शहरं
Join us  
Trending Stories
1
शांती चर्चेला खो! इराणने अमेरिकेसमोर अ़डवली गाडी; होर्मुझचा अडथळा दूर झाल्याशिवाय चर्चाच नाही!
2
धार्मिक चालीरितींचे पालन करण्याचा कार्यालयातील तरुणींवर दबाव, नागपुरातील एनजीओ चालकाला अटक
3
मृत्यूनंतर ५० दिवस उलटले, तरी अयातुल्ला अली खामेनेईंच्या अंत्यविधीचा पत्ता नाही; इराण नक्की कशाला घाबरतोय?
4
IPL 2026 : पंतच्या LSG ला पराभूत करत Punjab Kings नं रचला इतिहास; १९ वर्षांत पहिल्यांदाच असं घडलं
5
Bigg Boss Marathi 6 Winner: अंदाज खरा ठरला! तन्वी कोलतेने पटकावली 'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी; राकेश बापट उपविजेता
6
'...तर इराणचे पॉवर प्लांट नष्ट करू', पाकिस्तानमधील शांतता बैठकीपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांचा थेट इशारा
7
उरुळी कांचनमध्ये अल्पवयीनावर लैंगिक अत्याचार; ग्राफिक्स व्यावसायिकाविरुद्ध गुन्हा
8
Tanvi Kolte: 'बिग बॉस मराठी ६'ची विजेती तन्वी कोलतेचं घराबाहेर जाताना मोठं विधान, म्हणाली- "मी आता एक ब्रँड म्हणून..."
9
एडन मार्करम ते अभिषेक शर्मा! IPL इतिहासात एका षटकात ५ षटकार खाणारे ७ गोलंदाज
10
Video: "घुसखोर निघाला ना, तर तुला इथूनच उचलून घेऊन जाईन", म्हाडाचे उपाध्यक्ष IAS संजीव जयस्वाल यांची रहिवाशाला दमबाजी; व्हिडीओ व्हायरल
11
चाकूर हादरले; गायब दोघा चिमुकल्या भावंडांपैकी एकाचा मृतदेहच आढळला!
12
Bigg Boss Marathi 6: अनुश्री माने गेली घराबाहेर! 'बिग बॉस मराठी ६'चा प्रवास संपला, विशाल रडला
13
शतकासाठी नव्हे आम्ही संघासाठी खेळतो! प्रियांश-कूपर जोडीचा सुपर हिट शो; एका डावात अनेक विक्रम
14
ट्रम्प पाकिस्तानात येणार? इस्लामाबादमध्ये कडेकोट सुरक्षा; अमेरिका-इराण चर्चेच्या पार्श्वभूमीवर ‘लॉकडाऊन’सारखी स्थिती
15
पापणी लवते न लवते तोच... 'खेळ खल्लास!' Dhruv Jurel च्या स्टंपिंगला 'क्रिकेटच्या देवा'नंही दिली दाद
16
Bigg Boss Marathi 6: 'हा' स्पर्धक गेला घराबाहेर! ग्रँड फिनालेच्या सुरुवातीलाच मोठा धक्का
17
फटाक्याच्या कारखान्यात भंयकर स्फोट, १९ कामगारांचा तडफडून मृत्यू, ६ जण होरपळले
18
नातं रक्ताचं नाही तर मनाचं! पत्नीचं दुसऱ्यावर जडलं प्रेम; पतीनेच पुढाकार घेऊन प्रियकरासोबत रवाना केलं!
19
अकोला, वर्धा देशात सर्वाधिक ‘हॉट’; पार ४५ अंश सेल्सिअसवर पारा
20
Solapur Crime: 'तुम्ही येथून निघून जा म्हणायचा', मृतदेह सापडलेल्या मल्हारीचा बहिणीनेच आवळला गळा; हत्येचे बिंग कसे फुटले?
Daily Top 2Weekly Top 5

आंबा उत्पादनाबरोबर निर्यात वाढ हवी : देशमुख

By admin | Updated: February 25, 2015 00:11 IST

युरोपिय देशांनी फळमाशीचे कारण देत काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठविली असली तरी भाजीपाला निर्यातीवील बंदी कायम ठेवली आहे.

रत्नागिरी : महाराष्ट्रातून ४१ हजार मेट्रिक टनापेक्षा अधिक आंबा निर्यात होतो. रोजगार हमी योजनेंतर्गत १८ लाख हेक्टर क्षेत्रावर आंब्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्याचे मुख्य पीक भात असले तरी ते उदरनिर्वाहासाठी असून, आंबा हे पैसे मिळवून देणारे पीक आहे. शेतकऱ्यांनी आंबा उत्पादकतेबरोबर निर्यातीसाठी प्रयत्न करावेत, असे प्रतिपादन राज्य कृषी आयुक्त विकास देशमुख यांनी केले.कृषी विभाग आणि फलोत्पादन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आंबा निर्यातीच्या संधी व आव्हाने’ या विषयावर आयोजित कार्यशाळेच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वेंकटश्वरलू, केंद्र शासनाचे प्लँट प्रोटेक्शन अ‍ॅडव्हायजर डॉ. सुशील, अपेडाचे संचालक डॉ. ए. एस. रावत, उपमहाव्यवस्थापक डॉ. सुधांशू, रिजनल प्लँट क्वारंटाईन मुंबईचे डॉ. जे. पी. सिंग, जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार काळम-पाटील, पणन विभागाचे मिलिंद जोशी, पर्णिका बुरांडे, शास्त्रज्ञ डॉ. बुरोणकर, जिल्हा कृषी अधीक्षक सी. एस. गायकवाड उपस्थित होते.  युरोपिय देशांनी फळमाशीचे कारण देत काही अटी ठेवत निर्यातीवरील बंदी उठविली असली तरी भाजीपाला निर्यातीवील बंदी कायम ठेवली आहे. आंब्यावर सुमारे ६० मिनिटे ४० अंश सेल्सिअस उष्णजल प्रक्रिया केल्यावर आंब्याच्या दर्जावर काही परिणाम होईल का, याबाबत संशोधन सुरू आहे. परंतु भविष्यात निर्यात अखंड राहण्यासाठी आंबा लागवड, एकात्मिक कीड व रोग व्यवस्थापन, कीटकनाशक फवारणी, फळमाशी नियंत्रणासाठी रक्षक सापळ्यांचा वापर याबाबत शेतकऱ्यांनी सतर्क राहाणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांसाठी फायटोसॅनेटरी प्रमाणपत्राची उपलब्धता करण्यात आली आहे. शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून वेळोवेळी शास्त्रीयदृष्ट्या माहिती देण्यात येईल, असे देशमुख यांनी सांगितले. यावेळी ‘आंबा निर्यात संधी व आव्हाने’ मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. फलोत्पादन विभागाचे संचालक डॉ. एस. एस. अडसूळ यांनी प्रास्ताविक केले. अपेडाचे संचालक डॉ. ए. एस. रावत यांनी हापूसचा दर्जा टिकवून ठेवण्याचे आवाहन केले.केंद्र शासनाचे वनस्पती संरक्षण सल्लागार सुशील यांनी आंब्याचे एक हजार प्रकार असले तरी निर्यात कमी आहे, असे सांगितले. मँगोनेट प्रमाणपत्र डॉ. विवेक भडे व नरहरी वैद्य यांना वितरीत करण्यात आले. सूत्रसंचालन आरीफ शहा व मनीषा शहा यांनी केले. विभागीय कृषी संचालक जाधव यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)