शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
4
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
5
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
6
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
7
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
8
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
9
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
10
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
11
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
12
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
13
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
14
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
15
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
16
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
17
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
20
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी

"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2025 20:54 IST

निलेश राणे यांनी एकनाथ शिंदे यांचे उपकार कधीच विसरणार नाही, असं म्हटलं.

Nilesh Rane On Eknath Shinde: विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगलेच यश मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचा दारुण पराभव केला. माजी खासदार निलेश राणे यांना पक्षात घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी खेळी खेळली होती. त्यानंतर विधानसभा निवडणुकीतही निलेश राणे यांना यश मिळाल्याने तळ कोकणात राणे कुटुंबाची ताकद चांगलीच वाढली आहे. त्यानंतर शुक्रवारी एकनाथ शिंदे यांनी निलेश राणे यांच्या कुडाळ मतदारसंघात आभार सभा घेतली. यावेळी निलेश राणे यांनी मी आता  कधीच शिवसेना सोडणार नाही असं म्हटलं.

शिवसेना शिंदे गटाकडून विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाबद्दल आभार सभा घेतल्या जात आहे. शिवसेना आमदार निलेश राणे यांच्या सभेतही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हजेरी लावत कोकणाचा सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील असं म्हटलं. यावेळी निलेश राणे यांनी शिंदे यांचे उपकार कधीच विसरणार नाही, असं म्हटलं. विरोधक माझ्यावर जी टीका करतात, मला पराभूत करण्यासाठी तुम्हाला २५ वर्षे वाट पाहावी लागेल. तुम्हाला मी लोकप्रतिनिधी होऊ देणार नाही. या जिल्ह्यातून तुम्ही निवडून याल अशी परिस्थितीच आम्ही विरोधकांची ठेवणार नाही," असा इशारा आमदार निलेश राणे यांनी दिला.

"आम्ही असेच आलेलो नाही. आम्ही कष्टाने इथे आलो आहोत. स्वतःला बदलून आलो आहोत. या सिंधुदुर्गाने आमच्या राणे कुटुंबासाठी हे दिवस दाखवले. जोपर्यंत जीव आहे तोपर्यंत सिंधूदुर्गासाठीच करणार. या निलेश राणेला दहा वर्षाच्या वनवासानंतर कोणी जिवंत केले असेल तर ते माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्याने के केले. मी आयुष्यात दुसऱ्या पक्षात जाणार नाही. ज्या एकनाश शिंदेंनी कपाळाला गुलाल लावला हे उपकार मी आयुष्यात विसरणार नाही. मी दुसरीकडे कशाला जाऊ. मी घरी बसेन पण एकनाथ शिंदे यांना सोडणार नाही. एकनाथ शिंदे यांनी तेव्हाच सांगितले होती की मलाच तिकीट देणार. तिकीट तर दिलेच पण जिंकून सुद्धा आणले. ही किमया त्यांची आहे," असे निलेश राणे म्हणाले.

मी एसंशि नसून महाराष्ट्रासाठी गरजेचा आहे - एकनाथ शिंदे 

"कोकणाच्या मातीत तयार झालेल्या लढवय्या शिवसैनिकांना भेटण्यासाठी मी इथे आलो असून त्यांच्यामुळेच विधानसभा निवडणुकीत कोकणातील ८ मतदारसंघात महायुतीला विजय मिळवता येणे शक्य झाले आहे. लाडक्या बहीण भावांची साथ हीच कोकणाला नव्या वाटेवर घेऊन जाणार असून आमदार निलेश राणेंच्या पुढाकाराने भविष्यात नव्हे तर वर्तमानातच कोकणाचा सर्वांगीण विकासासाठी शिवसेना कटिबद्ध राहील. आमच्यावर आरोपांची राळ उठविणारे जेमतेम वीस जागा निवडून आणू शकले आहेत. तरीही नुसती टीका करण्यापलीकडे ते काही करू शकले नाहीत. पहलगाम हल्ल्यानंतर बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीकडे देखील त्यांनी पाठ फिरवली आहे. उबाठा प्रमुख तर स्वतः परदेशात गेले आहेत. मला 'एसंशि' नाव दिले आहे मात्र मी नुसता 'एसंशि' नसून महाराष्ट्रासाठी ‘एसंशियल’ म्हणजे 'गरजे'चा आहे," असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. 

टॅग्स :Nilesh Raneनिलेश राणे Eknath Shindeएकनाथ शिंदेkudal-acकुडाळsindhudurgसिंधुदुर्ग