शहरं
Join us  
Trending Stories
1
मुख्यमंत्र्यांनी दिला निकाल, तटकरे पहिल्या तर राणे पाचव्या क्रमांकावर; राज्यात ठाणे जिपचे सीईओ अव्वल
2
दहशतवादी कुठून आले, कुठे गेले? करणार तपास; ३ डी मॅपिंगद्वारे शोध; एनआयए प्रमुख सदानंद दाते बैसरन खोऱ्यात
3
‘जीडीपी’त क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा; ॲनिमेशन उद्याेगासाठी यशाचे दार उघडले...
4
सुप्रिया सुळेंनी राज ठाकरेंना विचारले, ट्रिप कशी झाली?
5
विरार-अलिबाग मल्टीमॉडेल कॉरिडॉरची निविदा रद्द होणार; ‘बीओटी’वर आता उभारणी; राज्य सरकारकडे प्रस्ताव
6
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
7
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
8
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
9
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
10
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
11
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
12
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
13
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
14
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
15
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
16
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
17
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
18
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
19
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
20
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...

फळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

रसायनांचा वापर जास्त : आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज

प्रसन्न राणे - सावंतवाडी मानवाच्या शरीराला पोषक घटक म्हणून प्रामुख्याने फळांची गणना केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसातील बदलत्या हवामानाने फळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे फळांवरील आवरण स्वच्छ धुऊन मुलांना खाण्यासाठी देणे आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरात उन्हाळी हंगामात पडलेल्या पावसामुळे तसेच सतत सुरू असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचे पीक चांगले राहावे, यासाठी विविध रसायने वापरली जातात. यामुळे आहारातील पोषक घटक म्हणून मोठ्या प्रमाणात फळांची उलाढाल होत असते. ही फळे रसायनयुक्त असल्याने या फळांचा वापर स्वच्छ धुऊनच करणे आवश्यक आहे. अन्यथा पोषक घटक देणारी ही फळे जीवितास धोका निर्माण करू शकतात. प्रामुख्याने लहान मुलांना फळे देताना काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे. हवामानात होणारे बदल यंदा फळांना पोषक असे नसल्याने द्राक्षांसारख्या फळांच्या हंगामात पावसाने आपला जोर कायम केला होता. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी विविध रसायनांचा शेतकऱ्यांनी वापर केला होता. उन्हाळी हंगामात पावसाने जोर कायम केल्याने फळपिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी फळांच्या पिकावर कीटकनाशकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसायनांची फवारणी करण्यात आली असल्याचे दिसत आहे. यामुळे फळांवर परिणाम दिसून येत आहे. बाजारातील द्राक्षांचा घड पाहिल्यास द्राक्षांवर फिकट पांढऱ्या रंगाचे आवरण पहायला मिळते. लांबड आणि जाड कातडीची द्राक्षे दिसायला अत्यंत आकर्षक असतात. पण, औषधांच्या अतिफवारणीमुळे या द्राक्षांचाही नैसर्गिक रंग जाऊन त्यावर औषधांचा थर पाहायला मिळतो. फळे धुऊन त्यानंतरच खावीतघरात कोणतीही फळे आणली, तरी ती स्वच्छ धुऊन मगच खायला देणे आवश्यक आह; पण आता त्यात सुधारणा करून, फळे धुऊन आणि स्वच्छ पुसून मगच खायला देणे आवश्यक बनले आहे. लहान मुलांच्या शरीरावर या फळांवरील औषधांचा व कीटकनाशकांचा परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, हा त्रास कशामुळे होतो, याचा कोणालाच पत्ता लागत नसतो. यामुळे रसायनयुक्त फळे लहान मुलांना स्वच्छ धुऊनच किंवा नैसर्गिक फळे देणे आवश्यक आहे. काही रासायनिक खते तेलकट असल्याने त्या तेलकट रासायनिक औषधांचा वापर पाण्यामधून फळांवर केला जातो. मात्र, पाण्यात हे तेलकट रासायनिक मिश्रण मिक्स केल्याने संपूर्ण फळांवर तेलकटपणा तसाच राहत असतो. फळांमध्ये पोषक घटक केवळ हंगामातचकाही फळे हंगामावर पिकत असतात. मात्र, ती फळे वर्षभर बाजारपेठेत विकली जातात. उदा. सफरचंद हे फळ वर्षभर बाजारपेठेत उपलब्ध असते. अशा प्रकारच्या फळांमध्ये फक्त हंगामातच पोषक घटक असून, अन्य हंगामात या फळांमध्ये पोषक घटक राहतातच, असे नाही. प्रगत देशांमध्ये फळांमध्ये रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर करणे मर्यादित असते. मात्र, आपल्या भागात शेतीतील जमिनीमध्ये फळांच्या पिकांमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण जास्त असल्याने ही रसायनयुक्त फळे लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. त्यामुळे पपई, चिकू, गावठी केळी, अशी नैसर्गिक फळे लहान मुलांना देणे गरजेचे आहे. - डॉ. दत्तात्रेय सावंत, बालरोगतज्ज्ञ