शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
2
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
3
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
4
मेस्सीचा इव्हेंट फसला, स्टेडियममध्ये मोठा गोंधळ झाला होता; बंगालच्या क्रीडामंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला
5
IPL 2026 Auction: विस्फोटक फलंदाज आयपीएल २०२६ च्या मेगा ऑक्शनमध्ये अनसोल्ड, नाव ऐकून चकीत व्हाल!
6
सोनं १३०६ रुपयांनी स्वस्त, चांदीही घसरली; पटापट चेक करा कॅरेटनिहाय लेटेस्ट रेट
7
Jara Hatke: अजब प्रथा: 'या' गावात लग्नाआधी तोडले जातात वधूचे दात; पण का??? वाचा 
8
मनोज जरांगे पाटील यांनी दिल्ली गाठली; अमित शाह यांच्याकडे केली मोठी मागणी, नेमके काय घडतेय?
9
IPL Auction 2026 LIVE: केकेआरचा मोठा डाव, कॅमरून ग्रीनपाठोपाठ पतिरानावर लावली विक्रमी बोली
10
Budh Pradosh 2025: इंग्रजी वर्ष २०२५ मधील शेवटचे प्रदोष व्रत; कर्जमुक्ती, संतान प्राप्तीसाठी करा 'हे' उपाय
11
IPL 2026 Auction: पृथ्वी शॉसह सरफराज खानला कुणीच दिला नाही भाव; सलग दुसऱ्यांदा 'अनसोल्ड'चा ठपका
12
खळबळजनक! लेकीच्या कस्टडीसाठी पतीने रचला भयंकर प्लॅन; टीव्ही अभिनेत्री पत्नीला केलं किडनॅप
13
नाईट क्लब आग प्रकरणी फरार लुथरा बंधूंना दिल्लीत आणले; थायलंडला पळून गेले होते
14
कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी खूशखबर! मार्च २०२६ पूर्वी मिळणार मोठं गिफ्ट, सरकारनं दिली महत्त्वाची माहिती
15
सेकंदात तयार होणारी मॅगी कॅप्सूल खरी की खोटी? ४० मिलियन लोकांनी बघितलेल्या व्हिडीओचं सत्य काय?
16
Numerology: अंकशास्त्रानुसार 'या' जन्मतारखेच्या लोकांनी पायात काळा धागा बांधू नये; होतो दुष्परिणाम!
17
क्रीडा मंत्री माणिकराव कोकटे यांना कुठल्याही क्षणी अटक होणार?; जिल्हा कोर्टाने सुनावला निकाल
18
IPL 2026 Auction : कॅमरुन ग्रीनसह BCCI ही मालामाल! ऑस्ट्रेलियन खेळाडूवर लागली रेकॉर्ड ब्रेकिंग बोली
19
रिअलमीचा धमाका! ७०००mAh बॅटरीसह Realme Narzo 90 सिरीज भारतात लॉन्च; जाणून घ्या किंमत
20
हायड्रोजन कारची जगातील पहिली क्रॅश टेस्ट झाली; ह्युंदाई नेक्सो किती आहे सुरक्षित...
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: वादळी वाऱ्यामुळे काजू 'बी'चे नुकसान, उष्माघाताने मोहोरसुद्धा करपला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 19:12 IST

पंचनामे करण्याची तहसिलदार, कृषी विभागाकडे शेतकऱ्यांची मागणी

वैभववाडी(सिंधुदुर्ग): तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्याने काजु पीकाचे अतोनात नुकसान झाले आहे. तर उष्माघाताने मोहोर सुद्धा करपून गेला आहे. या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करावेत, अशी मागणी तालुक्यातील शेतकऱ्यांनी तहसिलदार आणि कृषी विभागाकडे केली. तालुक्यातील काही गावांमध्ये वादळीवाऱ्याने काजू पिकांचे अतोनात नुकसान केले ले आहे. दुसऱ्या, तिसऱ्या टप्प्यातील काजू मोहोर तापमानवाढीने पूर्णपणे करपून गेला आहे. त्यामुळे शेतकरी पहिल्या टप्प्यातील काजूवरच संपूर्ण मदार होती. परंतु बुधवारी सकाळी साडेसहा ते साडे नऊ या कालावधीत वादळी वारा झाला. त्यामध्ये खांबाळे, नावळे, करुळ आदी गावांमध्ये काजू पिकांचे अतोनात नुकसान झाले.उष्माघाताने काहीअंशी सैल पडलेल्या काजूच्या कोवळ्या बी गळून पडल्या. त्यामुळे झाडांखाली कोवळ्या बी चा खच पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अगोदरच संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचा पाय वादळी वाऱ्यामुळे आणखीनच खोलात गेला आहे. डोंगर पायथ्याशी असलेल्या गावांमध्ये नुकसानीची झळ अधिक बसली आहे. अनेक शेतकऱ्यांना बागेत गेल्यानंतर मोठया प्रमाणात काजू झडून पडल्याचे दिसून आले. हिरव्या पानासह काही झाडांच्या फांद्याही मोडून पडल्या आहेत.शेतकऱ्यांनी तहसीलदारांची घेतली भेटकाजू उत्पादक शेतकऱ्यांनी आज तहसिलदार सुर्यकांत पाटील यांची भेट घेऊन वादळीवाऱ्यांने झालेल्या नुकसानीचे तातडीने सयुंक्त पंचनामे करुन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देऊन दिलासा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

दोन दिवसांत पंचनामे सुरु करु : देशमुखवादळी वाऱ्याचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी निरंजन देशमुख यांचीही भेट घेऊन पंचनामे करण्याची अशी मागणी केली. त्यामुळे दोन दिवसांत नुकसानीचे पंचनामे करण्यात येतील, असे देशमुख यांनी स्पष्ट केले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvaibhavwadiवैभववाडीweatherहवामान अंदाजFarmerशेतकरी