शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंडिया आघाडी फुटणार अन् शहजादे...", पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
2
रायबरेलीत सोनिया गांधी सक्रिय; अखिलेश यादव, राहुल गांधी पोहोचण्यापूर्वीच कार्यकर्त्यांसोबत बैठक!
3
'भाजपचे सरकार कायम राहणार नाही, आज ना उद्या नक्की बदला घेईन', ममता बॅनर्जींचा इशारा
4
हैदराबादमध्ये पावसाचं थैमान! SRH vs GT सामना रद्द झाल्यास संपुष्टात येईल RCB चं आव्हान?
5
मुलगी हरवल्याप्रकरणी चौकशीसाठी नेलं अन् कोठडीतच तरूणाचा मृत्यू, नेमकं काय झालं?
6
"मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवून सरळ करू", अमित शाहांचा इशारा
7
केजरीवाल बाहेर आल्याने सर्वाधिक नुकसान कुणाचं, भाजप की काँग्रेस?; प्रशांत किशोर यांनी 'गणित'च सांगितलं
8
‘CAA ही मोदींची गॅरंटी, कुणीही हटवू शकणार नाही’, आझमगड येथून मोदींनी दिलं आव्हान
9
"यासारखी अमानुष गोष्ट नाही..."; पंतप्रधान मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
10
‘मी त्यांच्यासोबत, जर स्वाती मालिवाल यांना वाटलं तर…’ गैरवर्तन प्रकरणी प्रियंका गांधी यांचं मोठं विधान 
11
"लाचारीच्या सर्व मर्यादा सोडल्या"; जिरेटोप प्रकरणावरून शरद पवारांनी प्रफुल्ल पटेलांना फटकारलं!
12
विकी कौशलची 'ही' इच्छा अजूनही अपूर्णच! म्हणाला, 'कधी करेन माहित नाही पण...'
13
Hina Khan : "40 डिग्रीत वेदनादायक पीरियड क्रॅम्प्सने त्रस्त असताना..."; हिना खानने सांगितला अनुभव
14
आमनेसामने Video: ठाकरे गटाकडून 50 खोकेची घोषणाबाजी; एकनाथ शिंदेंकडून धनुष्यबाणाचा इशारा
15
‘पृथ्वीराज चव्हाण यांनी पोपट घेऊन भविष्यवाणी सांगण्यास बसावे’, अजित पवार गटाचा टोला 
16
‘मोदींनी एकदा मला फोन केला आणि म्हणाले, माझा अमेरिकेचा व्हिसा फेटाळलाय, तेव्हा मीच…’ शरद पवार यांनी सांगितली आठवण
17
मराठमोळ्या अभिनेत्रीसोबत रिलेशनशीपमध्ये होता 'हीरामंडी'चा अभिनेता, आता ब्रेकअपबाबत केला खुलासा
18
"महिलांच्या कमावण्याच्या नादात वाढतंय घटस्फोटाचं प्रमाण"; सईद अन्वरचं वादग्रस्त विधान! VIDEO व्हायरल
19
T20 WC पूर्वी भारतीय संघाच्या सराव सामन्याची तारीख व संघ ठरला! जाणून घ्या अपडेट्स 
20
Adani Group : अदानींच्या 'या' कंपनीला मोठा झटका, नॉर्वेच्या सर्वात मोठ्या वेल्थ फंडानं केलं ब्लॅकलिस्ट

कोरोना संवेदनशील यादीतून गोव्याचे नाव वगळा; गोव्याच्या मुख्यमंत्र्याकडून  महाराष्ट्र सरकारला पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 11:42 PM

लाॅकडाऊन महाराष्ट्रात धडकी गोव्याला. गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू असल्याचा दिसून येत आहे.

 

- अनंत जाधवसावंतवाडी :  ब्रेक द चेन अंर्तगत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर कडक पाउले उचलत असतनाच कोरोना बाबत संवेदनशील राज्याची घोषणा केली असून,त्यात गोव्याचा समावेश आहे.गोव्यातून येणाºयाची कोरोना चाचणी बंधणकारक केल्याने महाराष्ट्रात जरी संचारबंदी असली तरी त्यांची धडकी मात्र गोव्याला भरली आहे.गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी नुकतेच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याना पत्र पाठवून  संवेदनशील राज्याच्या यादीतून गोव्याचे नाव वगळण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्राच्या बंधनामुळे गोव्याच्या पर्यटना बरोबरच इतर बाबतीही मोठा परिणाम होण्याची भिती व्यकत होत आहे.

ब्रेक द चेन अंर्तगत कोरोना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकार विविध स्तरावर उपाय योजना आखत आहेत.त्यातच महाराष्ट्राने गोव्यासह केरळ राजस्थान, दिल्ली उत्तराखंड व एनसीआर या राज्यातून महाराष्ट्रात येणाºया प्रत्येकांची कोरोना चाचणी बंधनकारक केली आहे. ही सर्व राज्ये कोरोना बाबत संवेदनशील असल्याने ही बंदी घातली आहे. याचा मोठा फटका गोव्याला बसला आहे.कारण सध्या अंतरराष्ट्रीय विमानातून येणारा पर्यटक कमी झाला आहे.त्यामुळे गोव्याचे पर्यटन हे देशी पर्यटकांवरच अवलबून आहे.जर महाराष्ट्राने सिमेवर कडक निर्बध आखले तर त्याचा मोठा तोटा गोव्याला सहन करावा लागणार आहे.

त्या शिवाय गोव्यात नोकरीसाठी जाणारे सिंधुदुर्ग मधील अनेक जण आहेत.यात युवक युवती बरोबरच अनेक तरूण ही नोेकरीला जातात जर हे सर्व जण तेथे नोकरीला गेले नाही तर त्या कंपन्याचे ही नुकसान होईल च त्या शिवाय येथील युवक युवतीचा रोजगाराचा प्रश्न ही मोठा निर्माण होईल पण महाराष्ट्र सरकारने कोरोनाच्या बाबतीत कडक धोरण स्वीकारले आहे.कोणत्या ही प्रकारची हालगर्जाेपणा सरकारला नको आहे. त्यामुळे सर्व सिमवर कडक आरोग्य तपासणी करण्याबाबत सरकार कडून हालचाली सुरू करण्यात आल्या आहेत.

पण गोव्यासाठी हे कडक निर्बध धोक्याचे आहेत.गोव्याची अर्थव्यवस्थाच ठप्प होईल अशी भिती गोवा सरकारला वाटत असून,त्यामुळे गोव्या च्या मुख्यमंत्र्यानी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहले आहे.या पत्रात कडक निर्बंधाच्या यादीतून गोवा सरकारचे नाव हटवावे असे आवाहन सावंत यांनी केले आहे.याबाबत अद्याप महाराष्ट्र सरकारने कोणती भूमिका घेतली नाही.मात्र यावर लवकरात लवकर भुमिका घेतली नाही तर त्यांचा तोटा महाराष्ट्राला ही बसू शकतो अशी शक्यता ही वर्तवली जात आहे.

गोव्यात सध्या कोरोनाचे रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.सध्या तरी गोव्याने कडक लॉकडाउनचा मार्ग स्वीकारला नाही.पण काहि सार्वजनिक कार्यक्रमावर मात्र बंधने आणली आहेत.तसेच गोव्याचा पर्यटन हंगाम मात्र सुरळित सुरू असल्याचा दिसून येत आहे.

टॅग्स :Pramod Sawantप्रमोद सावंतcorona virusकोरोना वायरस बातम्या