शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
6
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
7
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
8
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
9
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
10
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
11
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
12
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
13
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
14
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
17
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
18
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
19
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
Daily Top 2Weekly Top 5

धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

कोरड कायम : धडाकेबाज मान्सूनची बळीराजाला प्रतीक्षा

प्रकाश वराडकर - रत्नागिरीजिल्ह्यातील रत्नागिरी पाटबंधारे विभाग (द.) अंतर्गत येणाऱ्या २४ धरणांपैकी ७ धरणेवगळता अन्य सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घसरण झाली आहे. मान्सूनचे धडाकेबाज आगमन अद्याप झालेले नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. अनेक ठिकाणी भाताची पेरणी पूर्ण झाली असून, बळीराजा आता आकाशाकडे नजर लावून आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात खेड येथे असलेल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २८.०८० दशलक्ष घनमीटर असून, खेडमधील काही नळयोजना, सिंचन क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे परिसरातील उद्भवात पाणी उपलब्ध होते. मात्र, धरणातील पाणीसाठाच संपुष्टात आल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. आंबतखोल, मालघर, अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर व शेरेवाडी या सात धरणांमध्ये १ दशलक्ष घनमीटर्सपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. उर्वरित १६ पैकी केळंबा धरणातील पाणीसाठा १७ फेब्रुवारी २०१५ रोजी संपला आहे. बारेवाडी या धरणातील पाणीसाठा २६ डिसेंबर २०१४ रोजी संपला आहे. गवाणे, निवे, असुर्डे व फणसवाडी या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. रत्नागिरी एमआयडीसीकडून हरचेरी धरणातू एमआयडीसीबरोबरच परिसरातील कुवारबाव, पोमेंडी, नाचणे, मिरजोळे, शिरगाव, कर्ला या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही जून महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. धरणातील पाणी साठ्याबाबत चिंता असली तरी जून महिना पुरेल इतके असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान नागरिकांना पुढील काही दिवस पावसाची प्रतीक्षा करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)शीळमध्ये मुबलक पाणीरत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण पाटबंधारेच्या चिपळूण विभागाकडे असून, या धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. येत्या जुलै महिन्यापर्यंत पाऊस आला नाही तरी हे पाणी पुरेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या आठवड्यात पाऊस झाला तर पुढील टंचाई टळेल. ७५ टक्के पाणी संपले रत्नागिरी पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत २४ धरणांमध्ये प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता ७४.८६ दशलक्ष घनमीटर आहे. ११ जून २०१५ अखेर यातील दोन धरणातील साठा संपला आहे. उर्वरित धरणांमध्ये १७.७४० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. प्रकल्पीय साठा व सध्याचा साठा पाहता या धरणांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा आहे. ७५ टक्के पाणीसाठा संपुष्टात आला आहे.