शहरं
Join us  
Trending Stories
1
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
2
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
3
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
4
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
5
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
6
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
7
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
8
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
9
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
10
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
11
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
12
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
13
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
14
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
15
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
16
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
17
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
18
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
19
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
20
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
Daily Top 2Weekly Top 5

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या ! ;- शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:23 IST

त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली तहसीलदारांना निवेदन

 

कणकवली : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान  भरपाई राज्यपालांनी मंजूर केली आहे . मात्र , ही भरपाई आम्हाला मान्य नाही.  हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये भरपाई द्यावी , अशी मागणी यापूर्वी आम्ही केली होती . त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

       कणकवली तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने  सोमवारी तहसिलदार आर . जे . पवार यांची भेट घेऊन अवकाळी पाऊस नुकसाणीबाबत चर्चा केली.  तसेच मागण्यांबाबत  निवेदनही दिले . यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , तालुकाप्रमुख शैलेश भोगले , प्रथमेश सावंत , संदेश पटेल , अॅड . हर्षद गावडे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम सावंत - पालव , उपजिल्हाप्रमुख राजू शेटये , सुजित जाधव , नगरसवक सुशांत नाईक , माहि परूळेकर , कन्हैया पारकर , प्रतिक्षा साटम , साक्षी आमडोसकर , राजू राठोड , राजू राणे , प्रसाद अंधारी , शेखर राणे , भालचंद्र दळवी . धनंजय सावंत , शरद वायंगणकर , रुपेश आमडोसकर , बंडू ठाकूर , अविनाश सापळे , उमेश घाडीगांवकर , दिलीप मर्ये , रिमेश चव्हाण , संजना कोलते , आनंद आचरेकर , प्रतिक्षा साटम , मिनल म्हसकर , विलास गुडेकर , जयबा कुरेशी , आनंद आचरेकर , सोमा गायकवाड , नासिर खान , अनुप वारंग , वाय . डी . सावंत यांच्यासहीत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

            यावेळी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६०७२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे . त्याबाबत पंचनामे करून अहवाल गेला असून आतापर्यंत १ कोटी १५ लाख रुपये जमा झालेले आहेत . रक्कम तत्काळ वाटप करण्यात येत असल्याचे तहसिलदार पवार यांनी स्पष्ट केले .          शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रती हेक्टरी ५० ते ६० हजार खर्च येतो . मात्र , राज्यपालांनी ८ हजार रुपये हेक्टरी भरपाई जहिर केली . ती भरपाई तुटपुंजी आहे . शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तरी भरपाई मिळाली पाहिजे . तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचे प्रती हेक्टरी ६ हजार रुपये अद्याप जमा झालेले नाहीत . ही रक्कम त्वरीत जमा झाली पाहिजे . पिक विमा योजनेची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही . ती लवकरात लवकर मिळावी .

         बऱ्याच ठिकाणी शेतकरी कसत असलेले क्षेत्र हे देवस्थान इनाम किंवा कुळ अगर तोंडी कराराने कसत असतात . त्यामुळे भरपाईची रक्कम अदा करताना खात्री करण्यात यावी . खरीप हंगामामध्ये जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून जिल्ह्यात सुमारे ८० कोटी एवढी रक्कम पिक कर्ज म्हणून वाटप करण्यात आलेली आहे .

             या पिककर्जाचे मुद्दल व व्याज माफ करण्यात यावे . ज्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे . अशांच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर पंचनामा  होऊन त्यांनाही योग्य ती भरपाई मिळावी . अतिवृष्टीमुळे गुरांसाठी असलेला  चारा कुजून गेला आहे . त्यामुळे पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान वा चारा छावणी उभारण्यात यावी .

             तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक खावटी कर्ज घेतेलले आहे . या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ खाली कर्जमाफी जाहिर झाली असून त्यांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना नविन कर्ज घेता येत नाही व व्याजाचा बोजाही वाढत आहे .त्यामुळे खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली . शेतकरी सन्मान योजनेची रक्कम जिल्हा बँकेतील खात्यांमध्ये जमा होत नाही , ती होण्याच्यादृष्टीने कार्यवाहीची करण्यात यावी . अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

कणकवली तहसीलदार आर जे पवार यांना सोमवारी शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश पारकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुजित जाधव, नीलम सावंत- पालव , हर्षद गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना