शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

Sindhudurg: वादळी वाऱ्यामुळे काजू 'बी'चे नुकसान, उष्माघाताने मोहोरसुद्धा करपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:12 IST

पंचनामे करण्याची तहसिलदार, कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी

वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याने काजु पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर उष्माघाताने मोहोर सुद्धा करपून गेला आहे. या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार आणि कृषी विभागाकडे केली. तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्याने काजू पिकांचे अतोनात नुकसान केले ले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहोर तापमानवाढीने पूर्णपणे करपून गेला आहे. त्यामुळे शेतकरी पहिल्या टप्प्यातील काजूवरच संपूर्ण मदार होती. परंतु बुधवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत वादळी वारा झाला. त्यामध्ये खांबाळे, नावळे, करुळ आदी गावांमध्ये काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले.उष्माघाताने काहीअंशी सैल पडलेल्या काजूच्या कोवळ्या बी गळून पडल्या. त्यामुळे झाडांखाली कोवळ्या बी चा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय वादळी वाऱ्यामुळे आणखीनच खोलात गेला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. अनेक शेतकऱ्यांना बागेत गेल्यानंतर मोठया प्रमाणात काजू झडून पडल्याचे दिसून आले. हिरव्या पानासह काही झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या आहेत.शेतकऱ्यांनी तहसीलदारांची घेतली भेटकाजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज तहसिलदार सुर्यकांत पाटील यांची भेट घेऊन वादळीवाऱ्यांने झालेल्या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन दिवसांत पंचनामे सुरु करु : देशमुखवादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांचीही भेट घेऊन पंचनामे करण्याची अशी मागणी केली. त्यामुळे दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीweatherहवामान अंदाजFarmerशेतकरी