शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

Ganeshotsav: गणेशोत्सवात भाविकांसाठी आनंदाची बातमी, चिपी विमानतळावरून आणखी एक विमान करणार उड्डाण!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2022 20:53 IST

Sindhudurg Airport: चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच १८ ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे.

- सुधीर राणे कणकवली: चिपी विमानतळावरून सध्या सुटत असलेल्या विमानासोबतच १८ ऑगस्टपासून आणखी एका विमानाचे उड्डाण होणार आहे. पर्यटनाच्या माध्यमातून सिंधुदुर्ग जिल्हा विकासाला चालना देण्यासाठी येथून आणखीन विमानाची सोय करण्यात यावी.अशी मागणी आपण केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्याकडे काही महिन्यांपूर्वी केली होती . त्या मागणीला यश आले असून चाकरमान्यांसाठी ही आनंदाची बातमी असल्याचे आमदार नितेश राणे यांनी सांगितले .

कणकवली येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. नितेश राणे म्हणाले , चिपी विमानतळावरून ७० आसनी एक विमान उड्डाण करीत होते . परंतु खऱ्या अर्थाने सिंधुदुर्गातील पर्यटन वाढवायचे असेल तर अजून एखाद्या तरी विमानाचे उड्डाण चिपी येथून व्हावे. अशी विनंती आपण केंद्रीय मंत्र्यांना केली होती. त्यानुसार आता गणेशोत्सवासाठी हे विशेष विमान सोडण्यात येणार आहे . १८ ऑगस्टपासून या विमान उड्डाणाला सुरूवात होईल . सध्या नियमित सुटणारे विमान सकाळी ११.३० वाजता मुंबईहून उडते व १२.५० वाजता चीपी येथे पोहोचते. तर दुपारी १.३० वाजता मुंबईकडे जाण्यासाठी ते परत उडते व ३ वाजता मुंबईला पोहोचते . १८ ऑगस्ट पासून सोडण्यात येणारे विमान हे दुपारी ३ वाजता मुंबईहून सुटणार असून ४.२० वाजता चिपी येथे पोहोचणार आहे . तर ४.४५ वाजता मुंबईच्या दिशेने झेप घेणार असून सायंकाळी सहा वाजता मुंबईला पोहोचणार आहे . त्यामुळे जिल्ह्यात येणारे चाकरमानी व नागरिकांची गैरसोय बऱ्यापैकी दूर होणार आहे .

आपण केलेल्या मागणीनुसार केंद्रीयमंत्री ज्योतिरादित्य शिंदे तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे , एअर अलायन्सचे प्रमुख तसेच वीरेंद्र म्हैसकर , अदानी एअरपोर्ट व इतरांनी यासाठी जे सहकार्य केले त्या सर्वांचे आपण आभार मानतो. सध्याच्या ७० प्रवासी क्षमतेच्या बरोबरीने आणखी ७० प्रवासी क्षमता असलेले विमान आता उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सकाळी कामासाठी आलेला माणूस सायंकाळपर्यंत परत मुंबईला जाऊ शकणार आहे . पर्यटनासोबतच चाकरमान्यांसाठी हे सोयीचे होणार आहे . त्यासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याला यश आल्याचे नितेश राणे यांनी यावेळी सांगितले . 

टॅग्स :Chipi airportचिपी विमानतळsindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे