शहरं
Join us  
Trending Stories
1
“युद्धाची गरजच भासणार नाही, एक दिवस POKतील जनता म्हणेल की आम्ही भारतवासी आहोत”: राजनाथ सिंह
2
“आता रिकामे ठेवू नका, काहीतरी जबाबदारी द्या, चुकलो असेन तर...”; धनंजय मुंडेंची भरसभेत विनंती
3
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
4
VIDEO: आईची माया! सिंहीणने रेडकूवर घातली झडप, म्हशीने शिंगाने लावलं उडवून अन् पुढे...
5
बगरम हवाई तळावर अमेरिकेचा 'डोळा'; ट्रम्प यांना आता का हवंय अफगाणिस्तानचं 'एअरफील्ड'?
6
ज्या सुटकेसवर बसून रील बनवलं, त्यातच तिला भरून नदीत फेकलं; लव्हस्टोरीचा भयंकर शेवट
7
कहो ना कहो...! इमरान हाश्मीसमोर गाताना राघव जुयालच्या डोळ्यात आलेलं पाणी, म्हणाला...
8
आजपासून स्वस्त झालं Rail Neer; जीएसटी रिव्हिजननंतर रेल्वेनं कमी केली MRP
9
नेपाळ, फ्रान्सनंतर आता फिलिपिन्समध्येही भडका! लोक रस्त्यावर; धुमश्चक्रीत ९५ पोलीस जखमी, २१६ जणांना अटक
10
स्टार क्रिकेटपटूने निवृत्ती घेतली मागे, आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करणार पुनरागमन  
11
५ कपन्यांमधील हिस्सा विकण्याच्या विचारात मोदी सरकार! लिस्ट मध्ये आहेत या सरकारी कंपन्यांची नावं
12
"५० हजार देतो, शरीरसंबंध ठेव", मुलाच्या वयाच्या निर्मात्याने अभिनेत्रीकडे केलेली धक्कादायक मागणी
13
इस्रायल-अमेरिकेचं टेन्शन वाढलं; इराणने १० हजार किमीपर्यंत मारा करणाऱ्या ICB मिसाईलची केली चाचणी
14
अशी धुलाई कधीच पाहिली नव्हती...; अभिषेक शर्माच्या फटकेबाजीनंतर पाकिस्तानी पत्रकाराची कबुली
15
परदेशी उपग्रहाच्या हालचालींवर भारताची करडी नजर; ५० बॉडीगार्ड उपग्रहांची तयारी
16
'मला बायको हवीय, माझं लग्न लावून द्या,कारण…’, तरुणाने थेट पंचायत समितीला दिलं पत्र, त्यानंतर...
17
Navratri 2025: नवरात्रीत अनवाणी चालण्याची प्रथा कशी सुरू झाली? खरंच लाभ होतो का?
18
भारतीय सैन्याने पाडलेले...श्रीनगरमधील डल सरोवरात सापडले पाकिस्तानचे 'फुसकी' क्षेपणास्त्र
19
"गेल्या कुंभमेळ्यात पालकमंत्री, यावेळी नाही; पण पुढे बघू...'; गिरीश महाजनांनी मनातील इच्छा केली व्यक्त
20
खळबळजनक! बंद फ्लॅटमध्ये ३ दिवसांपासून पडून होता आईचा मृतदेह, शेजारी बसलेला मुलगा

फळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

रसायनांचा वापर जास्त : आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज

प्रसन्न राणे - सावंतवाडी मानवाच्या शरीराला पोषक घटक म्हणून प्रामुख्याने फळांची गणना केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसातील बदलत्या हवामानाने फळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे फळांवरील आवरण स्वच्छ धुऊन मुलांना खाण्यासाठी देणे आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरात उन्हाळी हंगामात पडलेल्या पावसामुळे तसेच सतत सुरू असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचे पीक चांगले राहावे, यासाठी विविध रसायने वापरली जातात. यामुळे आहारातील पोषक घटक म्हणून मोठ्या प्रमाणात फळांची उलाढाल होत असते. ही फळे रसायनयुक्त असल्याने या फळांचा वापर स्वच्छ धुऊनच करणे आवश्यक आहे. अन्यथा पोषक घटक देणारी ही फळे जीवितास धोका निर्माण करू शकतात. प्रामुख्याने लहान मुलांना फळे देताना काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे. हवामानात होणारे बदल यंदा फळांना पोषक असे नसल्याने द्राक्षांसारख्या फळांच्या हंगामात पावसाने आपला जोर कायम केला होता. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी विविध रसायनांचा शेतकऱ्यांनी वापर केला होता. उन्हाळी हंगामात पावसाने जोर कायम केल्याने फळपिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी फळांच्या पिकावर कीटकनाशकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसायनांची फवारणी करण्यात आली असल्याचे दिसत आहे. यामुळे फळांवर परिणाम दिसून येत आहे. बाजारातील द्राक्षांचा घड पाहिल्यास द्राक्षांवर फिकट पांढऱ्या रंगाचे आवरण पहायला मिळते. लांबड आणि जाड कातडीची द्राक्षे दिसायला अत्यंत आकर्षक असतात. पण, औषधांच्या अतिफवारणीमुळे या द्राक्षांचाही नैसर्गिक रंग जाऊन त्यावर औषधांचा थर पाहायला मिळतो. फळे धुऊन त्यानंतरच खावीतघरात कोणतीही फळे आणली, तरी ती स्वच्छ धुऊन मगच खायला देणे आवश्यक आह; पण आता त्यात सुधारणा करून, फळे धुऊन आणि स्वच्छ पुसून मगच खायला देणे आवश्यक बनले आहे. लहान मुलांच्या शरीरावर या फळांवरील औषधांचा व कीटकनाशकांचा परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, हा त्रास कशामुळे होतो, याचा कोणालाच पत्ता लागत नसतो. यामुळे रसायनयुक्त फळे लहान मुलांना स्वच्छ धुऊनच किंवा नैसर्गिक फळे देणे आवश्यक आहे. काही रासायनिक खते तेलकट असल्याने त्या तेलकट रासायनिक औषधांचा वापर पाण्यामधून फळांवर केला जातो. मात्र, पाण्यात हे तेलकट रासायनिक मिश्रण मिक्स केल्याने संपूर्ण फळांवर तेलकटपणा तसाच राहत असतो. फळांमध्ये पोषक घटक केवळ हंगामातचकाही फळे हंगामावर पिकत असतात. मात्र, ती फळे वर्षभर बाजारपेठेत विकली जातात. उदा. सफरचंद हे फळ वर्षभर बाजारपेठेत उपलब्ध असते. अशा प्रकारच्या फळांमध्ये फक्त हंगामातच पोषक घटक असून, अन्य हंगामात या फळांमध्ये पोषक घटक राहतातच, असे नाही. प्रगत देशांमध्ये फळांमध्ये रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर करणे मर्यादित असते. मात्र, आपल्या भागात शेतीतील जमिनीमध्ये फळांच्या पिकांमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण जास्त असल्याने ही रसायनयुक्त फळे लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. त्यामुळे पपई, चिकू, गावठी केळी, अशी नैसर्गिक फळे लहान मुलांना देणे गरजेचे आहे. - डॉ. दत्तात्रेय सावंत, बालरोगतज्ज्ञ