शहरं
Join us  
Trending Stories
1
"१२ फ्लॅट, ४ बंगले.., शिंदेंच्या आमदारांची मस्ती जिरवायचीय"; भाजपा आमदाराचा गंभीर आरोप
2
देशाला मजबूत पंतप्रधानांची गरज, नरेंद्र मोदी तर भाजपाचे प्रचारमंत्री; उद्धव ठाकरेंचं टीकास्त्र
3
उद्धव ठाकरे सहकुटुंब शरद पवारांच्या घरी; संजय राऊतही उपस्थित, दिल्लीत घडामोडींना वेग!
4
रोहित शर्मा, यशस्वी जैस्वाल अन् मुंबई रणजी टीम .... मधल्या काळात नेमकं काय-काय घडलं?
5
कामाचं टेन्शन, लोनची झंझट... शांतीसाठी आलाय नवा विचित्र ट्रेंड, डॉक्टरांनी म्हटलं 'खतरनाक'
6
राहुल गांधींची 'डिनर डिप्लोमसी', थंड पडलेल्या INDIA आघाडीला नवसंजीवनी देण्याचा प्रयत्न
7
व्हाट्सअ‍ॅपच घोटाळेबाजांपासून सावध करणार, युजर्ससाठी दोन सेफ्टी टूल लाँच...; कशी वापरायची...
8
विमानतळावर उतरताच UAEच्या विमानावर हवाईदलाने केला हल्ला, ४० जणांचा मृत्यू
9
National Flag : केवळ भारतच नव्हे, जगातील 'या' देशांच्या झेंड्यावरही आहे केशरी, पांढरा अन् हिरवा रंग!
10
भारत अन् चीनचे जमायला लागले, तिकडे पाकिस्तान अस्वस्थ झाला, नवीन रडारड केली सुरू
11
"पुढच्या जन्मात मी तुलाच माझी पत्नी बनवेन"; काकीच्या प्रेमात वेडा झाला २६ वर्षीय तरुण अन्...
12
Mamata Banerjee : "मी जिवंत सिंहीण, जखमी करण्याचा प्रयत्न करू नका, अन्यथा...", ममता बॅनर्जींचं भाजपाला चॅलेंज
13
आता भारतातूनच खरेदी करा Apple, Microsoft चे शेअर्स! परदेशी गुंतवणुकीचा सोपा मार्ग, काय आहेत नियम व अटी?
14
'सुहागरात' झाली, नवऱ्याला खोलीत कोंडून बायको बाल्कनीत आली अन्...; स्टोरी ऐकून पोलिसही चक्रावले
15
“उपराष्ट्रपतींना तडकाफडकी राजीनामा का द्यावा लागला, आता आहेत तरी कुठे?” उद्धव ठाकरेंचा सवाल
16
तुम्ही जे पाहता ते 'स्क्रिप्टेड'! खुद्द क्रिकेटच्या देवानं शेअर केलं पंत संदर्भातील 'सीक्रेट'
17
प्रियकराच्या मदतीनं पतीला तडफडून मारले, आईचा कट लेकीनं केला उघड; पप्पाला कसं संपवलं, पोलिसांना सांगितले
18
विवेक सांगळेने लालबागमध्ये घेतलं नवीन घर, शेजारीच वडिलांची मिल; भावुक होत म्हणाला...
19
पतीला यमसदनी पाठवणाऱ्या सोनम रघुवंशीला बॉयफ्रेंडसोबत तुरुंगातून पडायचंय बाहेर; पण कोर्टानं सुनावला वेगळाच निर्णय!
20
उधमपूरमध्ये CRPF चे वाहन खोल दरीत कोसळले; दोन जवानांचा दुर्दैवी मृत्यू, १२ जखमी

फळांचे अस्तित्व धोक्यात

By admin | Updated: March 19, 2015 23:53 IST

रसायनांचा वापर जास्त : आरोग्यविषयक काळजी घेण्याची गरज

प्रसन्न राणे - सावंतवाडी मानवाच्या शरीराला पोषक घटक म्हणून प्रामुख्याने फळांची गणना केली जाते. मात्र, गेल्या काही दिवसातील बदलत्या हवामानाने फळांचे अस्तित्वच धोक्यात आले आहे. यामुळे फळांवरील आवरण स्वच्छ धुऊन मुलांना खाण्यासाठी देणे आवश्यक आहे. गेल्या महिन्याभरात उन्हाळी हंगामात पडलेल्या पावसामुळे तसेच सतत सुरू असणाऱ्या ढगाळ वातावरणामुळे सर्व शेतकरी अडचणीत आले आहेत. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. फळाचे पीक चांगले राहावे, यासाठी विविध रसायने वापरली जातात. यामुळे आहारातील पोषक घटक म्हणून मोठ्या प्रमाणात फळांची उलाढाल होत असते. ही फळे रसायनयुक्त असल्याने या फळांचा वापर स्वच्छ धुऊनच करणे आवश्यक आहे. अन्यथा पोषक घटक देणारी ही फळे जीवितास धोका निर्माण करू शकतात. प्रामुख्याने लहान मुलांना फळे देताना काळजीपूर्वक देणे आवश्यक आहे. हवामानात होणारे बदल यंदा फळांना पोषक असे नसल्याने द्राक्षांसारख्या फळांच्या हंगामात पावसाने आपला जोर कायम केला होता. त्यामुळे पीक वाचविण्यासाठी विविध रसायनांचा शेतकऱ्यांनी वापर केला होता. उन्हाळी हंगामात पावसाने जोर कायम केल्याने फळपिकांचे नुकसान होत आहे. यावर्षी फळांच्या पिकावर कीटकनाशकांसाठी मोठ्या प्रमाणावर रसायनांची फवारणी करण्यात आली असल्याचे दिसत आहे. यामुळे फळांवर परिणाम दिसून येत आहे. बाजारातील द्राक्षांचा घड पाहिल्यास द्राक्षांवर फिकट पांढऱ्या रंगाचे आवरण पहायला मिळते. लांबड आणि जाड कातडीची द्राक्षे दिसायला अत्यंत आकर्षक असतात. पण, औषधांच्या अतिफवारणीमुळे या द्राक्षांचाही नैसर्गिक रंग जाऊन त्यावर औषधांचा थर पाहायला मिळतो. फळे धुऊन त्यानंतरच खावीतघरात कोणतीही फळे आणली, तरी ती स्वच्छ धुऊन मगच खायला देणे आवश्यक आह; पण आता त्यात सुधारणा करून, फळे धुऊन आणि स्वच्छ पुसून मगच खायला देणे आवश्यक बनले आहे. लहान मुलांच्या शरीरावर या फळांवरील औषधांचा व कीटकनाशकांचा परिणाम होत असतो. यामुळे त्यांना उलट्या आणि जुलाबांचा त्रास मोठ्या प्रमाणावर होत असतो. मात्र, हा त्रास कशामुळे होतो, याचा कोणालाच पत्ता लागत नसतो. यामुळे रसायनयुक्त फळे लहान मुलांना स्वच्छ धुऊनच किंवा नैसर्गिक फळे देणे आवश्यक आहे. काही रासायनिक खते तेलकट असल्याने त्या तेलकट रासायनिक औषधांचा वापर पाण्यामधून फळांवर केला जातो. मात्र, पाण्यात हे तेलकट रासायनिक मिश्रण मिक्स केल्याने संपूर्ण फळांवर तेलकटपणा तसाच राहत असतो. फळांमध्ये पोषक घटक केवळ हंगामातचकाही फळे हंगामावर पिकत असतात. मात्र, ती फळे वर्षभर बाजारपेठेत विकली जातात. उदा. सफरचंद हे फळ वर्षभर बाजारपेठेत उपलब्ध असते. अशा प्रकारच्या फळांमध्ये फक्त हंगामातच पोषक घटक असून, अन्य हंगामात या फळांमध्ये पोषक घटक राहतातच, असे नाही. प्रगत देशांमध्ये फळांमध्ये रासायनिक खते, किटकनाशकांचा वापर करणे मर्यादित असते. मात्र, आपल्या भागात शेतीतील जमिनीमध्ये फळांच्या पिकांमध्ये रासायनिक खतांचे प्रमाण जास्त असल्याने ही रसायनयुक्त फळे लहान मुलांसाठी सुरक्षित नाहीत. त्यामुळे पपई, चिकू, गावठी केळी, अशी नैसर्गिक फळे लहान मुलांना देणे गरजेचे आहे. - डॉ. दत्तात्रेय सावंत, बालरोगतज्ज्ञ