शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
3
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
4
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
5
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
6
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
7
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
8
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
9
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
10
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
11
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
12
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
13
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
14
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
15
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
16
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
17
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
18
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
19
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
20
बीडमध्ये कोळवाडीजवळ थरार! भरधाव डिझेल टँकरने रस्त्यावर घेतला पेट; प्रवाशांमध्ये दहशत
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 5, 2021 18:15 IST

Rain AgricultureSector Sindhudurg : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

ठळक मुद्देजिल्ह्यातील शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत अचानक विश्रांती : कडक ऊन पडत असल्याने चिंता

कणकवली : कणकवली तालुक्यासह जिल्ह्यात गेल्या महिन्यापासून अक्षरशः झोडपून काढलेल्या पावसाने आता अचानक विश्रांती घेतली आहे. गेले तीन दिवस कडक ऊन पडत असल्याने शेतकरी चिंतेत पडले आहेत. यापुढील कालावधीत कडक ऊन असेच पडल्यास भातशेती सुकून जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे.शेतकरी सध्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. मे महिन्याच्या मध्यांतरात तौक्ते चक्रीवादळ आल्याने, त्या कालावधीतच मुसळधार पाऊस कोसळला. यामुळे दरवर्षी अनेक ठिकाणी भेडसावणारी पाण्याची समस्या मात्र दूर झाली, तर शेत जमीन ओलीचिंब झाल्याने शेतकरीही सुखावला होता. त्यानंतर, पावसाचा ओघ कायमच राहिल्याने, अनेक शेतकऱ्यांनी मे महिन्यातच नांगरणीला सुरुवात केली होती.

दरवर्षी ही नांगरणी जूनच्या मध्यानंतर केली जाते. मात्र, पुरेशा पडलेल्या या पावसाने यावर्षी सारे काही चित्रच बदलून टाकले. त्यानंतर, शेती कामांना वेग येत पेरणी करून आता भात वाण लावणी योग्य झाले आहे.मात्र, गेल्या तीन दिवसांपासून पावसाने पाठ फिरविल्याचे चित्र दिसत आहे. दिवसभरात पावसाची तुरळक सर कोसळत असली, तरी तिचा भात शेतीसाठी उपयोग नाही. त्यामुळे मोठा पाऊस येणार की नाही, या चिंतेत शेतकरी पडला आहे. अधूनमधून काळे ढग येऊन पावसाचे चिन्ह निर्माण होत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत आहेत.शेतकरी मोठ्या अडचणीतजूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्या भाताचा कालावधी पूर्ण झाल्याने आता ते लावणीयोग्य झाले आहे. मात्र, पाऊस येण्याची चिन्हेच नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे.

पाऊस नसल्याने उंच भागातील जमिनीतील पाणी सुकून गेले आहे, तर गेल्या २ ते ४ दिवसांत लावणी केलेले भात पाऊस न पडल्यास सुकण्याची शक्यता आहे. यामुळे शेतकऱ्याचे डोळे नभाकडे लागून राहिले आहेत, तर काही भागांत शेती वाळून जाऊ नये, यासाठी कृत्रिम पाण्याचा उसपा करून शेतीला पाणी पुरविले जात आहे. भरडी शेती असलेले शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत. 

टॅग्स :Agriculture Sectorशेती क्षेत्रFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्गRainपाऊस