शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 MI vs KKR: Mumbai Indians ने घरच्या मैदानावर लाज आणली! १२ वर्षांनी कोलकाताचा वानखेडेवर दमदार विजय
2
रोहित वेमुला दलित नव्हता, आईनं तयार केलं होतं बनावट जात प्रामाणपत्र! तेलंगणा पोलिसांकडून सर्व आरोपींना क्लीन चिट
3
T20 World Cup 2024 मध्ये Virat Kohli ने ओपनिंग करावी, Rohit Sharma ने 'या' नंबरवर खेळावं; माजी भारतीय कर्णधाराचा अजब सल्ला
4
कोथळे खून खटल्यात आता कोणाची नियुक्ती? उज्वल निकम यांचा राजीनामा; राज्य शासनाच्या निर्णयाकडे लक्ष
5
IPL2024 MI vs KKR: नुसते आले नि गेले... रोहित, इशान, तिलक, हार्दिक स्वस्तात बाद; Mumbai Indians चा डाव गडगडला! 
6
“PM मोदींनी १० वर्षांत काय केले ते सांगावे, काम पूर्ण झाले की राम मंदिरात जाणार”: शरद पवार
7
Andre Russell Run Out, IPL 2024 MI vs KKR: नुसता गोंधळ! व्यंकटेश धावलाच नाही, रसेल मात्र कुठच्या कुठे पोहोचला अन् मग... (Video)
8
अमित शाह फेक व्हिडिओप्रकरणी दिल्ली पोलिसांची कारवाई; काँग्रेस नेते अरुण रेड्डींना अटक
9
IPL 2024 Mumbai Indians vs Kolkata Knight Riders: KKRला 'व्यंकेटश' प्रसन्न! अर्धशतकवीर अय्यर एकटा भिडला, पण Nuwan Thushara - Jasprit Bumrah ने मुंबईला तारलं
10
४०० पार हा मोदींचा जुमला, भाजप २०० पारही जाणार नाही; प्रकाश आंबेडकरांचा दावा
11
Tilak Varma Catch Video, IPL 2024 MI vs KKR: धडामsss... कॅच घ्यायला धावले अन् दोघे एकमेकांवर धडकले, तरीही तिलक वर्माने घेतला 'सुपर कॅच' (Video)
12
'आईने मोठ्या विश्वासाने...', रायबरेलीतून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर राहुल गांधींच्या भावना
13
“सांगलीत तिरंगी नाही थेट लढत, चंद्रहार पाटील...”; विशाल पाटील यांचा ठाकरे गटावर पलटवार
14
"बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचे सरंक्षण करणार..." राहुल गांधींचा भाजपवर हल्लाबोल
15
IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्सच्या प्लेईंग XI मधून Rohit Sharma गायब! Hardik Pandya ने टाकला नवा 'डाव'
16
“एकनाथ खडसेंची भूमिका संधीसाधूपणाची, आधी राजीनामा द्या अन् मग प्रचार करा”: गिरीश महाजन
17
कितीही उमेदवार द्या, श्रीकांत शिंदे यांचाच विजय पक्का; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना विश्वास
18
पातूरच्या घाटात भीषण अपघात; सहा जण ठार, चार गंभीर जखमी!
19
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
20
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण

महामार्गाच्या वस्तुस्थिती बाबतचे चित्रिकरण उच्च न्यायालयात सादर करणार -उपरकर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2020 4:44 PM

highway, mns, parsaramuparkar, sindhudurg मनसेच्यावतीने जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा व वस्तुस्थितीबाबत ३ व ४ डिसेंबर रोजी चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी वकिलामार्फत ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देमहामार्गाच्या वस्तुस्थिती बाबतचे चित्रिकरण उच्च न्यायालयात सादर करणार !महामार्ग लवकर हस्तांतरण करण्यासाठी सत्ताधारी घालताहेत ठेकेदाराला पाठिशी

