शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
3
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
4
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
5
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
6
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
7
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
8
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
9
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
10
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
11
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
12
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
13
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
14
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
15
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट
16
‘आपण काय मेसेज करत आहात? हे व्हॉट्सअ‍ॅपला ठाऊक...’, इलॉन मस्‍क यांचा गंभीर आरोप, केली मोठी घोषणा
17
"दिल्लीचे नामांतर 'इंद्रप्रस्थ' करा"; केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांना भाजप खासदाराचे पत्र, पांडवांचा उल्लेख
18
११ कोटींची लॉटरी जिंकली, पण माणूस कुठे गेला? कोट्याधीश विजेत्याला शोधण्यासाठी कंपनीच घेतेय कष्ट
19
Tulasi Vivah Mangalashtak: तुलसी विवाहात 'ही' मंगलाष्टके आवर्जून म्हणा; मिळेल कन्यादानाचे पुण्य!
20
"वडिलांच्या निधनानंतर ६ महिन्यात संभाजी महाराज लेझीम खेळतील का?", 'छावा'मधल्या 'त्या' दृश्यावर स्पष्टच बोलले दिग्पाल लांजेकर

दीपक केसरकरांना अडविले नाही पण ते म्हणत असतील तर अभिमान - वरूण सरदेसाई 

By अनंत खं.जाधव | Updated: September 12, 2023 11:54 IST

शैक्षणिक धोरण चांगले पण अंमलबजावणी योग्य हवी

सावंतवाडी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर जे आमदार गुवाहाटीला गेले त्यात सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा समावेश होता. त्यांनी त्यावेळी युवा सेनेकडून आपणास अडवले म्हणून सांगितले, पण त्यांना आम्ही अडवले नव्हते. त्यांनी माझे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले. युवा सेनेकडून त्यांना अडविण्यात आले असेल तर त्यात गैर काय ? त्याचा मला अभिमानच वाटतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी मंत्री केसरकर यांची खिल्ली उडवली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण चांगले असले तरी अंमलबजावणी योग्य व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.सावंतवाडीत युवा सेनेच्या माध्यमातून फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, ऋची राऊत, सुशांत नाईक, सागर नाणोसकर, आबा सावंत, कौस्तुभ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात युवा सेनेच्या माध्यमातून जिथे जिथे जातो, तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. सर्वजण संघटनेच्या मागे उभे राहण्याची भावना व्यक्त करत आहेत. तिच भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील बघायला मिळत आहे. हा विश्वास कायम ठेवा, पक्षाची वाटचाल सर्वांना सोबत घेऊन करूया, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.कॉलेज कक्ष स्थापन करणारगणेश चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी २५ महाविद्यालयांमध्ये कॉलेज कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. युवा आणि युवती सेना स्थापन करून महाविद्यालयीन समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमलीयावेळी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत त्यांना विचारण्यात आले असता सरदेसाई म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असताना तत्कालीन मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमली. त्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मागील पन्नास-साठ वर्षांमध्ये शैक्षणिक धोरण अवलंबण्यात आले नव्हते. मात्र, शैक्षणिक धोरण चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. समानता आणण्यासाठी शैक्षणिक धोरणाचा फायदा होईल आणि ती अंमलबजावणी करताना पालकांना विश्वासात घेऊन केली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVarun Sardesaiवरुण सरदेसाईDeepak Kesarkarदीपक केसरकर