शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

Sindhudurg: आम्हाला वाद नको; फक्त पाणी द्या; झरेबांबरमधील शेतकऱ्यांचे आंदोलन 

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: February 20, 2024 19:14 IST

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तुम्ही अधिकारी व प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांची चार वर्षांपासून थट्टा चालविली आहे. तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी ...

दोडामार्ग (सिंधुदुर्ग) : तुम्ही अधिकारी व प्रशासनाने आम्हा शेतकऱ्यांची चार वर्षांपासून थट्टा चालविली आहे. तिलारी धरणाच्या डाव्या कालव्याचे पाणी आमच्या शेतजमिनीत पोहोचावे, या मागणीसाठी उपोषणाचा इशारा दिला व बातमी आली की, तुम्ही काम करता. तुमच्या शब्दांवर आम्ही वारंवार उपोषणे मागे घेतली. मात्र, आता आम्ही तुमच्या भूलथापांना बळी पडणार नाही. नुकसानभरपाई न मागता आम्ही शेतकऱ्यांनी फक्त पाणी मिळावे यासाठी स्वतःच्या जमिनी दिल्या. मात्र, तुम्ही शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम करत आहात. आम्हाला वाद नको, स्टंटबाजीही नको. आम्हाला फक्त पाणी हवे, अशी मागणी झरेबांबर येथील उपोषणकर्ते शेतकऱ्यांनी केली.झरेबांबर येथे तिलारी डाव्या कालव्यातून पाइपलाइनद्वारे शेतात पाणी नेण्याच्या कामात वारंवार दिरंगाई होत आहे. त्यामुळे संतप्त शेतकरी व ग्रामस्थांनी अनेक वेळा आंदोलने, उपोषणे केली. मात्र, प्रत्येक वेळी या शेतकऱ्यांची फसवणूक करण्याचे काम अधिकाऱ्यांनी केले. परिणामी, तिलारी पाटबंधारे विभागाच्या फसवणुकीला वैतागून झरेबांबर- आंबेली सरपंच अनिल शेटकर यांनी कालव्याच्या पाण्यात जलसमाधी घेण्याचा इशारा दिला होता. त्यानुसार सकाळी १०:३० वाजेच्या सुमारास सरपंच शेटकर, ग्रामस्थ व शेतकरी कालव्याजवळ जमा झाले. यावेळी पाटबंधारे विभागाचे कनिष्ठ अभियंता म्हेत्रे व पोलिसही दाखल झाले.

कार्यकारी अभियंत्यांवर प्रश्नांचा भडिमारकनिष्ठ अभियंता म्हेत्रे यांनी जलसमाधी न घेण्याबाबत विनंती केल्याने कालव्याजवळच ठिय्या आंदोलन केले. म्हेत्रे यांच्यावर उपोषणकर्त्यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. मात्र, त्यांच्याकडून समर्पक उत्तर येत नसल्याने सरपंच व शेतकऱ्यांनी कालव्याजवळच ठिय्या आंदोलनास सुरुवात केली. शिवाय तुमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना येथे बोलाविण्याची मागणीही केली. दुपारी ३ वाजेच्या सुमारास कार्यकारी अभियंता विनायक जाधव हे आंदोलन स्थळी दाखल झाले. त्यांच्यावर प्रश्नांचा भडिमार करत चार ते आठ वर्षे पाण्यासाठी वाट का पाहावी लागते? असा सवाल उपस्थित केला. यावेळी विनायक जाधव हे अनुत्तरित झाले. अखेर विनायक जाधव यांनी मंगळवारी संबंधित कामाबाबात आढावा घेऊन बुधवारी बैठक घेण्याचे सांगितल्याने सायंकाळी उशिरा उपोषण मागे घेतले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गWaterपाणीFarmerशेतकरीagitationआंदोलन