कणकवली: सिंधुदुर्गातील जनतेचे प्रश्न सुटत नाहीत तोपर्यंत राज्यकर्त्यांनी जनतेच्या पाठीशी राहण्याची गरज आहे. मात्र, ते महामार्ग ठेकेदाराच्या पाठीशी राहत आहेत. मनसेच्यावतीने जिल्ह्यातील महामार्गाच्या कामाचा दर्जा व वस्तुस्थितीबाबत ३ व ४ डिसेंबर रोजी चित्रीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर ७ डिसेंबरला उच्च न्यायालयात होणाऱ्या सुनावणीवेळी वकिलामार्फत ते उच्च न्यायालयात सादर करण्यात येणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रदेश सरचिटणीस, माजी आमदार परशुराम उपरकर यांनी दिली.कणकवलीतील महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपर्क कार्यालय येथे सोमवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.परशुराम उपरकर म्हणाले, महामार्ग चौपदरीकरणाचे काम निकृष्ट झालेले आहे . महामार्गासाठी जमिनी गेलेल्या लोकांचे अनेक प्रश्न आजही सुटलेले नाहीत . मात्र , अशी स्थिती असताना पालकमंत्री , खासदार , सत्ताधारीमंडळी काम ९५ टक्के पुर्ण झाल्याचे दाखवून ते लवकरात लवकर हस्तांतरीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्या राज्यकर्त्यांची कीव करावीशी वाटते . वास्तविक प्रश्न न सुटलेल्या जनतेच्या पाठीशी त्यांनी उभे राहण्याची गरज असता ते ठेकेदाराच्या पाठीशी उभे राहत आहेत. असा आरोप परशुराम उपरकर यांनी केला.ते म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आढावा बैठकीत पालकमंत्री , खासदार महामार्गाचे काम लवकरात लवकर पुर्ण करण्याच्या अनुषंगाने प्रयत्नशिल आहेत, असे दिसते . आम्ही न्यायालयात याचीका दाखल केल्याने ही घाई आहे . जुलै महिन्यात बॉक्सेल पुलाचा भाग कोसळल्यानंतर पालकमंत्र्यांनी स्टक्चरल ऑडीट करण्यात येणार असल्याचे सांगितले होते.

त्यानंतर सायंकाळच्यावेळी मुख्य अभियंता कणकवलीत येऊन गेले . मात्र , अद्यापही याबाबतचा अहवाल आलेला नाही.जर मोठा पूल बांधताना एकदा नव्हे , तर दोन महिन्यात पाच वेळा कोसळला. असे असेल तर मग हे काम निकृष्ट नव्हे काय ? निकृष्ट काम , वनसंज्ञेतील तोडलेली झाडे व इतर विषयांबाबत आम्ही न्यायालयात याचिका दाखल केली आहे . त्यामुळेच आता सत्ताधारी मंडळी , काम पुर्णत्वास गेल्याचे सांगत महामार्ग हस्तांतरीत करण्यासाठीचे प्रयत्न करताना दिसत आहेत.

महामार्गाबाबत अनेक प्रश्न सुटलेले नाहीत . ते जाणून न घेता , ठेकेदाराच्या पाठीशी राहण्याचे काम सत्ताधारी मंडळी करत आहेत . काम पुर्ण झाल्यानंतर १५ वर्षे मेंटनन्स करावयाचा आहे . मात्र , ठेकेदार काम पुर्ण होण्याच्या अगोदरपासूनच मेंटनन्स करत आहे . आजही अनेकांना झाडांचे , जमिनींचे पैसे मिळालेले नाहीत . जमिनीं प्रत्यक्षात किती गेल्या याबाबत कमीजास्त पत्रक न झाल्याने काहीच माहिती लोकांना मिळत नाही . या सर्व माहितीबाबत नागरीक अनभिज्ञ आहेत ,असेही परशुराम उपरकर यांनी यावेळी सांगितले. 

टॅग्स :highwayमहामार्गMNSमनसेParshuram Upkarपरशुराम उपरकर sindhudurgसिंधुदुर्ग