शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प प्रशासनाचा नवा नियम! नवीन व्हिसा ऑर्डरनुसार, लठ्ठपणा किंवा मधुमेहामुळे अमेरिकेत प्रवेश मिळणार नाही; इतर आजारांचाही उल्लेख
2
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
3
हिवाळी अधिवेशन ८ डिसेंबरपासूनच, दोन आठवड्यांचे कामकाज; २८ नोव्हेंबरपासून सचिवालय नागपुरात, पत्र आले
4
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
5
सरकार कुणालाही पाठीशी घालणार नाही, अहवालात जो दोषी आढळेल त्याच्यावर कारवाई, जमीन घोटाळ्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची स्पष्टोक्ती
6
Women's World Cup : भारताच्या लेकींसह प्रेक्षकांनीही रचला इतिहास; ते पाहून ICC चा ऐतिहासिक निर्णय!
7
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
8
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
9
पाकिस्तानला बेकायदेशीर अणु कारवायांचा इतिहास, आम्ही ट्रम्प यांच्या विधानाची दखल घेतली: भारत सरकार
10
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
11
माझ्या नवऱ्याला महिन्यापासून दारु पाजून जरांगेविरुद्ध षडयंत्र रचलं; अमोल खुणेंच्या कुटुंबीयांनी सगळंच सांगितलं
12
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
13
IPL 2026 : डेफिनेटली! MS धोनी पुन्हा मैदानात उतरण्यास तयार; CSK च्या ताफ्यातील आतली गोष्ट आली समोर
14
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
15
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
16
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान
17
बेळगावमध्ये ऊस आंदोलन पेटले! हत्तरगी टोल नाक्यावर शेतकऱ्यांकडून दगडफेक
18
Maharashtra Crime: तुकाराम स्वत:च लपून बसला आणि अपहरणाचा बनाव केला; पण असं का केलं?
19
"धन्या, तू आता पक्का अडकला"; धनंजय मुंडेंचा एकेरी उल्लेख, मनोज जरांगेंनी थेट ऑडिओ क्लिपच ऐकवली
20
AI Industry: 'एआय'चा फुगा फुटू लागला? अमेरिकेमध्ये १.५ लाख लोकांनी नोकऱ्या गमावल्या; गुंतवणूकदारही झाले अलर्ट

कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 10:36 IST

कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.

ठळक मुद्दे कचरा प्रकल्पातून प्रत्येकावर पाच लाखांचा पडणार बोजा : विनायक राऊत शासनाचे अनुदान लाटण्यासाठी, बँक कर्ज बुडविण्यासाठी प्रकल्प

कणकवली : कणकवलीत होणारा ९०० कोटींचा कचरा प्रकल्प हा महाघोटाळा आहे. हा प्रकल्प बंद पडला तर प्रत्येक कणकवलीकराच्या डोक्यावर पाच लाख रुपये कर्जाचा बोजा पडणार आहे, असा आरोप करतानाच या कचरा प्रकल्पाची सखोल चौकशी करावी अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री तथा नगरविकासमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याची माहिती खासदार विनायक राऊत यांनी येथे दिली.कणकवली शहरात ९०० कोटींचा कचरा प्रकल्प उभारला जात आहे. या कचरा प्रकल्पाबाबत शिवसेना-भाजप महायुतीच्या नेत्यांनी आक्षेप घेत हा प्रकल्प म्हणजे जनतेची फसवणूक असल्याचा आरोप कणकवली येथील विजय भवनमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत केला.यावेळी खासदार विनायक राऊत, भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार, भाजप नेते संदेश पारकर आदींनी कचरा प्रकल्पावर टीका केली. यावेळी अतुल रावराणे, नगरसेवक सुशांत नाईक, शैलेश भोगले, हर्षद गावडे, रुपेश नार्वेकर, सुजित जाधव तसेच शिवसेना-भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी विनायक राऊत म्हणाले, ए.जी.डॉटर्स या कंपनीने दिल्ली गाझियाबाद तसेच पटना आणि कणकवली येथील नगरपालिकांबरोबर कचरा प्रकल्पाबाबत करार केलेले आहेत. मात्र, हा प्रकल्प केंद्र शासनाची सबसिडी आणि बँकांचे कर्ज लाटण्यासाठी केला जात आहे.कणकवली नगरपंचायतीने केलेल्या करारपत्रात या ९०० कोटींच्या कचरा प्रकल्पासाठी नारायण राणे कुटुंबीयांच्या अखत्यारित असलेल्या विविध आस्थापनांबरोबरच इंजिनिअरिंग कॉलेजमधून २ टन, मातोश्री वृद्धाश्रमातून ३ टन तसेच जिल्हा परिषद १२५ टन, दोडामार्ग नगरपंचायत ३ टन कचरा मिळणार असल्याची आकडेवारी समाविष्ट केलेली आहे. एवढा कचरा त्या ठिकाणाहून कसा मिळू शकेल? हे एक मोठे कोडेच आहे.सत्य डोळ्यासमोर मांडण्याचा प्रयत्नकणकवलीवासीयांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा चढेल. त्यामुळे जनतेला त्रास होईल अशी कोणतीही कृती त्यांच्याकडून होणार नाही यासाठी प्रयत्न करण्यात येतील.  या प्रकल्पाचे सत्य आम्ही जनतेसमोर मांडत आहोत, असेही विनायक राऊत यावेळी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVinayak Rautविनायक राऊत