शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
2
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
3
राज्यसभेत उघडपणे बोलणारे आज गप्प का? धनखड यांच्या मौनावर राहुल गांधींनी उपस्थित केले प्रश्न
4
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
5
कुमार बिर्ला स्वतःच्याच कंपनीचे शेअर्स स्वस्तात का विकत आहेत? एक वर्षापूर्वीच खरेदी; का आली अशी वेळ?
6
प्रसिद्ध अमेरिकन जज फ्रँक कॅप्रियो यांचे निधन; 'दयाळू न्यायाधीश' म्हणून होते लोकप्रिय!
7
"श्री गणेश करते हैं..."; जेव्हा रशियन राजदूतांनी हिंदीमध्ये सुरू केली पत्रकार परिषद! 'सुदर्शन चक्र'चा उल्लेख करत दिलं मोठं आश्वासन, बघा VIDEO
8
हाय स्पीड कॅमेरे, सेन्सर अन् 3D मोशन कॅप्चर टेक्नॉलॉजीसह या गोलंदाजाची अ‍ॅक्शन रेकॉर्ड केली जाणार
9
इंजिनीअर तरुणाने आईच्या मदतीने पत्नीला संपवलं, मृतदेह चादरीत गुंडाळला अन्...; कारण ऐकून होईल संताप!
10
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला बाप्पाला दूर्वा सोडून का वाहिली जाते तुळस?
11
ड्रीम११ आणि My11Circle चे भविष्य धोक्यात? ऑनलाइन गेमिंग बिलामुळे 'हे' प्लॅटफॉर्म कायमचे बंद होणार?
12
"आपलं टार्गेट चीन, तर भारताच्या रुपाने...!", निक्की हेली यांनी ट्रम्प प्रशासनाला फटकारलं; स्पष्टच बोलल्या
13
Coconut Oil : नारळ तेल बनलं VIP प्रोडक्ट; दोन वर्षांत तीन पटींनी वाढली किंमत
14
पत्नीचा मृतदेह पाहून पतीला बसला धक्का, एका कोपऱ्यात बसला आणि तासाभरातच...  
15
Ramayana चित्रपटातील 'राम' Ranbir Kapoor नं 'या' कंपनीत केली मोठी गुंतवणूक; शेअर करुन देतोय जबरदस्त कमाई
16
Ganesh Chaturthi 2025: बाप्पा आपल्या भेटीला येतोय, पण कधी 'या' गुप्त गणेश मंदिरात बाप्पाची भेट घ्या!
17
शिल्पा शेट्टीच्या रेस्टॉरंटमध्ये पोहोचली 'सावली', प्राप्ती रेडकरचा ग्लॅम लूक; सोबत दिसली 'भैरवी'
18
शाळेत मारल्याच्या रागातून नववीतील विद्यार्थ्याने शिक्षकावर झाडली गोळी, लंच बॉक्समधून आणला कट्टा आणि...  
19
भारत अमेरिकेला आणखी एक झटका देण्याच्या तयारीत; कच्च्या तेलानंतर रशियासोबत करू शकतो ‘ही’ डील
20
OMG! आर्यन खानची पहिलीच सीरिज आग लावणार, प्रीव्ह्यूच्या शेवटी 'त्या' डायलॉगने वेधलं लक्ष

अजूनही महामार्ग धोकादायक वळणाचाच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 19, 2020 12:55 IST

highway, road, pwd, kankavli, sindhudurgnews मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण काम कोट्यावधीचा खर्च होऊनही समस्या कायम

सुधीर राणे

कणकवली : मुंबई -गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. निम्म्यापेक्षा जास्त काम पूर्ण झाले असून या महामार्गावर आतापर्यंत कोट्यावधीचा निधी खर्च झाला आहे. मात्र , अजूनही धोकादायक वळणाचाच हा महामार्ग असून वाहनचालकाना त्याचा त्रास होणार आहे. तसेच मोठ्या अपघाताच्या घटनाही घडण्याची शक्यता आहे.अपघातांची संख्या कमी करण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात येत असल्याची घोषणा तत्कालीन सत्ताधाऱ्यांनी केली होती. मात्र , सध्या त्याउलट स्थिती पहायला मिळत आहे.सध्या या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गतीने सुरू आहे. कोट्यावधी रुपयाचा निधी या कामाला मंजूर आहे . मात्र या रस्त्यावरील धोकादायक वळणे काढली गेली नाहीत . ही गंभीर बाब आहे . वळणे काढण्यासाठी काही जमीन अधिग्रहित करणे आवश्यक होती. ती अधिग्रहित करण्यात आलेली नाही. आता चौपदरीकरणाने महामार्ग वेगवान झाला तरी अनेक वळणे पूर्वीप्रमाणेच असल्याने ती धोकादायक ठरणार आहेत.काश्मीर ते कन्याकुमारी असा हा महामार्ग असून कोकणातील काम गतीने सुरू आहे. महामार्ग सुरू करायच्या आधी अनेक राजकीय नेत्यांनी महामार्ग सुसज्ज होणार असून आता महामार्गावरील वळणे राहणार नाहीत . अशा घोषणा केल्या होत्या . त्यामुळे अपघात कमी होतील असे सांगितले जात होते. मात्र, प्रत्यक्षात महामार्गाचे काम पूर्ण व्हायला आले आहे. तरी कामाची सद्यस्थिती बघितल्यास धोकादायक वळणे तशीच आहेत. काही वळणे अत्यंत धोकादायक असून त्या ठिकाणी अपघात होऊन अनेकांना जीव गमवावा लागणार आहे.महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाच्यावेळी वळणे काढली जातील अशी अपेक्षा होती. मात्र, ती तशीच ठेवण्यात आली आहेत. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे . या महामार्गावरून आता वर्दळ वाढणार आहे . ती वळणावर जीवघेणी ठरण्याची दाट शक्यता वाहनधारकांकडून व्यक्त केली जात आहे.महामार्ग मृत्यूचा सापळा बनू नये !

मुंबई - गोवा महामार्ग अरुंद व वळणा वळणाचा असल्याने मोठ्या प्रमाणात अपघात होत असत. त्यामुळे या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम हाती घेण्यात आले. पण अजूनही अपघातांची संख्या म्हणावी तशी कमी झालेली नाही. याउलट वळणाच्या महामार्गामुळे तो मृत्यूचा सापळा बनू नये. एवढीच आमची अपेक्षा आहे.-- सचिन राणे , नागरिक .

टॅग्स :highwayमहामार्गKankavliकणकवलीsindhudurgसिंधुदुर्ग