शहरं
Join us  
Trending Stories
1
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
2
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
3
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
4
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
5
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
6
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
7
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
8
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
9
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
10
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
11
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
12
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
13
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
14
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
15
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
16
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
17
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
18
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
19
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
20
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?

महामार्ग चौपदरीकरण : जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:41 IST

Highway Sindhudurg NiteshRane- चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.

ठळक मुद्देजनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल महामार्ग चौपदरीकरण समस्यांबाबत नीतेश राणे यांचा इशारा

कणकवली : चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात जनतेच्या अडकलेल्या प्रश्नांवर गुरुवारी प्रांत कार्यालयात आमदार राणे यांनी प्रांताधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाळा जठार, सभापती दिलीप तळेकर, माजी सभापती रत्नप्रभा वळंजू, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, रूपाली भांबुरे, संकेत खानविलकर, शैलेश सुर्वे आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.सुमारे २०० प्रकरणे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रलंबित आहेत. मार्चपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढली जावीत. जेणेकरून जनतेला सातत्याने फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कणकवली प्रांताधिकारी ही प्रकरणे निकाली काढण्यास सकारात्मक प्रयत्न करीत आहेत; मात्र, त्यांना प्रशासकीय व इतर खात्यांतील अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने पाच, दहा वर्षे मोबदले अडकून असतील तर जनतेने काय करावे? आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, तरी प्रशासन स्थरावर कामे होत नसतील तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग