शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

CoronaVirus Lockdown : रेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2020 11:32 AM

कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ आॅगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

ठळक मुद्देरेल्वे विरोधातील एल्गार आंदोलन स्थगित : डी. के. सावंत विनायक राऊत यांचे मानले आभार; १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलले

सावंतवाडी : कोरोनाच्या संकटामुळे कोकण रेल्वे प्रवासी संघटनेचे सावंतवाडी रेल्वे स्थानकावर १ मे रोजी होणारे एल्गार आंदोलन स्थगित करून ते १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे, अशी माहिती कोकण रेल्वे प्रवासी संघटना अध्यक्ष डी. के. सावंत यांनी दिली.

गेल्या आठवड्यात खासदार विनायक राऊत यांनी गणेश चतुर्थीनिमित्त कोकण रेल्वे आरक्षण कालावधी कमी करण्याच्या मागणीसाठी रेल्वेमंत्र्यांकडे पाठपुरावा करण्यासाठी पत्रव्यवहारकेला. याबद्दल डी. के. सावंत यांनी खासदारांचे आभार मानले आहेत.गेल्या बावीस वर्षांत रेल्वे प्रवाशांच्या रास्त मागण्या असूनही रेल्वे प्रशासन नेहमीच दुर्लक्ष करीत असल्याने नाईलाजाने आम्हांला अनेकवेळा विविध आंदोलने करून लक्ष वेधून घ्यावे लागले. कोकण रेल्वे मार्गावरील रेल्वे गाड्या ह्या कोकणी प्रवाशांच्या सोयीसाठी नसून सर्व दृष्टीने गैरसोयीच्या आहेत, असे सावंत यांनी सांगितले.कोकण रेल्वे प्रशासन प्रवाशांची चारही बाजूंनी लूट करूनही दखल घ्यायला प्रशासन तयार नाही. कुठच्याही मागणीसाठी रेल्वे बोर्डाकडे बोट दाखविले जाते. हे जर खरे असेल तर प्रवाशांच्या मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी काय पत्रव्यवहार केला ते कोकण रेल्वे प्रशासनाने जाहीर करावे.आमच्या माहितीप्रमाणे कुठलेही वरिष्ठ नियंत्रण बोर्ड प्रशासनाशी विचारविनिमय केल्याशिवाय निर्णय घेत नाही. स्थानिक समस्या दिल्लीत बसून समजत नाहीत. असे असताना कोकण रेल्वे प्रशासन महंमद तुघलकाच्या भूमिकेत आहे. याची दखल घेऊन कोकण रेल्वे प्रशासनाला वठणीवर आणण्यासाठी लोकप्रतिनिधींनी प्रयत्न करणे गरजेचे आहे, असेही सावंत म्हणाले.वास्तविक रेल्वे प्रवाशांच्या समस्या रेल्वे स्थानकावरील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन सोडविणे हे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. परंतु कोकण रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी स्थानिक कर्मचाऱ्यांना विश्वासात घेणे कमीपणाचे मानतात आणि म्हणूनच प्रवाशांच्या या समस्या दिवसेंदिवस वाढत आहेत, असे ते म्हणाले.कोकण रेल्वे मार्गावरील प्रवाशांच्या समस्या सोडविण्यासाठी कोकण रेल्वे प्रवासी संघटनेने १ मे रोजी सावंतवाडी रेल्वे स्थानकावर एल्गार आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. परंतु प्राप्त परिस्थितीत देशावरील कोरोना संकट लक्षात घेता हे आंदोलन १५ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.याची दखल घेऊन खासदार विनायक राऊत आणि जिल्ह्यातील अन्य लोकप्रतिनिधींनी आमच्या रास्त मागण्यांबाबत रेल्वे बोर्डाशी पत्रव्यवहार करून प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्न करावा, अशी मागणी मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्हा कोकण रेल्वे प्रवासी संघटनेतर्फे करण्यात येत आहे, असे सावंत म्हणाले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गKonkan Railwayकोकण रेल्वे