शहरं
Join us  
Trending Stories
1
"माझ्याबद्दल बातमी आली की, माझा मोबाईल...", उमर नबीबद्दल जहूर इलाहीमुळे पोलिसांच्या हाती मोठा पुरावा
2
राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये वाघ व बिबट्यांची दहशत; बिबट्यांच्या मुक्त संचारामागे कारणे काय?
3
'भारताने माझ्या आईचे प्राण वाचवले, त्यांना बांगलादेशच्या स्वाधीन करणार नाहीत'; शेख हसीना यांच्या मुलाने व्यक्त केला विश्वास
4
ICC ODI Batting Ranking : 'नवा गडी नव राज्य!' रोहित शर्माला मागे टाकत डॅरिल मिचेलनं रचला इतिहास
5
"मदरसे-मशिदीतून दहशतवादी बाहेर पडतात..."; योगी सरकारमधील मंत्र्याचं वादग्रस्त विधान, AMU वरही उपस्थित केला सवाल
6
Jalgaon Crime: 'चोर पऱ्या' बोलला अन्...; रेल्वे रुळावर मृतदेह सापडलेल्या हर्षलची हत्याच; सगळा घटनाक्रम आला समोर
7
महागड्या क्रिम्सना बाय-बाय, Skinimalism सोपा उपाय; ३ स्टेपमध्ये मेकअपशिवाय ग्लोइंग स्किन
8
'मला नीट झोप येत नाहीये...', बिहार निवडणुकीत 'जन सुराज'च्या पराभवावर प्रशांत किशोर यांची प्रतिक्रिया
9
जगातील टॉप हाय-स्ट्रीट रँकिंगमध्ये भारताचा दबदबा! ही बाजारपेठ सर्वात महागडी, तर सर्वाधिक भाडे कुठे?
10
आता बँक FD विसरा! पोस्टाच्या 'या' स्कीममध्ये मिळतंय ८.२०% पर्यंत व्याज; गॅरंटीड रिटर्नवाले प्लान्स पाहा
11
सिद्धू मूसेवाला ते बाबा सिद्दीकी हत्या अन् सलमान खान..; अनमोल बिश्नोईची संपूर्ण क्राइम कुंडली
12
Jara Hatke: सिम कार्डचे एक टोक तिरपे का असते? ९९ % लोकांना माहीत नाही कारण!
13
किमान ५ इमारतीच्या गटाचे ‘मिनी क्लस्टर’ लवकरच; मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश
14
"मला शिव्या दिल्या तर फरक नाही, पण संघावर आल्यावर मी..."; पिट्या भाईने सांगितले मनसे सोडण्याचे कारण
15
घरमालक-भाडेकरू वादावर अखेर ब्रेक! 'नवीन भाडे करार २०२५' लागू; 'हा' नियम मोडल्यास ५ हजार दंड!
16
Vastu Tips: घड्याळ दोन-तीन मिनिटं पुढे लावणे शुभ? पाहा वास्तू शास्त्र काय सांगते... 
17
धर्म आणि जातीवर ऐश्वर्या राय बच्चनचं वक्तव्य, पंतप्रधान मोदींच्या पाया पडत घेतले आशीर्वाद
18
गँगस्टर अनमोल बिश्नोईला अमेरिकेने हाकलले, विमानातून उतरताच एनआयएने ताब्यात घेतले  
19
छत्तीसगडमध्ये दोन अल्पवयीन मुलांना ATSकडून अटक; 'ब्रेनवॉश' करून ISISमध्ये सुरू होती भरती
20
स्लीपर वंदे भारत अन् बुलेट ट्रेन कधीपासून सुरू होणार? अश्विनी वैष्णव यांनी तारखाच सांगितल्या
Daily Top 2Weekly Top 5

कोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 13:11 IST

Flood Sindhudurg : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.

ठळक मुद्देकोकणातील पूरग्रस्तांसाठी २०० कोटींचे विशेष पॅकेज द्या !संदेश पारकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

कणकवली : भयानक पूरस्थिती आणि महाप्रलयामुळे मुंबई सह ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या सर्व जिल्ह्यांत खूप मोठी हानी झाली आहे. यामुळे कोकणातील जनतेला फार कठीण प्रसंगाचा सामना करावा लागत आहे.त्यासाठी शासन स्तरावरून सक्षम अभ्यासगट नेमून कायमस्वरूपी उपाययोजना करणे गरजेचे आहे.

या संकटातून जनतेला दिलासा देण्यासाठी नुकसान भरपाई म्हणून कोकणला २०० कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना नेते संदेश पारकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे एका निवेद्वनाद्वारे केली आहे.या निवेदनामध्ये म्हटले आहे की, शासन स्तरावरून पूरस्थिती तसेच डोंगर खचणे या स्थितीचा अभ्यास करण्यासाठी विशेष अभ्यास गट नेमण्यात यावा. निसर्गाच्या भौगोलिक रचनेचा अभ्यास असणाऱ्या जुन्या जाणत्या लोकांना विश्वासात घेऊन त्यांची मते व मार्गदर्शक सुचना जाणून घेण्यात याव्यात. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या प्रवाहाचे सर्वेक्षण करुन नदीपात्रातील गाळ प्राधान्याने उपसा करून नदीपात्रे खोल करण्यात यावीत.पुरामुळे बरेच दिवस गावे अंधारात राहू नये म्हणून पूरस्थितीजन्य गावांमध्ये भूमिगत विद्युत वाहिन्या बसविण्यात याव्यात. जुने झालेले पुल, बंधारे, मोऱ्या यांचा सर्वे तसेच स्ट्रक्चरल ऑडिट करून त्याबाबत योग्य ती उपाययोजना करुन पुनर्बांधणीसाठी निधी उपलब्ध करण्यात यावा.

दरवर्षी अतिवृष्टीमुळे ज्या रस्त्यांवर, पुलांवर, नदींवर पूरस्थिती निर्माण होते तेथील नागरीकांना पर्यायी मार्ग व आपत्कालीन निवारा केंद्रे उभारणी करणे, कोकणातील प्रत्येक जिल्ह्यात कायमस्वरूपी एनडीआरएफच्या धर्तीवर एक रेस्क्यू टीम सदैव तैनात ठेवणे व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे आधुनिकीकरण करणे गरजेचे आहे.नैसर्गिक प्रवाह बुजवून मुंबई -गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झालेल्या कामांचे सर्वेक्षण करुन स्ट्रक्चरल ऑडिट करावे. कोकणातील आरोग्य विभागातील सर्व रिक्त पदे भरून आरोग्य यंत्रणा सक्षम करावी.

कोरोना काळात आरोग्य विभागात तात्पुरत्या स्वरूपात नियुक्त केलेल्या सर्व डॉक्टर, नर्स, शिपाई व अन्य सर्व कर्मचाऱ्यांना कायमस्वरूपी रुजू करुन घ्यावे व या कोकणातील जनतेचा सहानुभूतीपूर्वक विचार करून दोनशे कोटी रुपयांचे विशेष आर्थिक पॅकेज देण्यात यावे. अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे संदेश पारकर यांनी केल्या आहेत. 

टॅग्स :floodपूरkonkanकोकणUddhav Thackerayउद्धव ठाकरेSandesh Parkarसंदेश पारकरsindhudurgसिंधुदुर्ग