शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

सिंधुदुर्ग : एस टी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संघर्ष अटळ !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 13:01 IST

अप्रत्यक्षरीत्या केले जाणारे खाजगीकरण थांबवावे. तसेच एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. यासह एस टी कामगारांच्या अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासन तसेच शासनाविरोधात एस टी कामगारांचा आता संघर्ष अटळ आहे. असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.

ठळक मुद्देएस टी कामगारांच्या मागण्या पूर्ण न झाल्यास संघर्ष अटळ ! कणकवलीत पत्रकार परिषदेत हनुमंत ताटे यांचा इशारा

कणकवली : राज्याच्या परिवहन मंत्र्यानी सन 2016 ते 2020 या 4 वर्षाच्या वेतन करारासाठी 4849 कोटि रुपयांची घोषणा केली होती. या पूर्ण रक्कमेचे वाटप कामगारांना करावे. एस टी मध्ये कंत्राटीपध्दत आणून अप्रत्यक्षरीत्या केले जाणारे खाजगीकरण थांबवावे. तसेच एस. टी. महामंडळाचे राज्य शासनात विलीनीकरण करावे. यासह एस टी कामगारांच्या अन्य मागण्या पूर्ण न झाल्यास प्रशासन तसेच शासनाविरोधात एस टी कामगारांचा आता संघर्ष अटळ आहे. असा इशारा महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व सरचिटणीस हनुमंत ताटे यांनी संयुक्तरीत्या घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिला आहे.कणकवली येथील शिवशक्ती मंगल कार्यालयात महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेच्या सिंधुदुर्ग व रत्नागिरी विभागाच्या मेळाव्याचे आयोजन  करण्यात आले होते. यानिमित्ताने कणकवलीत आलेल्या संदीप शिंदे व हनुमंत ताटे यांनी एस. टी च्या विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधला.यावेळी संघटनेचे मुंबई प्रदेश सचिव दिलीप साटम, सिंधुदुर्ग विभागीय अध्यक्ष रविंद्र भिसे, कार्याध्यक्ष सुरेंद्र मोरजकर, कोषाध्यक्ष अनिल नर, विनय राणे, किशोर धालवलकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी हनुमंत ताटे म्हणाले, परिवहन मंत्र्यानी सन 2016 ते 2020 च्या वेतन करारासाठी 4849 कोटि रुपयांची एकतर्फी घोषणा केली होती. कामगारांना किमान 32 ते 48 टक्के वेटनवाढ मिळेल असे यावेळी जाहिर केले होते. मात्र प्रशासनाने त्या रक्कमेचे वाटप करताना करताना दिलेल्या सूत्रानुसार कामगारांना पूर्ण रक्कमेचे वाटप होत नसल्याने अपेक्षित वेतन मिळत नाही. म्हणून कामगारानी 8 व 9 जून 2018 रोजी अघोषित कामबंद आंदोलन केले होते. त्या अनुषंगाने झालेल्या बैठकीत परिवहन मंत्र्यानी वेतनवाढीपोटी जाहिर केलेल्या 4849 कोटि मध्येच मान्यता प्राप्त संघटनेने आपल्या सूत्रानुसार प्रस्ताव सादर करावा असा निर्णय जाहिर केला होता.त्यानुसार मान्यता प्राप्त संघटनेने 31 मार्च 2016 चे मूळ वेतन अधिक 1190 रूपये या रक्कमेस 2.57 ने गुणण्याचा सुधारित प्रस्ताव प्रशासनास 15 जून 2018 रोजी सादर केला. परंतु त्याची दखल प्रशासनाने घेतली नाही. त्यामुळे जाहिर केलेल्या 4849 कोटि रुपयांचे पूर्ण वाटप होत नसल्याने आमच्या मान्यता प्राप्त संघटनेने अद्याप वेतन करारावर स्वाक्षरी केलेली नाही.परिवहन मंत्र्यानी त्यांच्या कार्यकाळात यापुढे भाड़े तत्वावर राज्य परिवहन महामंडळात गाड्या घेतल्या जाणार नाही असे जाहिर केले होते. परंतु सध्या 1500 शिवशाही गाड्या भाड़े तत्वावर घेतलेल्या असून त्यातील काही गाड्यांचा वापर सुरु आहे. या गाड्यांवर चालक खाजगी कंपनीचा आहे. महामंडळातील साफ सफाईचे काम खाजगी संस्थेस दिले आहे. त्यामुळे स्वच्छक , सफाई कामगार या नोकऱ्या बंद झाल्या आहेत. तिकीट बुकिंगचे कामहि खाजगी संस्थेस दिल्याने विविध सेवांचे अप्रत्यक्ष खाजगिकरण व कंत्राटीकरण केले जात आहे. यास आमच्या संघटनेचा तीव्र विरोध आहे. असेही हनुमंत ताटे यावेळी म्हणाले.संदीप शिंदे म्हणाले, एस टी महामंडळ 85 लाख प्रवाशांना सेवा देते. मात्र कामगारांवर नेहमीच अन्याय होत असतो. एस टी महामंडळ आर्थिक अडचणीत येण्यास अनेक घटक कारणीभूत आहेत. त्यात खाजगी प्रवासी वाहतूक हा एक घटक आहे. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण आणण्याबाबत न्यायालयाने निर्देश दिलेले असताना सुध्दा शासन काहीही प्रयत्न करीत नाही.

या अवैध प्रवासी वाहतुकीमुळे महामंडळाचे अंदाजित 1000 ते 1200 कोटि रूपये वार्षिक नुकसान होत आहे. डोंगराळ व दुर्गम भागात सेवा दिल्याने सुमारे 600 कोटिचे नुकसान होत आहे. खासगी वाहतुकदार टप्पे वाहतुकीचा वापर करीत असल्याने 1.50 कोटि रूपये दिवसाला तोटा होत आहे. एस टी विविध करापोटी 1038 कोटि रूपये शासनास देते. त्यामुळे एस टी चा तोटा वाढत आहे. शासन एस टी च्या विविध योजना जाहिर करीत असते. त्यामुळेही तोटा वाढत आहे. यासाठी शासनाने एस टी महामंडळाला राज्य शासनात विलीन करून घ्यावे .त्यामुळे एस टी चा तोटा आणि फायदा याला शासनच जबाबदार असेल . तसेच विनाकारण कामगारांवर होणारा अन्याय तरी थांबेल. यासाठी आम्ही राज्यभर दौरे करुण जनजागृती करीत आहोत. अनेक आमदारांचा आम्हाला या मागणीसाठी पाठिंबा लाभत आहे. असेही शिंदे यानी यावेळी सांगितले.एस टी कामगारांना गृहीत धरु नये !एस टी कामगारांवर कायमच अन्याय होत आला आहे. त्याना आवश्यक सुविधाही मिळत नाहीत. ड्रेस कोड सारखे निर्णय परस्पर घेतले जात असतात. महिला कामगारांच्या समस्यांकडेही कोणीही लक्ष देत नाही. हा अन्याय थांबला नाही तर एस टी कामगारांना कोणीही गृहीत धरु नये. आगामी निवडणुकीत कोणाला मतदान करायचे याचा निर्णय कामगार निश्चितच घेतील. असा इशाराही संदीप शिंदे यांनी यावेळी दिला. 

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळsindhudurgसिंधुदुर्ग