शहरं
Join us  
Trending Stories
1
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
2
'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
3
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
4
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
5
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
6
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?
7
झेलेन्स्की यांना बोलावले, पुतिन यांच्याशीही पुन्हा चर्चा करणार; अलास्का बैठकीनंतर डोनाल्ड ट्रम्प यांची नवी तयारी
8
घर खरेदीचा प्लॅन करत असलेल्यांच्या स्वप्नांना SBI चा मोठा झटका...; RBI नं दिलासा देऊनही होम लोनचा टक्का वाढवला!
9
Dewald Brevis Fastest Fifty Record : 'बेबी एबी'चं वादळी अर्धशतक; ११ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
10
'शोले'तल्या भूमिकेसाठी या मराठमोळ्या अभिनेत्याला पैशांऐवजी देण्यात आलेला फ्रिज, वाचा हा किस्सा
11
Trump Putin: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुतीन यांना दिलं पत्नी मेलानिया यांचं पत्र; 'त्या' पत्रात काय लिहिलंय?
12
५ हजारांपासून ४० हजार कोटींपर्यंतचा प्रवास: 'बिग बुल' राकेश झुनझुनवालांना उगाचचं नव्हते म्हणत दलाल स्ट्रीटचे जादूगार
13
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ लावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकून वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
14
'विरोधकांची विकास विरोधी हंडी जनतेने फोडली'; उपमुख्यमंत्री शिंदेंचा महाविकास आघाडीवर हल्ला
15
Barvi Dam: ठाणेकरांची चिंता मिटली! बारवी धरण १०० टक्के भरले; सात दरवाजे उघडले
16
‘बंगाल फाइल्स’चा ट्रेलर लॉन्च होताच कोलकात्यात वाद, बोलवावे लागले पोलीस, विवेक अग्निहोत्री म्हणाले...  
17
Shravan Somvar 2025: इच्छित मनोकामनापूर्तीसाठी शेवटच्या श्रावणी सोमवारी चुकवू नका 'हा' उपाय!
18
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
19
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
20
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या

घर बांधणीसाठी ग्रामपंचायतींना अधिकार दिल्याची योजना फसवी- सभेत देसाई यांचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2020 17:17 IST

zp, sindhudurgnews, onlinemeeting ग्रामपंचायत क्षेत्रात घर बांधण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींना परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची घोषणाही पूर्णपणे फसवी घोषणा असून पूर्वीप्रमाणे घरबांधणीचे परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतला मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांना फसवण्यासाठी ही घोषणा केली असल्याचा आरोप स्थायी समिती सभेत सदस्य रणजीत देसाई तसेच जिल्हा परिषद सत्ताधारी सदस्यांनी केली.

ठळक मुद्देघर बांधणीसाठी ग्रामपंचायतींना अधिकार दिल्याची योजना फसवीजिल्हा परिषद स्थायी समिती सभेत रणजित देसाई यांचा आरोप

सिंधुदुर्ग : ग्रामपंचायत क्षेत्रात घर बांधण्यासाठी आता पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींना परवानगी देण्याचे अधिकार देण्यात आले असल्याची घोषणाही पूर्णपणे फसवी घोषणा असून पूर्वीप्रमाणे घरबांधणीचे परवानगी देण्याचे अधिकार ग्रामपंचायतला मिळालेले नाहीत ही वस्तुस्थिती आहे. मात्र लोकांच्या डोळ्यात धूळफेक करून त्यांना फसवण्यासाठी ही घोषणा केली असल्याचा आरोप स्थायी समिती सभेत सदस्य रणजीत देसाई तसेच जिल्हा परिषद सत्ताधारी सदस्यांनी केली.

