शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

शेतकरी अपघात विमा योजना :९१ प्रस्ताव अद्याप प्रलंबित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2020 14:15 IST

सिंधुदुर्ग : गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत १५४ मृत व ...

ठळक मुद्देशेतकरी अपघात विमा योजना :९१ प्रस्ताव अद्याप प्रलंबित१५४ शेतकऱ्यांपैकी ५५ जणांना लाभ, अनेक लाभार्थी वंचित

सिंधुदुर्ग : गोपीनाथ मुंडेशेतकरीअपघात विमा योजनेचे सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत १५४ मृत व अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी केवळ ५५ शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. तर ८ प्रस्ताव विमा कंपनीने नाकारले आहेत.

तालुकास्तरावर २१ आणि विमा कंपनीकडे ७० असे एकूण ९१ प्रस्ताव प्रलंबित आहेत. त्यामुळे अनेक लाभार्थी लाभापासून वंचित राहणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान, कृषी पर्यवेक्षक परिपूर्ण प्रस्ताव सादर करीत नसल्याने अपघातग्रस्तांचा वारसदार या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकरीवर्गाकडून केला जात आहे.शेतकºयांचा अपघाती मृत्यू झाल्यास किंवा अपघातात अपंगत्व आल्यास त्याला अर्थात त्याच्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शासनाने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना सुरू केली आहे. या योजनेंतर्गत अपघाती मृत्यू झाल्यास व दोन अवयव निकामी झाल्यास लाभार्थ्यास २ लाख तर एक अवयव निकामी झाल्यास १ लाख रुपये विमा दिला जातो. दरवर्षी एक विमा कंपनी निश्चित करून त्यामार्फत लाभार्थ्यांना लाभ दिला जातो. प्रस्ताव सादर केल्यानंतर ९० दिवसांच्या आत लाभार्थ्याला लाभ देणे आवश्यक आहे. असे असतानाही गेल्या तीन वर्षांत अनेक प्रस्ताव प्रलंबित राहिले आहेत.सन २०१७-१८ मध्ये ४६ शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले होते. यांपैकी ३८ प्रस्ताव मंजूर करण्यात आले. २ प्रस्ताव विमा कंपनीकडे प्रलंबित असून ६ प्रस्ताव नामंजूर करण्यात आले. २०१८-१९ या वर्षात ६२ शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले.

त्यापैकी १७ मंजूर, १० तालुकास्तरावर प्रलंबित, ३३ विमा कंपनीकडे प्रलंबित तर २ नामंजूर करण्यात आले आहेत. २०१९-२० या वर्षात ४६ प्रस्ताव सादर करण्यात आले. त्यापैकी अद्याप एकही प्रस्ताव मंजूर झाला नाही. तर ११ तालुकास्तरावर व ३५ विमा कंपनीकडे प्रलंबित आहेत.सन २०१७-१८ ते २०१९-२० या तीन वर्षांच्या कालावधीत १५४ मृत व अपघातग्रस्त शेतकऱ्यांचे प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. मात्र, यापैकी केवळ ५५ शेतकऱ्यांच्या वारसांना लाभ मिळाला आहे. तर ८ प्रस्ताव विमा कंपन्यांनी नाकारले आहेत. तसेच तालुकास्तरावर २१ व विमा कंपनीकडे ७० असे एकूण ९१ प्रस्ताव प्रलंबित आहेत.

९१ प्रस्तावातील ४६ प्रस्तावांना अजून मुदत आहे. तर २०१७-१८ व २०१८-१९ या दोन वर्षांचे ३५ प्रस्ताव प्रलंबित आहेत. अनेकदा विमा कंपनीकडे प्रलंबित प्रस्तावांबाबत विचारणा करूनही विमा कंपनी दुर्लक्ष करीत असल्याचे अधीक्षक कृषी विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.परिपूर्ण प्रस्ताव कंपनीकडे प्रलंबित राहिल्यास त्यावर व्याज द्यावेगोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे अधीक्षक कृषी विभागाकडे प्राप्त झालेले परिपूर्ण प्रस्ताव संबंधित विमा कंपनीकडे सादर केले जातात. उचित कालावधीत प्रस्ताव सादर करूनही काही वेळा कंपनीकडे प्रस्ताव प्रलंबित राहत असून लाभार्थी वारसांना लाभ मिळण्यास विलंब होत आहे.त्यामुळे विमा कंपनीकडे परिपूर्ण प्रस्ताव सादर करून ते प्रलंबित राहिल्यास त्यावर व्याज देण्यात यावे, याबाबत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाकडून विमा कंपनीला पत्रव्यवहार करण्यात आला आहे.प्रस्ताव करण्याबाबत कृषी पर्यवेक्षकांची जबाबदारी१० सप्टेंबर २००९ च्या शासन निर्णयानुसार गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेचे परिपूर्ण प्रस्ताव स्वीकारणे ही कृषी पर्यवेक्षकांची जबाबदारी आहे. मात्र, हे पर्यवेक्षक परिपूर्ण प्रस्ताव सादर करीत नाहीत. त्यांच्याकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तता होत नाही. त्यामुळे अनेक लाभार्थी व अपघाग्रस्तांचे वारस या योजनेच्या लाभापासून वंचित राहत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे.

टॅग्स :Gopinath Mundeगोपीनाथ मुंडेAccidentअपघातsindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरी