शहरं
Join us  
Trending Stories
1
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
कधीही फसणार नाही! ‘या’ स्ट्रॅटजीनं कराल म्युच्युअल फंडात गुंतवणूक; बनू शकेल मोठा पैसा, अनेकांना माहितच नाही
4
"साहेब, तुम्ही जे म्हणता तेच..."; राज ठाकरेंचा व्हिडीओ केला पोस्ट, मनसेचा नेता काय म्हणाला?
5
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
6
उत्तर महाराष्ट्रात भाजपाची ताकद वाढणार; पुढील ४८ तासांत २ माजी आमदारांचा पक्षप्रवेश होणार
7
"आता सगळं ठीक झालंय...", परेश रावल यांचं 'हेरा फेरी ३'मध्ये कमबॅक; नक्की काय घडलं होतं?
8
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
9
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
10
पाकिस्तानमध्ये तुफान चालतोय 'सरदार जी ३', दिलजीतची सोशल मीडियावर माहिती; होतेय टीका
11
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
12
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
13
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
14
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
15
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
16
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
17
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
18
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
19
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
20
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग

धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

कोरड कायम : धडाकेबाज मान्सूनची बळीराजाला प्रतीक्षा

प्रकाश वराडकर - रत्नागिरीजिल्ह्यातील रत्नागिरी पाटबंधारे विभाग (द.) अंतर्गत येणाऱ्या २४ धरणांपैकी ७ धरणेवगळता अन्य सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घसरण झाली आहे. मान्सूनचे धडाकेबाज आगमन अद्याप झालेले नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. अनेक ठिकाणी भाताची पेरणी पूर्ण झाली असून, बळीराजा आता आकाशाकडे नजर लावून आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात खेड येथे असलेल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २८.०८० दशलक्ष घनमीटर असून, खेडमधील काही नळयोजना, सिंचन क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे परिसरातील उद्भवात पाणी उपलब्ध होते. मात्र, धरणातील पाणीसाठाच संपुष्टात आल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. आंबतखोल, मालघर, अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर व शेरेवाडी या सात धरणांमध्ये १ दशलक्ष घनमीटर्सपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. उर्वरित १६ पैकी केळंबा धरणातील पाणीसाठा १७ फेब्रुवारी २०१५ रोजी संपला आहे. बारेवाडी या धरणातील पाणीसाठा २६ डिसेंबर २०१४ रोजी संपला आहे. गवाणे, निवे, असुर्डे व फणसवाडी या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. रत्नागिरी एमआयडीसीकडून हरचेरी धरणातू एमआयडीसीबरोबरच परिसरातील कुवारबाव, पोमेंडी, नाचणे, मिरजोळे, शिरगाव, कर्ला या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही जून महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. धरणातील पाणी साठ्याबाबत चिंता असली तरी जून महिना पुरेल इतके असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान नागरिकांना पुढील काही दिवस पावसाची प्रतीक्षा करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)शीळमध्ये मुबलक पाणीरत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण पाटबंधारेच्या चिपळूण विभागाकडे असून, या धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. येत्या जुलै महिन्यापर्यंत पाऊस आला नाही तरी हे पाणी पुरेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या आठवड्यात पाऊस झाला तर पुढील टंचाई टळेल. ७५ टक्के पाणी संपले रत्नागिरी पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत २४ धरणांमध्ये प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता ७४.८६ दशलक्ष घनमीटर आहे. ११ जून २०१५ अखेर यातील दोन धरणातील साठा संपला आहे. उर्वरित धरणांमध्ये १७.७४० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. प्रकल्पीय साठा व सध्याचा साठा पाहता या धरणांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा आहे. ७५ टक्के पाणीसाठा संपुष्टात आला आहे.