घर बांधण्याची परवानगी ग्रामपंचायतींना देता येणार आहे. मात्र त्यासाठी नगर विकास विभागाच्या नियमांना अधीन राहून ही परवानगी देता येईल अशी अट असल्याने हा नियम चुकीचा असल्याने याचा लोकांना अधिक त्रास होणार आहे असे या सभेत सदस्यांनी नमूद केलेजिल्हा परिषदेची स्थायी समितीची सभा ऑनलाइन पद्धतीने जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर, उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, विषय समिती सभापती बाळा जठार, सावी लोके, शारदा कांबळे, समिती सदस्य रणजित देसाई, कमलाकांत उर्फ दादा कुबल, संतोष साठविलकर, संजय पडते, अमरसेन सावंत, संजना सावंत, समिती सचिव तथा उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर सर्व खाते प्रमुख आदी उपस्थित होतेगुरुवारी झालेल्या स्थायी समिती सभेत ग्रामपंचायत क्षेत्रातील घर बांधणी परवानगी विषय. न्यायालयीन बाबीत अडकलेला मालवण तालुक्यातील पेंडूर मोगरणे रस्ता, दोडामार्ग तालुक्यातील रस्त्यांची संयुक्त करावयाची पाहणी, यापुढे ऑनलाइन सभा नको, जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करावीत आदी विषय गाजले.अलीकडेच जिल्हा दौऱ्यावर आलेले महसूल राज्यमंत्री सत्ता यांनी महाराष्ट्र शासनाने यापुढे घरबांधणीचे अधिकार पूर्वीप्रमाणे ग्रामपंचायतींना दिले असल्याचे जाहीर केले आहे याबाबतची खरी वस्तुस्थिती सभागृहात ठेवावी, अशी मागणी जिल्हा परिषद सदस्य रणजित देसाई यांनी केली. यावर २०१८ च्या शासन निर्णयानुसार ग्रामपंचायतींना प्राधिकार निश्चित करण्यात आले असून गावठाण क्षेत्र आणि गावठाण क्षेत्राबाहेरील क्षेत्रामध्ये घर बांधण्यासाठी किंवा इमारत बांधण्यासाठी ग्रामपंचायतींनी नगरविकास विभागाच्या नियमांना अधीन राहून परवानगी द्यावयाची आहे, असा शासन निर्णय असल्याचे ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी सांगितले. यावरून सदस्य रणजित देसाई व सत्ताधारी सदस्य आक्रमक झाले आणि राज्यमंत्र्यांनी केलेली घोषणा फसवी आहे हा शासनाचा निर्णय लोकांच्या डोळ्यात धूळ फेकण्यासारखा आहे हा नियम चुकीचा आहे. यामुळे लोकांचे नुकसान होणार आहे असा आरोप केला.या सभेत मालवण तालुक्यातील पेंडूर मोगरणी या रस्त्याचा विषयी मोठ्या प्रमाणात गाजला. सदस्य संतोष साटविलकर यांनी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत सुमारे ५६ लाख रुपये खर्च झालेल्या या रस्त्याचे प्रकरण न्यायालयात गेले असून या रस्त्याच्या कामाला स्थगिती मिळाली आहे. यामुळे गेली पाच वर्ष हा रस्ता तसाच पडला आहे. या रस्त्याच्या स्थितीला जबाबदार कोण याची जबाबदारी निश्चित करावी आणि संबंधितांवर कारवाई करून या रस्त्याचा विषय लवकरात लवकर संपवावा, अशी मागणी केली. यावर वेळेत न्यायालयात बाजू मांडली गेली नाही याला जबाबदार कोण अधिकारी आहे त्याची जबाबदारी निश्चित करून त्याला नोटीस पाठवा असे आदेश देत या रस्त्यावरील न्यायालयीन बाब संपवावी यासाठी आवश्यक ती कारवाई सुरू करावी, असे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हेमंत वसेकर यांनी दिले.

दोडामार्ग तालुक्यातील प्रधानमंत्री व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कामांची संयुक्तरित्या पाहणी करण्याचे ठरले होते. त्यासाठी २८ ऑक्टोबर तारीख निश्चित करण्यात आली होती ती पाहणी का झाली नाही याबाबत जाब विचारण्यात आला.जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरू करावीतसिंधुदुर्ग किल्ला पर्यटकांसाठी खुला केला आहे त्याच प्रमाणे विजयदुर्ग किल्ला आणि जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे खुली करावीत, अशी मागणी उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर आणि रणजित देसाई यांनी केली. जिल्ह्यातील व्यवसायिक व्यापारी वर्ग या बंदमुळे हतबल झाले आहेत. त्यांना सावरणे आवश्यक आहे, यासाठी जिल्ह्यातील सर्व पर्यटन स्थळे सुरू करावीत, अशी मागणी या सभेत करण्यात आले. यासंबंधी जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांच्या कोरोनासाठी घेतलेल्या गाड्या सुस्थितीत लवकरात लवकर परत कराव्यात. देवगड तालुक्यातील पाणलोटच्या पाच बंधाऱ्यात पैकी दोन बंधाऱ्यांचे बिल २०१५ पासून पडलेली आहे हे तत्काळ देण्यात यावे.

टॅग्स :zpजिल्हा परिषदsindhudurgसिंधुदुर्गonlineऑनलाइन