शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Sindhudurg: आम्हाला वाद नको; फक्त पाणी द्या; झरेबांबरमधील शेतकऱ्यांचे आंदोलन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 20, 2024 19:14 IST

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तुम्ही अधिकारी व प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांची चार वर्षांपासून थट्टा चालविली आहे. तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी ...

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तुम्ही अधिकारी व प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांची चार वर्षांपासून थट्टा चालविली आहे. तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी आमच्या शेतजमिनीत पोहोचावे, या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला व बातमी आली की, तुम्ही काम करता. तुमच्या शब्दांवर आम्ही वारंवार उपोषणे मागे घेतली. मात्र, आता आम्ही तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. नुकसानभरपाई न मागता आम्ही शेतकऱ्यांनी फक्त पाणी मिळावे यासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या. मात्र, तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहात. आम्हाला वाद नको, स्टंटबाजीही नको. आम्हाला फक्त पाणी हवे, अशी मागणी झरेबांबर येथील उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केली.झरेबांबर येथे तिलारी डाव्या कालव्यातून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी नेण्याच्या कामात वारंवार दिरंगाई होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे केली. मात्र, प्रत्येक वेळी या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. परिणामी, तिलारी पाटबंधारे विभागाच्या फसवणुकीला वैतागून झरेबांबर- आंबेली सरपंच अनिल शेटकर यांनी कालव्याच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास सरपंच शेटकर, ग्रामस्थ व शेतकरी कालव्याजवळ जमा झाले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता म्हेत्रे व पोलिसही दाखल झाले.

कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमारकनिष्ठ अभियंता म्हेत्रे यांनी जलसमाधी न घेण्याबाबत विनंती केल्याने कालव्याजवळच ठिय्या आंदोलन केले. म्हेत्रे यांच्यावर उपोषणकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांच्याकडून समर्पक उत्तर येत नसल्याने सरपंच व शेतकऱ्यांनी कालव्याजवळच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. शिवाय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे बोलाविण्याची मागणीही केली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता विनायक जाधव हे आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत चार ते आठ वर्षे पाण्यासाठी वाट का पाहावी लागते? असा सवाल उपस्थित केला. यावेळी विनायक जाधव हे अनुत्तरित झाले. अखेर विनायक जाधव यांनी मंगळवारी संबंधित कामाबाबात आढावा घेऊन बुधवारी बैठक घेण्याचे सांगितल्याने सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेतले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीFarmerशेतकरीagitationआंदोलन