शहरं
Join us  
Trending Stories
1
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
2
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
3
थायलंड आणि कंबोडियामध्ये अखेर युद्धविराम! संघर्ष थांबला, या देशाची मध्यस्थी ठरली निर्णायक
4
टाटा ते HDFC बँक.. बाजाराच्या घसरणीतही 'हे' ५ स्टॉक करणार बंपर कमाई! एक्सपर्टने दिले टार्गेट प्राईज
5
बापरे! भारतात दहा रुपयांना मिळणारे पाणी 'या' देशात १ हजार रुपयांना मिळते; कारण काय?
6
कश्मीर खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात 'ऑपरेशन महादेव'चे तांडव! कसे ठरते ऑपरेशनचे नाव?
7
अवघ्या १९व्या वर्षी 'वर्ल्ड चॅम्पियन', विजयानंतर दिव्या देशमुखची आईला घट्ट मिठी, आनंदाश्रू अनावर (Video)
8
भारताला नकोय चीनचा पैसा; दरवाजे बंदच ठेवण्याचे संकेत, ड्रॅगनसाठी काय संदेश?
9
"आज आम्ही सत्तेत आहोत, पण कायमच सत्तेत राहू असे नाही"; सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह संसदेत काय म्हणाले?
10
Nag Panchami 2025 Upvas: भावाच्या रक्षणासाठी करतात नागपंचमीचा उपास; पूजेच्या वेळी टाळा 'ही' एक चूक!
11
बाजार २ महिन्यांच्या नीचांकी पातळीवर! सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, पण 'या' शेअरने दिला छप्परफाड परतावा!
12
₹३०० वरुन १ रुपयांवर आला 'हा' शेअर; विक्रीसाठी गुंतवणुकदारांची रांग, नकारात्मक बातमीचा परिणाम
13
Mumbai Local: पाऊस नसतानाही लोकलमधून छत्री घेऊन प्रवास, पण कारण काही वेगळच!
14
पहलगाम हल्ल्यातील मास्टरमाईंडचा खात्मा, एन्काऊंटरचे फोटो समोर, मिळाली धक्कादायक माहिती
15
सेल्फी अन् रीलचा नाद लय बेक्कार! काही सेकंदांचं वेड करतंय जीवाशी खेळ; फुकट जातोय वेळ...
16
नवीन कर प्रणालीतही टॅक्स वाचवता येतो! NPS, EPF पासून ते 'या' खास पर्यायांपर्यंत, बचत करण्याचे ७ प्रभावी मार्ग!
17
रायगड बोट दुर्घटनेत बेपत्ता झालेल्या ३ मच्छिमारांचे मृतदेह सापडले!
18
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
19
गुंतवणुकीसाठी बेस्ट आहे 'ही' सरकारी स्कीम; एकदा गुंतवणूक करा आणि दरवर्षी मिळवा २ लाखांचं फिक्स व्याज
20
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल

दीपक केसरकरांना अडविले नाही पण ते म्हणत असतील तर अभिमान - वरूण सरदेसाई 

By अनंत खं.जाधव | Updated: September 12, 2023 11:54 IST

शैक्षणिक धोरण चांगले पण अंमलबजावणी योग्य हवी

सावंतवाडी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर जे आमदार गुवाहाटीला गेले त्यात सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा समावेश होता. त्यांनी त्यावेळी युवा सेनेकडून आपणास अडवले म्हणून सांगितले, पण त्यांना आम्ही अडवले नव्हते. त्यांनी माझे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले. युवा सेनेकडून त्यांना अडविण्यात आले असेल तर त्यात गैर काय ? त्याचा मला अभिमानच वाटतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी मंत्री केसरकर यांची खिल्ली उडवली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण चांगले असले तरी अंमलबजावणी योग्य व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.सावंतवाडीत युवा सेनेच्या माध्यमातून फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, ऋची राऊत, सुशांत नाईक, सागर नाणोसकर, आबा सावंत, कौस्तुभ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात युवा सेनेच्या माध्यमातून जिथे जिथे जातो, तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. सर्वजण संघटनेच्या मागे उभे राहण्याची भावना व्यक्त करत आहेत. तिच भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील बघायला मिळत आहे. हा विश्वास कायम ठेवा, पक्षाची वाटचाल सर्वांना सोबत घेऊन करूया, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.कॉलेज कक्ष स्थापन करणारगणेश चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी २५ महाविद्यालयांमध्ये कॉलेज कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. युवा आणि युवती सेना स्थापन करून महाविद्यालयीन समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमलीयावेळी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत त्यांना विचारण्यात आले असता सरदेसाई म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असताना तत्कालीन मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमली. त्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मागील पन्नास-साठ वर्षांमध्ये शैक्षणिक धोरण अवलंबण्यात आले नव्हते. मात्र, शैक्षणिक धोरण चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. समानता आणण्यासाठी शैक्षणिक धोरणाचा फायदा होईल आणि ती अंमलबजावणी करताना पालकांना विश्वासात घेऊन केली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVarun Sardesaiवरुण सरदेसाईDeepak Kesarkarदीपक केसरकर