शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

चमत्काराची ‘गंगा’ अजूनही प्रवाहीतच

By admin | Updated: April 28, 2015 00:22 IST

मूळ प्रवाह बंद : चौदापैकी तेरा कुंडात मात्र पाणीच पाणी

राजापूर : गेल्या तीन वर्षांच्या काळात राजापूरच्या या जगप्रसिध्द गंगामाईचे प्रवाहीत राहण्याच्या कालखंडाचे उच्चांकावर उच्चांक होत राहिले आणि राजापूरच्या गंगामाईचे आजपर्यंत विज्ञानालाही न सुटणारे कोडे कायम राहिले आहे. मात्र, आता चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला असला तरी उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी असल्यामुळे हाही एक नवीनच चमत्कार मानला जात आहे. राजापूरची गंगा अवतीर्ण झाल्यानंतर आपल्या अनिश्चित स्वरुपाच्या कालावधीतील वास्तव्यात गंगामाता हजारो भाविकांना स्नान घडवते. साधारणपणे तेराव्या शतकापासून नियमितपणे पण अनियमित काळाने प्रवाहरुप होऊन भक्तांच्या पापक्षालनासाठी राजापूरनजीकच्या उन्हाळे गावच्या डोंगरावर प्रकट होणारी गंगा म्हणजे सृष्टीदेवतेचा एक अद्भूत चमत्कारच मानला जातो. त्यामुळे आता मूळ गंगा अंतर्धान पावल्यानंतरही इतर तेरा कुंडांमध्ये असणारे गंगेचे पाणी हाही एक चमत्कारच मानला जात आहे.दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा अंतर्धान पावल्यानंतर मूळ गंगा कुडांपाठोपाठ इतर तेरा कुंडेही कोरडी पडतात. मात्र, यावेळी मूळ गंगा प्रवाह जानेवारी महिन्यात बंद झाला असला तरी आजपर्यंत गंगाक्षेत्रावरील चंद्र्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंंड, भिमा कुंड, चंद्रभागा कुंंड यासह काशीकुंडामध्येही गंगाप्रवाह सुरु आहे. ही कुंडे अद्याप कोरडी पडलेली नाहीत. एरव्ही गंगा अंतर्धान पावल्यानंतर ऐन पावसाळ्याच्या काळातही ही सर्व कुंडे कोरडीच असतात. या कुंडांमध्ये जराही पाणी साचून राहात नाही. आजच्या घडीला काशीकुडांचे पाणी गोमुखातून वाहत नसले तरी काशीकुडांच्या मध्यभागी असणाऱ्या साधारण सात ते आठ फूट उंच भागामध्ये अद्याप पाणी आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून राजापुरात गंगा अवतीर्ण होत आहे. मात्र, तेव्हापासून असा चमत्कार कधी झाल्याच्या नोंदी इतिहासात आढळून येत नाहीत. गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात आहे. मात्र, मूळगंगा कुंडाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या चंद्रभागा कुंडामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून सर्वकाळ पाणी राहायचे, असे गंगापूत्र सांगतात. मात्र, यावेळी हा नवीनच चमत्कार झाला आहे. राजापूरची गंगा हा एक अद्भूत चमत्कार मानला जात असून, आताच्या नवीन चमत्कारानेही भाविक नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत. (प्रतिनिधी)चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद.उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी.गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात.गंगेचा आणखी एक चमत्कार.