शहरं
Join us  
Trending Stories
1
RR vs KKR सामना रद्द! समान १७ गुण असूनही SRH क्वालिफायर १ साठी पात्र, जाणून घ्या कारण
2
इराणचे राष्ट्रपती रईसी यांची हत्या? अमेरिकेने व्यक्त केला संशय, बोलावली तातडीची बैठक 
3
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
4
EVM वर ८ वेळा मतदान करताना दिसला तरुण, व्हिडीओ व्हायरल, राहुल गांधींनी दिला सक्त इशारा
5
राहुल गांधी, राजनाथ सिंह, श्रीकांत शिंदे, स्मृती इराणी...पाचव्या टप्प्यातील हायप्रोफाईल लढती
6
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
7
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
8
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
9
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
10
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
11
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
12
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
13
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
14
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
15
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
16
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
17
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
18
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
19
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
20
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?

ST Strike : कणकवली-सावंतवाडी मार्गावर २८ दिवसानंतर धावली पहिली लालपरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2021 4:38 PM

उद्या, मंगळवार पासून आणखी काही कर्मचारी सेवेत रूजू होतील. त्यामुळे आणखी एस.टी. फेर्‍या सुरू होतील असा विश्‍वास विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला.

कणकवली : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. सरकारने एसटी कर्मचाऱ्यांच्या पगार वाढ करुन यावर तोडगा देखील काढला. तरी कर्मचारी आपल्या मागण्यावर ठाम आहेत. सरकारने अनेक कर्मचाऱ्यांवर बडतर्फेची कारवाई केली आहे. तर काही कर्मचारी कारवाईच्या भितीपोटी कामावर हजर झाले आहेत. परिणामी एसटीची वाहतूक काही प्रमाणात सुरु झाली आहे.सिंधुदुर्गातील एस.टी. कर्मचारी ही गेल्या २८ दिवसांपासून संपावर आहेत. यात सर्व चालक, वाहक आणि यांत्रिकी कर्मचारी सहभागी झाल्याने एकही एस.टी.फेरी सुटली नव्हती. मात्र, सोमवारी कणकवली-सावंतवाडी मार्गावर पहिली एस.टी. बस फेरी रवाना झाली.यावेळी वाहकाची जबाबदारी बसस्थानकातील वाहतूक नियंत्रकावर देण्यात आली होती. मंगळवार पासून आणखी काही कर्मचारी सेवेत रूजू होतील. त्यामुळे आणखी एस.टी. फेर्‍या सुरू होतील असा विश्‍वास विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी व्यक्त केला.कणकवली बसस्थानकात दुपारी दोन वाजता सुटलेल्या कणकवली-सावंतवाडी एस.टी. बसचा शुभारंभ विभाग नियंत्रक प्रकाश रसाळ यांनी केला. यावेळी आगार व्यवस्थापक प्रमोद यादव, कणकवली पोलिस निरीक्षक सचिन हुंदळेकर तसेच इतर एस.टी. अधिकारी उपस्थित होते. कणकवली स्थानकातून चार प्रवासी सावंतवाडीच्या दिशेने मार्गस्थ झाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गST Strikeएसटी संप