शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Aacharya: लालू प्रसाद यादवांच्या घरात ज्यांच्यामुळे सुरू झालं 'महाभारत', ते संजय यादव कोण?
2
मुंबईत मोठी दुर्घटना! भायखळ्यातील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ मातीचा ढिगारा कोसळला; २ मजुरांचा मृत्यू, ३ जखमी
3
दिल्ली ब्लास्ट प्रकरण : आता पठानकोटमधून आणखी एका डॉक्टरला अटक, अल-फलाह विद्यापीठात केली होती नोकरी
4
IPL 2026: प्रितीच्या पंजाबनं ग्लेन मॅक्सवेलला दाखवला ठेंगा! कोच रिकी पाँटिंगनं सांगितली आतली गोष्ट
5
इराण देशभरातील लोकांच्या मोबाईल फोनवर 'इमरजन्सी अलर्ट' का पाठवत आहे?
6
अमेरिकेत महागाई वाढली, डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफवर घेतला यू-टर्न; भारताला मोठा फायदा होणार
7
जी मोटारसायकल चोरली, तिच्यावरच गेला जीव; मिरज रोडवर चोर ठार, कसा घडला अपघात?
8
Amravati Crime: छायाचा घरी येणाऱ्या विश्वंभरवर जडला जीव, पती प्रमोदची देवी दर्शनानंतर केली हत्या; लंघुशंकेसाठी थांबली अन्...
9
चुकूनही करू नका 'हे' काम, क्षणार्धात तुमचा मोबाईल फोन होऊ शकतो हॅक! गुगलने काय इशारा दिला?
10
नोकरी सोडून आयपीएस अधिकारी उतरले बिहार निवडणुकीच्या मैदानात; मराठमोळ्या लांडेंना किती मिळाली मते?
11
मशिदीचा पत्ता, मोबाइल SIM, थायलंड टूर अन्...! डॉ. शाहीन संदर्भात मोठा खुलासा; डॉ परवेझला कशासाठी नेलं होतं कानपूरला?
12
दिल्ली स्फोटापूर्वी उमर घाबरला होता, नवीन सीसीटीव्हीमध्ये खुलासा, दोन्ही फोन कुठे लपवले?
13
Ravindra Jadeja : जड्डूनं केली विक्रमांची 'बरसात'! WTC मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला
14
"रडायचं नाही लढायचं! बिहार निकालानं खचून जाऊ नका; मुंबई महापालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवा"
15
Travel : नवीन वर्ष परदेशात सेलिब्रेट करायचा विचार करताय? 'या' देशांमध्ये होऊ शकते खिशाला परवडणारी ट्रीप!
16
'भाजपाला फायदा करून देण्याची सुपारी घेतलीय का?'; काँग्रेसच्या स्वबळाच्या निर्णयावर शरद पवार गट नाराज
17
कुटुंबासोबतचे संबंधच तोडले, लालू प्रसाद यादवांच्या मुलीने आरोप केलेले रझीम कोण, राजदमध्ये काय घडलं?
18
अल फलाह युनिव्हर्सिटीवर क्राईम ब्रांचचा बडगा, UGC च्या तक्रारीवरून २ FIR दाखल
19
"अल्लाह करे भारत..."; नौगाम ब्लास्टवर फारूक अब्दुल्ला यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?
20
Rohini Acharya: "मी राजकारण सोडतेय आणि कुटुंबासोबतचे संबंधही तोडत आहे", लालू प्रसाद यादवांच्या मुलीच्या पोस्टने खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

कणकवली झेंडा चौकात भीषण आग; ३ दुकानांसह राहत्या घराला आगीची झळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2021 08:19 IST

कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे अचानक आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला.

कणकवली : कणकवली बाजरपेठेत सोमवारी पहाटे अचानक आगीचा प्रचंड प्रलय सुरू झाला. यात कणकवली झेंडाचौक येथील जय भारत कोल्ड्रिंक्स हाऊस जळून खाक झाले असून त्याशेजारील रामचंद्र बाबाजीशेठ उचले किराणा व आयुर्वेदिक दुकान आगीच्या भक्षस्थानी पडले . तर कोल्ड्रिंक्स हाऊस शेजारील अंधारी ब्रदर्स यांच्या दुकान व राहत्या घराला ही या आगीची झळ पोहचली . यावेळी कणकवली नगरपंचायतीच्या अग्निशामक बंबाद्वारे आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, सकाळपर्यंत पूर्णतः आग आटोक्यात आली नव्हती . 

दरम्यान , कणकवली झेंडा चौक येथील ३ दुकाने आगीच्या भक्षस्थानी सापडली आहेत . या आगीचे नेमके कारण समजले नसले तरी ही आग शॉट सर्किटने लागली असावी , असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे .  याबाबत अधिक माहिती अशी की पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बंद असलेल्या जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊस मधून मोठ्या प्रमाणात धुराचे व आगीचे लोट येवू लागले . त्या शेजारील राहत्या घरातील नागरिकांना याबाबत कल्पना आल्यानंतर त्यांनी तत्काळ याची माहिती इतर शेजाऱ्यांना दिली . तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण करण्यास सुरुवात केली होती.

तसेच या आगीने जयभारत कोल्ड्रिंक्स हाऊसला गिळकृत करतानाच ही आग उचले किराणा दुकानाच्या दिशेने सरकली . त्याचप्रमाणे अंधारी यांच्या दुकान व घराच्या दिशेने आगीचे लोट पसरले होते . त्यानंतर कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांना याबाबतची माहिती दिल्यानंतर त्यांनी तातडीने नगरपंचायतचा अग्नीशामक बंब घटनास्थळी पाठविला. बंब दाखल होताच आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला . 

दिलीप बिल्डकॉनचा पाण्याचा टँकर मागवत आग फैलावू नये म्हणून प्रयत्न करण्यात आले . मात्र , आग आटोक्यात येत नव्हती . भर बाजारपेठेत हे अग्नी तांडव सुरू झाल्याने आकाशात धुराचे लोट व आगीच्या ज्वाळा दिसत होत्या . नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्यासह नगरसेवक कन्हैया पारकर , पोलीस निरीक्षक संजय धुमाळ , भाई साटम , प्रसाद अंधारी , अमित सापळे , नाना सापळे , प्रद्युम मुंज , बापू पारकर , हर्षल अंधारी , आदित्य सापळे , आशिष वालावलकर आदी नागरिक तसेच कणकवली नगरपंचायतीचे कर्मचारी यांनी मदत कार्य केले .  या आगीत दुकान मालक आबा उचले , राजेंद्र बजाजी , नाथा अंधारी यांचे लाखों रुपयांचे नुकसान झाले आहे . तर आग आटोक्यात आणण्यासाठी कणकवली नगरपंचायतबरोबर मालवण , सावंतवाडी येथील अग्निशामक बंब मागविण्यात आला होता . मात्र हे बंब येण्यास वेळ लागणार असल्याने तसेच शेजारील घरे दाटीवाटीने असल्याने जेसीबीच्या साहाय्याने नुकसान टाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. 

टॅग्स :Kankavliकणकवलीfireआग