शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
3
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
4
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
5
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
6
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
7
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
8
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
9
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
10
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
11
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
12
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
13
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
14
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
15
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
16
पार्थ अजित पवार जमीन प्रकरणात शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “समाजासमोर वास्तव...”
17
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...
18
उपाशी ठेवलं, बेदम मारलं... पोटच्या लेकाने, सुनेने जमिनीसाठी केले जन्मदात्या आईचे हालहाल
19
"वहिनी, तुमची जोडी जमत नाही, हे काका कोण?", रील्सचं वेड, सर्वस्व असलेल्या नवऱ्याच संपवलं
20
Viral Video: मिरची पूड घेऊन ज्वेलर्समध्ये शिरली, पण प्लॅन फसला! दुकानदारानं २० वेळा थोबाडलं

चमत्काराची ‘गंगा’ अजूनही प्रवाहीतच

By admin | Updated: April 28, 2015 00:22 IST

मूळ प्रवाह बंद : चौदापैकी तेरा कुंडात मात्र पाणीच पाणी

राजापूर : गेल्या तीन वर्षांच्या काळात राजापूरच्या या जगप्रसिध्द गंगामाईचे प्रवाहीत राहण्याच्या कालखंडाचे उच्चांकावर उच्चांक होत राहिले आणि राजापूरच्या गंगामाईचे आजपर्यंत विज्ञानालाही न सुटणारे कोडे कायम राहिले आहे. मात्र, आता चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद झाला असला तरी उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी असल्यामुळे हाही एक नवीनच चमत्कार मानला जात आहे. राजापूरची गंगा अवतीर्ण झाल्यानंतर आपल्या अनिश्चित स्वरुपाच्या कालावधीतील वास्तव्यात गंगामाता हजारो भाविकांना स्नान घडवते. साधारणपणे तेराव्या शतकापासून नियमितपणे पण अनियमित काळाने प्रवाहरुप होऊन भक्तांच्या पापक्षालनासाठी राजापूरनजीकच्या उन्हाळे गावच्या डोंगरावर प्रकट होणारी गंगा म्हणजे सृष्टीदेवतेचा एक अद्भूत चमत्कारच मानला जातो. त्यामुळे आता मूळ गंगा अंतर्धान पावल्यानंतरही इतर तेरा कुंडांमध्ये असणारे गंगेचे पाणी हाही एक चमत्कारच मानला जात आहे.दर तीन वर्षांनी प्रकट होणारी राजापूरची गंगा अंतर्धान पावल्यानंतर मूळ गंगा कुडांपाठोपाठ इतर तेरा कुंडेही कोरडी पडतात. मात्र, यावेळी मूळ गंगा प्रवाह जानेवारी महिन्यात बंद झाला असला तरी आजपर्यंत गंगाक्षेत्रावरील चंद्र्रकुंड, सूर्यकुंड, बाणकुंड, यमुनाकुंड, सरस्वती कुंड, गोदावरी कुंंड, कृष्णकुंड, नर्मदा कुंड, कावेरी कुंड, अग्निकुंंड, भिमा कुंड, चंद्रभागा कुंंड यासह काशीकुंडामध्येही गंगाप्रवाह सुरु आहे. ही कुंडे अद्याप कोरडी पडलेली नाहीत. एरव्ही गंगा अंतर्धान पावल्यानंतर ऐन पावसाळ्याच्या काळातही ही सर्व कुंडे कोरडीच असतात. या कुंडांमध्ये जराही पाणी साचून राहात नाही. आजच्या घडीला काशीकुडांचे पाणी गोमुखातून वाहत नसले तरी काशीकुडांच्या मध्यभागी असणाऱ्या साधारण सात ते आठ फूट उंच भागामध्ये अद्याप पाणी आहे. सुमारे सातशे वर्षांपूर्वीपासून राजापुरात गंगा अवतीर्ण होत आहे. मात्र, तेव्हापासून असा चमत्कार कधी झाल्याच्या नोंदी इतिहासात आढळून येत नाहीत. गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात आहे. मात्र, मूळगंगा कुंडाच्या वरच्या बाजूला असणाऱ्या चंद्रभागा कुंडामध्ये गेल्या दहा-बारा वर्षांपासून सर्वकाळ पाणी राहायचे, असे गंगापूत्र सांगतात. मात्र, यावेळी हा नवीनच चमत्कार झाला आहे. राजापूरची गंगा हा एक अद्भूत चमत्कार मानला जात असून, आताच्या नवीन चमत्कारानेही भाविक नतमस्तक झाल्याशिवाय राहात नाहीत. (प्रतिनिधी)चार महिन्यांपूर्वी मूळ गंगा उगम स्थानातून येणारा पाण्याचा प्रवाह बंद.उर्वरित चौदापैकी तेरा कुंडांमध्ये अद्याप पाणी.गंगा अंतर्धान पावल्यानंतर गंगाक्षेत्री असणारी सर्व कुंडे पूर्ण सुकून जातात, असाच प्रघात.गंगेचा आणखी एक चमत्कार.