शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

जलयुक्तच्या कामांना ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ, २०१७-१८ साठी शासनाचा आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2019 11:42 AM

जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.

ठळक मुद्देजलयुक्तच्या कामांना ३१ मार्चपर्यंत अंतिम मुदतवाढ, २०१७-१८ साठी शासनाचा आदेश३७ पैकी ९ गावांची कामे ५० टक्केच पूर्ण, १५ गावांचे १०० टक्के काम

सिंधुदुर्गनगरी : जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्तील कामे पूर्ण करण्यासाठी शासनाने ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदत दिली आहे. यावषार्साठी जिल्ह्यातील ३७ गावांचा अभियानात समावेश करण्यात आला होता. त्यासाठी ७०८ कामांचा आराखडा होता. तर ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. १० कोटी ६४ लाखाचा आर्थिक आराखडा तयार करण्यात आला होता. ३७ पैकी १५ गावांनी १०० टक्के तर १३ गावांनी ८० टक्के कामे पूर्ण केली आहेत. मात्र, ९ गावांनी ५० टक्केच कामे पूर्ण केली आहेत.जलयुक्त शिवार अभियान २०१७-१८ या वषार्साठी ३७ गावांची निवड करण्यात आली होती. त्या गावांनी आराखड्यातील मंजूर कामे १५ जून २०१८ पर्यंत पूर्ण करण्याची मुदत होती. ती वाढवून ३१ डिसेंबर २०१८ करण्यात आली होती. तरीही कामे अपूर्ण राहिल्याचे शासनाच्या निदर्शनास आल्याने शासनाच्या मृद व जलसंधारण विभागाचे अवर सचिव सु. द. नाईक यांनी आदेश काढत हि अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ दिल्याचे कळविले आहे.जिल्ह्यातील ३७ गावामधील नाडण, धालवली, सौदाळे, नावळे, हरकुळ बुद्रुक, असगणी, तिरवडे, पोखरण, अणाव, सावरवाड, बांदा, कोनशी, दाभिळ, हेवाळे, आयनोडे, घाटीवडे - बांबर्डे या १५ गावांनी १०० कामे पूर्ण केली आहेत. पालांडेवाडी, नाटळ, हळवल, साळेल, कुसबे, पिंगूळी, गिरगाव, कुसगांव, नेरूर तर्फे हवेली, भंडारवाडा, सांगेली, खानयाळे, झोळंबे यांनी ८० टक्के काम पूर्ण केली आहेत. तर कळसुली, भिरवंडे, ओसरगाव, किर्लोस, कुंभारमाठ, आंजीवडे, आडेली, गवाण, चौकुळ या ९ गावांची कामे ५० टक्केच झाली आहेत.२१ फेब्रुवारी २०१९ च्या अहवालानुसार २०१७-१८ मधील जलयुक्त शिवारमध्ये समाविष्ट गावांनी ७०८ पैकी ६२१ कामे पूर्ण केली आहेत. या कामांना १० कोटी ६४ लाख पैकी ३ कोटी ४७ लाख रुपये खर्च झाले आहेत. आराखड्यानुसार ३३१.५४ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आणण्याचे उद्दिष्ट होते.

पूर्ण झालेल्या कामामुळे यातील ३१६.७३ हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. अजून ३.०५ हेक्टर ओलिताखाली येणे शिल्लक राहिले आहे. अपूर्ण राहिलेल्या ८७ कामांना पूर्ण करण्यासाठी ३१ मार्च २०१९ पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यातील ३४ कामे प्रगतीपथावर आहेत. निर्मिती पाणीसाठा क्षमता १३०.८० टीसीएम एवढा वाढला आहे. तर यामुळे सिंचनाखाली २८.८५ हेक्टर क्षेत्र आले आहे.

टॅग्स :Jalyukt Shivarजलयुक्त शिवारsindhudurgसिंधुदुर्ग