पध्द्त आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला निष्ठा शिकवू नये. सिंधुदुर्ग किंवा रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसैनिकांना तसेच नवनियुक्त सरपंचाना प्रशासन, अधिकारी यांच्या माध्यमातून त्रास दिला गेल्यास मंत्री उदय सामंत यांचाही रस्ते तसेच अन्य बाबीतील भ्रष्टाचार आम्ही कधीही बाहेर काढू शकतो. हे त्यांनी लक्षात घ्यावे. केसरकर व सामंत यांच्यात हिम्मत असेल तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अन् पुन्हा निवडणुकीला सामोरे जाऊन निवडून यावे असे आव्हान खासदार विनायक राऊत यांनी दिले. राज्यातील सध्याचे सरकार हे औटघटकेचे आहे. कारण येत्या दोन ते तीन महिन्यात भाजपच स्वतःहून हे सरकार पाडणार आहे. असा दावाही त्यांनी यावेळी केला. कणकवली तालुक्यातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या नवनिर्वाचित सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांचा सत्कार सोहळा येथील मातोश्री मंगल कार्यालयात सोमवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार वैभव नाईक, जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर, जिल्हाप्रमुख संजय पडते, जिल्हा बँक माजी अध्यक्ष सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख नीलम सावंत-पालव, युवा सेना जिल्हाप्रमुख सुशांत नाईक, तालुकाप्रमुख शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, संदीप कदम, वैदेही गुडेकर, राजू शेट्ये, सचिन सावंत, कन्हैया पारकर आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना राऊत म्हणाले, अलीकडेच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेने चांगले यश मिळवून कोकणातून पुन्हा एकदा विजयाचा झंझावात सुरू केला आहे. आगामी सर्व निवडणुकीत तो ' बांदा ते चांदा' पर्यंत निश्चितच पोहचेल. त्यासाठी शिवसैनिकांनी कंबर कसून कामाला लागावे. ग्रामपंचायत निवडणुकित आपल्या विरोधात कौरव सेना सर्व तयारी निशी उभी राहिलेली असताना सुद्धा कणकवली विधानसभा मतदार संघात आपल्या शिवसेनेला  ६८,१३० मते मिळाली आहेत. ही गरुडझेप असून आगामी  विधानसभेच्या निवडणुकीतही या मतदार संघात आपला भगवा फडकेल.वैभव नाईक म्हणाले, आता राज्यात शिवसेनेची सत्ता नसली तरी , नवनर्वाचित सरपंचांना प्रशासकीय तसेच इतर सहकार्य निश्चितच करू. लोकांनी ठरविले की ते निश्चितच भूमिका घेतात.हे या निवडणुकीत दिसून आले आहे. नवीन सरपंचांना विरोधकांकडून आश्वासने दिली जातील. पण तुम्ही शिवसेनेमुळे निवडून आला आहात. भाजप विरोधी जनतेने दिलेला तो कौल आहे. त्यामुळे शिवसेनेशी  प्रामाणिक राहायला पाहिजे.  सध्या राज्यात व देशात सत्तेचा दुरुपयोग केला जात आहे. त्यामुळे नवनर्वाचित सरपंच,उपसरपंच ग्रामपंचायत सदस्यांनी सतर्क रहावे. यावेळी अरुण दुधवडकर, सतीश सावंत,संदेश पारकर,अतुल रावराणे,संजय पडते यांनीही मनोगत व्यक्त केले.नारायण राणेंची नार्को टेस्ट करा!शिवसेनेसह पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यावर सातत्याने टीका करण्याचे काम नारायण राणे आणि त्यांचे सुपुत्र करीत आहेत. दिशा सालीयन मृत्यू प्रकरणी आदित्य ठाकरे  यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी ते करीत आहेत. त्यामुळे सिंधुदुर्गात आतापर्यंत झालेल्या नऊ राजकीय हत्यांची चौकशी एसआयटीतर्फे करण्यात यावी अशी आमची मागणी असून याप्रकरणी नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रांचीही नार्को टेस्ट करावी म्हणजे नेमके सत्य जनतेसमोर येईल. असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंतVinayak Rautविनायक राऊत Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाNarayan Raneनारायण राणेDeepak Kesarkarदीपक केसरकर