शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

काजू बागायतीला आग, शिवडावातील घटना, दोन कुटुंबांत हाणामारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 11:04 IST

शिवडाव ओटोसवाडी येथील १५ ते २० एकर परिसरातील काजू, आंबा, माड बागायती असलेल्या ठिकाणी दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत त्या परिसरातील ८ ते १० शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणत असताना दोन सावंत कुटुंबीयांची आग लावल्याच्या संशयावरून शाब्दीक बाचाबाची होऊन मारहाणीचा प्रकार घडला. त्यात दत्तराज लक्ष्मण सावंत हे जखमी झाले आहेत.

ठळक मुद्देकाजू बागायतीला आग, शिवडावातील घटना : आगीत घर बचावलेआग प्रकरणावरुन दोन कुटुंबांत हाणामारी

कणकवली : शिवडाव ओटोसवाडी येथील १५ ते २० एकर परिसरातील काजू, आंबा, माड बागायती असलेल्या ठिकाणी दुपारी अचानक आग लागली. या भीषण आगीत त्या परिसरातील ८ ते १० शेतकऱ्यांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. आग आटोक्यात आणत असताना दोन सावंत कुटुंबीयांची आग लावल्याच्या संशयावरून शाब्दीक बाचाबाची होऊन मारहाणीचा प्रकार घडला. त्यात दत्तराज लक्ष्मण सावंत हे जखमी झाले आहेत.याबाबत अधिक माहिती अशी की, कणकवली तालुक्यातील शिवडाव-ओटोसवाडी पशुवैद्यकीय दवाखाना परिसरात माळरानावर शुक्रवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास आग लागली. यात गोरे यांचे घर वाचविण्यात ग्रामस्थांना यश आले. तर कित्येक एकरातील काजू, आंबा कलमे जळाली. ही आग विझवताना तेथील दोन सावंत कुटुंबात भांडण जुंपले. त्यानंतर हे प्रकरण हाणामारीपर्यंत गेले.

यात एका कुटुंबातील चार सदस्यांनी आपणास दांड्यानी मारहाण केल्याची तक्रार दत्तराज सावंत (४६) यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली. तर दत्तराज सावंत व इतरांनी आपल्या कुटुंबियास मारहाण केल्याची तक्रार मनीषा सावंत यांनी केली असून दोन्ही कुटुंबिय कणकवली पोलीस ठाण्यात दाखल झाले होते.लाखो रुपयांचे नुकसानदरम्यान, शिवडावच्या माळरानावरील आगीत उपेंद्र नाडकर्णी, रवी सावंत, दीपक सावंत, आत्माराम सावंत, प्रभाकर सावंत आदींच्या आंबा, काजू कलमांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती. अधिक तपास कणकवली पोलीस करीत आहेत.

टॅग्स :fireआगCrime Newsगुन्हेगारीsindhudurgसिंधुदुर्ग