शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

महामार्ग चौपदरीकरण : जनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 25, 2020 14:41 IST

Highway Sindhudurg NiteshRane- चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.

ठळक मुद्देजनतेच्या प्रश्नांसाठी प्रसंगी टोकाची भूमिका घ्यावी लागेल महामार्ग चौपदरीकरण समस्यांबाबत नीतेश राणे यांचा इशारा

कणकवली : चौपदरीकरणात जमिनी गेलेल्या लोकांचे प्रश्न आजही निकाली लागलेले नाहीत. निवाडे, मोबदला देण्याचे काम अजूनही दिरंगाईने चालू आहे. हे असे किती दिवस चालणार? टाईमलाईन ठरवा आणि लोकांचे प्रश्न सोडवा, अशी सूचना भाजप आमदार नीतेश राणे यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांना दिली. मार्चपर्यंत ही सर्व प्रकरणे निकाली काढून चौपदरीकरणातील जनतेचे प्रश्न सोडविले नाहीत तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही यावेळी आमदार नीतेश राणे यांनी दिला.कणकवली तालुक्यातील महामार्ग चौपदरीकरणात जनतेच्या अडकलेल्या प्रश्नांवर गुरुवारी प्रांत कार्यालयात आमदार राणे यांनी प्रांताधिकारी यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती बाळा जठार, सभापती दिलीप तळेकर, माजी सभापती रत्नप्रभा वळंजू, भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, नगरसेवक शिशिर परुळेकर, भाजप शहराध्यक्ष अण्णा कोदे, विभागीय अध्यक्ष सूर्यकांत भालेकर, तळेरे सरपंच साक्षी सुर्वे, उपसरपंच दिनेश मुद्रस, रूपाली भांबुरे, संकेत खानविलकर, शैलेश सुर्वे आणि ग्रामपंचायत सदस्य आदी उपस्थित होते.सुमारे २०० प्रकरणे कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे प्रलंबित आहेत. मार्चपर्यंत सर्व प्रकरणे निकाली काढली जावीत. जेणेकरून जनतेला सातत्याने फेऱ्या माराव्या लागणार नाहीत. कणकवली प्रांताधिकारी ही प्रकरणे निकाली काढण्यास सकारात्मक प्रयत्न करीत आहेत; मात्र, त्यांना प्रशासकीय व इतर खात्यांतील अधिकाऱ्यांनी सहकार्य करणे गरजेचे आहे. जर अशा पद्धतीने पाच, दहा वर्षे मोबदले अडकून असतील तर जनतेने काय करावे? आम्ही सातत्याने पाठपुरावा करतो आहोत, तरी प्रशासन स्थरावर कामे होत नसतील तर जनतेसाठी टोकाची भूमिका घ्यावी लागेल, असे राणे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :highwayमहामार्गNitesh Raneनीतेश राणे sindhudurgसिंधुदुर्ग