शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
2
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
3
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
4
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
5
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
6
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
7
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
8
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
9
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
10
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
11
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
12
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
13
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
14
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
15
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
16
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
17
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
18
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
19
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
20
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  

छोटे, मोठे उद्योगही ठप्प; रेल्वे, बससह खासगी व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत .

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा फटका :  रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

ओंकार ढवण ।कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. मीटर डाऊन केले तरच संसाराचा गाडा चालणारे रिक्षा चालक व मालक यातून वाचलेले नाहीत. यापुढील काळात लॉकडाऊन कायम राहीले तर अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने रेल्वे, बससेवा, शासकीय कार्यालयातील प्रवाशांची येण्याजाण्याची सोय करून एक रिक्षा चालक-मालक किमान तीनशे ते पाचशे रुपये दिवसाकाठी मिळवत असतो. मात्र, सध्या रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे कर्जबाजारी होऊन त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत .

राज्यात ह्यकोरोनाह्ण चे रूग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मार्च महिन्यापासून एसटी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यास प्रारंभ झाला. त्याबरोबरच रिक्षा चालकांना देखील प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे .

आता तर एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्षा वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे. रिक्षा व्यवसाय करणे म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच त्या व्यावसायिकाच्या घरात चूल पेटते असे चित्र आहे. तसेच भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था तर त्याहून अधिकच वाईट झाली आहे.

त्यातच स्वत:चे घर असलेले रिक्षा चालक मालक फारच कमी आहेत . बहुतांश रिक्षा चालक मालक भाड्याने खोली घेऊन राहतात. नवीन रिक्षा असेल तर कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, आरटीओ परवाना नूतनीकरण, पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती, विविध भागांच्या वाढत्या किंमती, देखभाल - दुरूस्ती यामुळे हा व्यवसाय फारच अडचणीत आला आहे.संचारबंदीमुळे रिक्षा फिरायची बंद झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी कर्जे काढून किराणा माल भरला आहे. भाजीपाला परवडत नसल्यामुळे भाकरी आणि आमटी - भात खाऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे .

उधारीवर किराणा माल मिळत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करायच्या तरी कशा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. दैनंदिन खर्च, घरभाडे, दवाखान्यातील औषधोपचार यासाठी कर्जाने घेतलेले पैसे संपत आले आहेत.त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होऊन कधी एकदा रिक्षा रस्त्यावरून धावणार? याची प्रतिक्षा अनेक रिक्षा चालकांना लागली आहे. त्यामुळे शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी रिक्षा चालक, मालकांकडून करण्यात येत आहे.शासनाने मदत करावीकणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १५ हजार रिक्षा चालक, मालक आहेत . त्यांच्यापैकी अनेकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे . मजूरांप्रमाणेच रिक्षा चालकांची परिस्थिती असते. त्यामुळे रिक्षा चालकांना शासनाकडून मदतीची निश्चितच अपेक्षा आहे, असे मत रिक्षा चालक रवींद्र कोरगावकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkonkanकोकण