शहरं
Join us  
Trending Stories
1
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
2
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
3
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
4
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
5
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
6
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
7
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
8
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
9
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
10
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
11
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
12
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
13
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
14
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
15
अबतक ४००! चेपॉकच्या घरच्या मैदानात MS धोनीच्या नावे झाला खास रेकॉर्ड
16
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
17
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
18
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
19
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
20
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर

कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:11 IST

Flood Sindhudurg : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देकोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !संदेश पारकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.त्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासन स्तरावरून पूरस्थिती तसेच डोंगर खचणे या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास गट नेमण्यात यावा. निसर्गाच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास असणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मते व मार्गदर्शक सुचना जाणून घेण्यात याव्यात. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या प्रवाहाचे सर्वेक्षण करुन नदीपात्रातील गाळ प्राधान्याने उपसा करून नदीपात्रे खोल करण्यात यावीत.पुरामुळे बरेच दिवस गावे अंधारात राहू नये म्हणून पूरस्थितीजन्य गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या बसविण्यात याव्यात. जुने झालेले पुल, बंधारे, मोऱ्या यांचा सर्वे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना करुन पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांवर, पुलांवर, नदींवर पूरस्थिती निर्माण होते तेथील नागरीकांना पर्यायी मार्ग व आपत्कालीन निवारा केंद्रे उभारणी करणे, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफच्या धर्तीवर एक रेस्क्यू टीम सदैव तैनात ठेवणे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.नैसर्गिक प्रवाह बुजवून मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या कामांचे सर्वेक्षण करुन स्ट्रक्चरल ऑडिट करावे. कोकणातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.

कोरोना काळात आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टर, नर्स, शिपाई व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करुन घ्यावे व या कोकणातील जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोनशे कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संदेश पारकर यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :floodपूरkonkanकोकणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग