शहरं
Join us  
Trending Stories
1
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
2
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
3
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
4
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
5
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
6
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
7
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
8
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
9
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
10
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
11
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
12
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
13
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
14
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
15
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
16
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
17
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
18
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
19
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
20
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...

धरणसाठ्यात घसरण, पदरी वणवण...

By admin | Updated: June 12, 2015 00:42 IST

कोरड कायम : धडाकेबाज मान्सूनची बळीराजाला प्रतीक्षा

प्रकाश वराडकर - रत्नागिरीजिल्ह्यातील रत्नागिरी पाटबंधारे विभाग (द.) अंतर्गत येणाऱ्या २४ धरणांपैकी ७ धरणेवगळता अन्य सर्वच धरणांतील पाणीसाठ्यात मोठी घसरण झाली आहे. मान्सूनचे धडाकेबाज आगमन अद्याप झालेले नसल्याने जिल्ह्यातील ग्रामीण भागात तीव्र पाणीटंचाई आहे. पाण्यासाठी जनतेची वणवण सुरू आहे. अनेक ठिकाणी भाताची पेरणी पूर्ण झाली असून, बळीराजा आता आकाशाकडे नजर लावून आहे. रत्नागिरी पाटबंधारे विभागाअंतर्गत जिल्ह्यात खेड येथे असलेल्या नातूवाडी मध्यम प्रकल्पातील पाणीसाठा संपुष्टात आला आहे. या धरणाचा प्रकल्पीय पाणीसाठा २८.०८० दशलक्ष घनमीटर असून, खेडमधील काही नळयोजना, सिंचन क्षेत्र या धरणावर अवलंबून आहे. धरणातील पाणीसाठ्यामुळे परिसरातील उद्भवात पाणी उपलब्ध होते. मात्र, धरणातील पाणीसाठाच संपुष्टात आल्याने पाण्याची समस्या गंभीर बनली आहे. आंबतखोल, मालघर, अडरे, गुहागर, शिरवली, सोंडेघर व शेरेवाडी या सात धरणांमध्ये १ दशलक्ष घनमीटर्सपेक्षा अधिक पाणीसाठा आहे. उर्वरित १६ पैकी केळंबा धरणातील पाणीसाठा १७ फेब्रुवारी २०१५ रोजी संपला आहे. बारेवाडी या धरणातील पाणीसाठा २६ डिसेंबर २०१४ रोजी संपला आहे. गवाणे, निवे, असुर्डे व फणसवाडी या धरणांमध्ये अत्यल्प पाणीसाठा आहे. रत्नागिरी एमआयडीसीकडून हरचेरी धरणातू एमआयडीसीबरोबरच परिसरातील कुवारबाव, पोमेंडी, नाचणे, मिरजोळे, शिरगाव, कर्ला या ग्रामपंचायतींना पाणीपुरवठा केला जातो. या धरणातही जून महिनाअखेरपर्यंत पुरेल एवढा पाणीसाठा आहे. धरणातील पाणी साठ्याबाबत चिंता असली तरी जून महिना पुरेल इतके असल्याचे सांगण्यात येत असल्याने किमान नागरिकांना पुढील काही दिवस पावसाची प्रतीक्षा करता येणे शक्य आहे. (प्रतिनिधी)शीळमध्ये मुबलक पाणीरत्नागिरी तालुक्यातील शीळ धरण पाटबंधारेच्या चिपळूण विभागाकडे असून, या धरणातून रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा केला जातो. धरणात अजूनही मुबलक पाणीसाठा असल्याचे सांगण्यात आले. येत्या जुलै महिन्यापर्यंत पाऊस आला नाही तरी हे पाणी पुरेल, असे सांगण्यात आले आहे. मात्र येत्या आठवड्यात पाऊस झाला तर पुढील टंचाई टळेल. ७५ टक्के पाणी संपले रत्नागिरी पाटबंधारे विभाग (दक्षिण) अंतर्गत २४ धरणांमध्ये प्रकल्पीय पाणीसाठा क्षमता ७४.८६ दशलक्ष घनमीटर आहे. ११ जून २०१५ अखेर यातील दोन धरणातील साठा संपला आहे. उर्वरित धरणांमध्ये १७.७४० दशलक्ष घनमीटर एवढाच पाणीसाठा आहे. प्रकल्पीय साठा व सध्याचा साठा पाहता या धरणांमध्ये सध्या २५ टक्के पाणीसाठा आहे. ७५ टक्के पाणीसाठा संपुष्टात आला आहे.