शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

अजूनही महामार्ग धोकादायक वळणाचाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:55 IST

highway, road, pwd, kankavli, sindhudurgnews मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम कोट्यावधीचा खर्च होऊनही समस्या कायम

सुधीर राणे

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र , सध्या त्याउलट स्थिती पहायला मिळत आहे.सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी या कामाला मंजूर आहे . मात्र या रस्त्यावरील धोकादायक वळणे काढली गेली नाहीत . ही गंभीर बाब आहे . वळणे काढण्यासाठी काही जमीन अधिग्रहित करणे आवश्यक होती. ती अधिग्रहित करण्यात आलेली नाही. आता चौपदरीकरणाने महामार्ग वेगवान झाला तरी अनेक वळणे पूर्वीप्रमाणेच असल्याने ती धोकादायक ठरणार आहेत.काश्मीर ते कन्याकुमारी असा हा महामार्ग असून कोकणातील काम गतीने सुरू आहे. महामार्ग सुरू करायच्या आधी अनेक राजकीय नेत्यांनी महामार्ग सुसज्ज होणार असून आता महामार्गावरील वळणे राहणार नाहीत . अशा घोषणा केल्या होत्या . त्यामुळे अपघात कमी होतील असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात महामार्गाचे काम पूर्ण व्हायला आले आहे. तरी कामाची सद्यस्थिती बघितल्यास धोकादायक वळणे तशीच आहेत. काही वळणे अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागणार आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाच्यावेळी वळणे काढली जातील अशी अपेक्षा होती. मात्र, ती तशीच ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे . या महामार्गावरून आता वर्दळ वाढणार आहे . ती वळणावर जीवघेणी ठरण्याची दाट शक्यता वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.महामार्ग मृत्यूचा सापळा बनू नये !

मुंबई - गोवा महामार्ग अरुंद व वळणा वळणाचा असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असत. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण अजूनही अपघातांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. याउलट वळणाच्या महामार्गामुळे तो मृत्यूचा सापळा बनू नये. एवढीच आमची अपेक्षा आहे.-- सचिन राणे , नागरिक .

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग