शहरं
Join us  
Trending Stories
1
इकडे विरोधक टीका करतायत; तिकडे आफ्रिकेचा निवडणूक आयोग पारदर्शक प्रणाली पाहण्यासाठी खासदारांना पाठविणार
2
"पार्थ पवारांकडून खुलासा घेणे गरजेचे; उद्योग विभागाचा या प्रकरणाशी संबंध नाही"; शिंदे गटाच्या मंत्र्यांनी स्पष्टच सांगितले
3
सुरेश रैना, शिखर धवन यांना ईडीचा झटका; कोट्यवधी रुपयांची संपत्ती जप्त, कोणत्या मालमत्तांचा समावेश?
4
१ कोटींचं घर अवघ्या ११ लाखांत, EWS कोट्यातील ७२ जणांना लॉटरी; योगी आदित्यनाथ यांनी कमाल
5
बाजार 'लाल' रंगात बंद! निफ्टी २५,५२० च्या खाली, IT वगळता सर्वच क्षेत्रांत दबाव; 'या' कारणांचा झाला परिणाम
6
बिहारमध्ये राडा! उपमुख्यमंत्र्यांच्या ताफ्यावर हल्ला; दुसरीकडे सीपीएम आमदाराला मारहाण, गाडी फोडली
7
Ravi Shastri On Shubman Gill : शुभमन गिल आधीच होतोय ट्रोल, त्यात शास्त्रींच्या कमेंटची भर, म्हणाले...
8
लॅपटॉपच्या स्क्रीनवर धूळ बसली आहे? टिश्यू पेपर की कापड कशाने साफ कराल? 'या' टिप्स येतील कामी
9
सैनिकी शाळेत १२ वर्षीय मुलाचा गूढ मृत्यू,'त्या' बंद दारामागे काय घडले?; बहिणीचा गंभीर आरोप
10
सोशल मीडियाच्या ट्रॉलिंगचा बळी; माफी मागितली तरी छळ थांबेना, तरुणाने अखेर जीवन संपवले
11
बदल्याची आग! तरुणाने नकार देताच 'ती' संतापली, ११ राज्यांमधील शाळांना दिली बॉम्बची धमकी
12
"14 तारखेला 11 वाजेपर्यंत लालू अँड कंपनीचा..."; अमित शाह स्पष्टच बोलले, घुसखोरांसंदर्भात काय म्हणाले?
13
Anil Ambani ED: अनिल अंबानींची पुन्हा चौकशी होणार, ED नं १४ नोव्हेंबरला बोलावलं; प्रकरण काय?
14
विजय देवराकोंडा-रश्मिका मंदाना 'या' महिन्यात लग्न करणार? काही दिवसांपूर्वीच झालेला साखरपुडा
15
बायकोला ब्रेन ट्युमर, नवऱ्याने मृत्यूच्या दारातून परत आणलं; मराठी रीलस्टार कपलच्या रिअल लाइफ स्टोरीवर येतोय साऊथ मुव्ही
16
भाजप कार्यकर्त्याने आधी दिल्लीत नंतर बिहारमध्ये मतदान केले; राहुल गांधींनंतर आप नेत्याने आरोप केला
17
Canada Visa Rules : कॅनडाने व्हिसा नियमांमध्ये केला मोठा बदल, भारतावर काय परिणाम होईल?
18
SBI नं रचला इतिहास, मार्केट कॅप १०० अब्ज डॉलर्सच्या पार; देशातील दिग्गजांच्या यादीत सामील
19
"माझ्या पप्पांना अडकवण्यात आलंय"; वडील जेलमध्ये, लेकीने अभ्यास सोडून केला प्रचार
20
Jara Hatke: चांदीचा वर्ख कसा तयार होतो माहितीय? वर्ख लावलेली मिठाई खावी की नाही? तुम्हीच ठरवा!

छोटे, मोठे उद्योगही ठप्प; रेल्वे, बससह खासगी व्यवसाय अडचणीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 16:07 IST

सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत .

ठळक मुद्देकोरोना विषाणूचा फटका :  रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ

ओंकार ढवण ।कणकवली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वच क्षेत्राला फटका बसला आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवसाय, उद्योग ठप्प झाले आहेत. मीटर डाऊन केले तरच संसाराचा गाडा चालणारे रिक्षा चालक व मालक यातून वाचलेले नाहीत. यापुढील काळात लॉकडाऊन कायम राहीले तर अनेक रिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येणार आहे.

सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने रेल्वे, बससेवा, शासकीय कार्यालयातील प्रवाशांची येण्याजाण्याची सोय करून एक रिक्षा चालक-मालक किमान तीनशे ते पाचशे रुपये दिवसाकाठी मिळवत असतो. मात्र, सध्या रिक्षा व्यवसाय बंद असल्यामुळे कर्जबाजारी होऊन त्यांना उदरनिर्वाह करावा लागत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात साधारणत: १५ हजार रिक्षा चालक-मालक असून त्यापैकी अनेकांची हीच परिस्थिती आहे. त्यामुळे रिक्षा धंदा पुन्हा केव्हा सुरू होणार याची प्रतिक्षा ते करीत आहेत .

राज्यात ह्यकोरोनाह्ण चे रूग्ण आढळण्यास सुरुवात झाल्यानंतर शाळा, महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच मार्च महिन्यापासून एसटी बसेसच्या फेऱ्या कमी करण्यास प्रारंभ झाला. त्याबरोबरच रिक्षा चालकांना देखील प्रवासी वाहतूक करण्यास मनाई करण्यात आली आहे .

आता तर एसटीची सेवा पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिक्षा वाहतूक देखील पूर्णपणे बंद झाली आहे. रिक्षा व्यवसाय करणे म्हणजे दिवसभर काम केल्यानंतरच त्या व्यावसायिकाच्या घरात चूल पेटते असे चित्र आहे. तसेच भाड्याने रिक्षा चालवणाऱ्यांची अवस्था तर त्याहून अधिकच वाईट झाली आहे.

त्यातच स्वत:चे घर असलेले रिक्षा चालक मालक फारच कमी आहेत . बहुतांश रिक्षा चालक मालक भाड्याने खोली घेऊन राहतात. नवीन रिक्षा असेल तर कर्जाचे हप्ते, विमा हप्ते, आरटीओ परवाना नूतनीकरण, पेट्रोलच्या वाढलेल्या किंमती, विविध भागांच्या वाढत्या किंमती, देखभाल - दुरूस्ती यामुळे हा व्यवसाय फारच अडचणीत आला आहे.संचारबंदीमुळे रिक्षा फिरायची बंद झाल्यानंतर पोटाची खळगी भरण्याचा प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. अनेकांनी उदरनिर्वाहासाठी कर्जे काढून किराणा माल भरला आहे. भाजीपाला परवडत नसल्यामुळे भाकरी आणि आमटी - भात खाऊन जगण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे .

उधारीवर किराणा माल मिळत नसल्यामुळे जीवनावश्यक वस्तू खरेदी करायच्या तरी कशा? असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. दैनंदिन खर्च, घरभाडे, दवाखान्यातील औषधोपचार यासाठी कर्जाने घेतलेले पैसे संपत आले आहेत.त्यामुळे कोरोनाचे संकट दूर होऊन कधी एकदा रिक्षा रस्त्यावरून धावणार? याची प्रतिक्षा अनेक रिक्षा चालकांना लागली आहे. त्यामुळे शासनाने या समस्येकडे लक्ष देऊन तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी रिक्षा चालक, मालकांकडून करण्यात येत आहे.शासनाने मदत करावीकणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात जवळपास १५ हजार रिक्षा चालक, मालक आहेत . त्यांच्यापैकी अनेकांवर सध्या उपासमारीची वेळ आली आहे . मजूरांप्रमाणेच रिक्षा चालकांची परिस्थिती असते. त्यामुळे रिक्षा चालकांना शासनाकडून मदतीची निश्चितच अपेक्षा आहे, असे मत रिक्षा चालक रवींद्र कोरगावकर यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसkonkanकोकण