शहरं
Join us  
Trending Stories
1
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
2
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
3
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
4
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता
5
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
6
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
7
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
8
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
9
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
10
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
11
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
12
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
13
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
14
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
15
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
16
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
17
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
18
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
19
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
20
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला

मोदी सरकारची आठ वर्षे सुशासन, गरीब कल्याणाची!, काँग्रेसच्या काळात देशाची बदनामी-नितेश राणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2022 12:30 IST

कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा. अमेरिका, चीनला मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल.

कणकवली : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत अकरा कोटी पेक्षा जास्त शेतकऱ्यांना १८२ लाख कोटी रुपयाचे वाटप मोदी सरकारने केले आहे.कोरोना काळात ८० कोटी जनतेला मोफत अन्नधान्य,स्वतःच्या कोरोना लस निर्माण केल्या,९ कोटी महिलांना मोफत गॅस कनेक्शन, ३ कोटीहून अधिक लोकांना मालकीचे घर देणे , सुमारे तीस लाख फेरीवाल्यांना कर्जपुरवठा करून पुन्हा व्यवसाय उभारण्यात आल्या आहेत. ४१ कोटींहून अधिक जनधन खाती या सारख्या शेकडो योजनांतून मोदी सरकारने गरीब कल्याण कार्यक्रम प्रभावीपणे अमलात आणल्याने शोषित, वंचित वर्गाला संरक्षण मिळाले आहे असे प्रतिपादन भाजपचे आमदार नितेश राणे यांनी केले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या आठव्या वर्षपूर्ती निमित्त भारतीय जनता पार्टीने आयोजित केलेल्या सेवा, सुशासन, गरीब कल्याणाची ८ वर्षे या अभियानाचे औचित्य साधत कणकवली येथील पत्रकार परिषदेत आमदार नितेश राणे बोलत होते . ते म्हणाले , 'सब का साथ, सब का विकास', 'सब का विश्वास आणि सब का प्रयास 'हा मंत्र घेऊन मोदी सरकारने गेल्या आठ वर्षात अंत्योदय आणि एकात्म मानववादाला केंद्रस्थानी ठेवत गोरगरिबांच्या कल्याणाच्या अनेक योजना प्रत्यक्षात आणल्या . त्याचबरोबर देशांतर्गत सुरक्षा मजबूत करणे , दहशतवादी शक्तींना त्याच भाषेत उत्तर देण्याचे कणखर धोरण यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवरही भारताची प्रतिमा बलशाली राष्ट्र अशी तयार झाली आहे. वैश्विक पातळीवर भारताकडे आदराने पाहिले जात आहे .भारतीय अर्थव्यवस्था जगातील वेगाने वाढणारी

भारतासारख्या खंडप्राय देशात लसीकरणाचे आव्हान यशस्वीपणे पेलत मोदी सरकारने प्रगत देशांनाही मागे टाकले . कोरोना काळातच पंतप्रधान गरीब कल्याण योजना राबवत गोरगरीब उपाशी राहणार नाही याची काळजी घेतली. या योजनेची जागतिक बँकेनेही प्रशंसा केली आहे. आत्मनिर्भर भारतासारखी संकल्पना प्रत्यक्षात आणल्यामुळे भारताची अर्थव्यवस्था जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी अशी ओळख झाली आहे.

देश मोदींच्या नेतृत्वात महासत्ता बनेलआजची जगातील महागाई पाहता श्रीलंका, पाकिस्तान, नेपाळ असे देश फारच अडचणीत आले आहेत.त्या मानाने भरतात महागाई खूपच आटोक्यात आहे. कोरोनानंतर देश स्थिरावतो आहे सावरतो आहे त्यामुळे जनतेने संयम पाळावा अमेरिका, चीनला  मागे टाकून भारत देश मोदींच्या नेतृत्वाखाली महासत्ता बनेल. असा विश्वास आमदार राणे यांनी व्यक्त केला.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे Narendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेस