शहरं
Join us  
Trending Stories
1
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: SC
2
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
3
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
4
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
7
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
8
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
9
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
10
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
11
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
12
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
13
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
14
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
15
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
16
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
17
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
18
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
19
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
20
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना त्वरित न्याय द्या ! ;- शिवसेनेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2019 17:23 IST

त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देकणकवली तहसीलदारांना निवेदन

 

कणकवली : अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे . या शेतकऱ्यांना हेक्टरी ८ हजार रुपये नुकसान  भरपाई राज्यपालांनी मंजूर केली आहे . मात्र , ही भरपाई आम्हाला मान्य नाही.  हेक्टरी ५० ते ६० हजार रुपये भरपाई द्यावी , अशी मागणी यापूर्वी आम्ही केली होती . त्यामुळे  शेतकऱ्यांना हेक्टरी किमान २५ हजार रुपये तरी  भरपाई मिळालीच पाहिजे. तसेच शेतकऱ्यांचे शेतीकर्ज तत्काळ माफ करण्यात यावे , अशी मागणी शिवसेनेच्यातीने एका निवेदनाद्वारे कणकवली  तहसिलदारांकडे करण्यात आली आहे.

       कणकवली तालुका शिवसेनेच्या शिष्टमंडळाने  सोमवारी तहसिलदार आर . जे . पवार यांची भेट घेऊन अवकाळी पाऊस नुकसाणीबाबत चर्चा केली.  तसेच मागण्यांबाबत  निवेदनही दिले . यावेळी कोकण सिंचन महामंडळाचे माजी उपाध्यक्ष संदेश पारकर , तालुकाप्रमुख शैलेश भोगले , प्रथमेश सावंत , संदेश पटेल , अॅड . हर्षद गावडे , महिला आघाडी जिल्हाप्रमुख निलम सावंत - पालव , उपजिल्हाप्रमुख राजू शेटये , सुजित जाधव , नगरसवक सुशांत नाईक , माहि परूळेकर , कन्हैया पारकर , प्रतिक्षा साटम , साक्षी आमडोसकर , राजू राठोड , राजू राणे , प्रसाद अंधारी , शेखर राणे , भालचंद्र दळवी . धनंजय सावंत , शरद वायंगणकर , रुपेश आमडोसकर , बंडू ठाकूर , अविनाश सापळे , उमेश घाडीगांवकर , दिलीप मर्ये , रिमेश चव्हाण , संजना कोलते , आनंद आचरेकर , प्रतिक्षा साटम , मिनल म्हसकर , विलास गुडेकर , जयबा कुरेशी , आनंद आचरेकर , सोमा गायकवाड , नासिर खान , अनुप वारंग , वाय . डी . सावंत यांच्यासहीत शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

            यावेळी कणकवली तालुक्यातील शेतकऱ्यांचे ६०७२ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे . त्याबाबत पंचनामे करून अहवाल गेला असून आतापर्यंत १ कोटी १५ लाख रुपये जमा झालेले आहेत . रक्कम तत्काळ वाटप करण्यात येत असल्याचे तहसिलदार पवार यांनी स्पष्ट केले .          शिवसेनेच्या शिष्टमंडळाने तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शेतकऱ्यांना शेतीसाठी प्रती हेक्टरी ५० ते ६० हजार खर्च येतो . मात्र , राज्यपालांनी ८ हजार रुपये हेक्टरी भरपाई जहिर केली . ती भरपाई तुटपुंजी आहे . शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपये तरी भरपाई मिळाली पाहिजे . तसेच शेतकऱ्यांना प्रधानमंत्री सन्मान योजनेचे प्रती हेक्टरी ६ हजार रुपये अद्याप जमा झालेले नाहीत . ही रक्कम त्वरीत जमा झाली पाहिजे . पिक विमा योजनेची रक्कम अद्याप शेतकऱ्यांना मिळालेली नाही . ती लवकरात लवकर मिळावी .

         बऱ्याच ठिकाणी शेतकरी कसत असलेले क्षेत्र हे देवस्थान इनाम किंवा कुळ अगर तोंडी कराराने कसत असतात . त्यामुळे भरपाईची रक्कम अदा करताना खात्री करण्यात यावी . खरीप हंगामामध्ये जिल्हा बँक व राष्ट्रीयकृत बँका यांच्याकडून जिल्ह्यात सुमारे ८० कोटी एवढी रक्कम पिक कर्ज म्हणून वाटप करण्यात आलेली आहे .

             या पिककर्जाचे मुद्दल व व्याज माफ करण्यात यावे . ज्या शेतकऱ्यांच्या मालमत्तेचे नुकसान झालेले आहे . अशांच्या बाबतीत व्यक्तिगत पातळीवर पंचनामा  होऊन त्यांनाही योग्य ती भरपाई मिळावी . अतिवृष्टीमुळे गुरांसाठी असलेला  चारा कुजून गेला आहे . त्यामुळे पशुधन असणाऱ्या शेतकऱ्यांना चाऱ्यासाठी अनुदान वा चारा छावणी उभारण्यात यावी .

             तालुक्यातील शेतकऱ्यांनी शेतीपुरक खावटी कर्ज घेतेलले आहे . या शेतकऱ्यांना छत्रपती शिवाजी महाराज सन्मान योजना २०१७ खाली कर्जमाफी जाहिर झाली असून त्यांचा लाभ अद्यापही शेतकऱ्यांना मिळालेला नाही . त्यामुळे शेतकऱ्यांना नविन कर्ज घेता येत नाही व व्याजाचा बोजाही वाढत आहे .त्यामुळे खावटी कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांना तत्काळ कर्जमाफी मिळावी , अशी मागणी यावेळी करण्यात आली . शेतकरी सन्मान योजनेची रक्कम जिल्हा बँकेतील खात्यांमध्ये जमा होत नाही , ती होण्याच्यादृष्टीने कार्यवाहीची करण्यात यावी . अशा विविध मागण्या या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत. 

कणकवली तहसीलदार आर जे पवार यांना सोमवारी शिवसेनेच्यावतीने निवेदन देण्यात आले. यावेळी संदेश पारकर, शैलेश भोगले, प्रथमेश सावंत, सुजित जाधव, नीलम सावंत- पालव , हर्षद गावडे आदी उपस्थित होते.

टॅग्स :konkanकोकणsindhudurgसिंधुदुर्गShiv Senaशिवसेना