शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
पुढील ४ दिवस 'या' बँका बंद राहणार! आरबीआयकडून ३० एप्रिलपर्यंत सुट्ट्यांची यादी जाहीर
5
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
6
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
7
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
8
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
9
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
10
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
11
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
12
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
13
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
14
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
15
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
16
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
17
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
18
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
20
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई

दीपक केसरकरांना अडविले नाही पण ते म्हणत असतील तर अभिमान - वरूण सरदेसाई 

By अनंत खं.जाधव | Updated: September 12, 2023 11:54 IST

शैक्षणिक धोरण चांगले पण अंमलबजावणी योग्य हवी

सावंतवाडी : शिवसेनेत फूट पडल्यानंतर जे आमदार गुवाहाटीला गेले त्यात सध्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा समावेश होता. त्यांनी त्यावेळी युवा सेनेकडून आपणास अडवले म्हणून सांगितले, पण त्यांना आम्ही अडवले नव्हते. त्यांनी माझे नाव चुकीच्या पद्धतीने घेतले. युवा सेनेकडून त्यांना अडविण्यात आले असेल तर त्यात गैर काय ? त्याचा मला अभिमानच वाटतो, अशा शब्दात शिवसेना ठाकरे गटाचे युवा नेते वरूण सरदेसाई यांनी मंत्री केसरकर यांची खिल्ली उडवली. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारचे शैक्षणिक धोरण चांगले असले तरी अंमलबजावणी योग्य व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.सावंतवाडीत युवा सेनेच्या माध्यमातून फलकाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी शिवसेना सचिव खासदार विनायक राऊत, जिल्हाप्रमुख संजय पडते, संदेश पारकर, अतुल रावराणे, चंद्रकांत उर्फ बाळा गावडे, ऋची राऊत, सुशांत नाईक, सागर नाणोसकर, आबा सावंत, कौस्तुभ गावडे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

महाराष्ट्रात युवा सेनेच्या माध्यमातून जिथे जिथे जातो, तेथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख केला जातो. सर्वजण संघटनेच्या मागे उभे राहण्याची भावना व्यक्त करत आहेत. तिच भावना सिंधुदुर्ग जिल्ह्यातदेखील बघायला मिळत आहे. हा विश्वास कायम ठेवा, पक्षाची वाटचाल सर्वांना सोबत घेऊन करूया, असे आवाहन सरदेसाई यांनी केले.कॉलेज कक्ष स्थापन करणारगणेश चतुर्थीनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणखी २५ महाविद्यालयांमध्ये कॉलेज कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. युवा आणि युवती सेना स्थापन करून महाविद्यालयीन समस्यांवर मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच त्यांच्या समस्या सोडविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमलीयावेळी नवीन शैक्षणिक धोरणाबाबत त्यांना विचारण्यात आले असता सरदेसाई म्हणाले, नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात येणार असताना तत्कालीन मुख्यमंत्री, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अभ्यास समिती नेमली. त्यामध्ये चांगल्या गोष्टी आहेत. मागील पन्नास-साठ वर्षांमध्ये शैक्षणिक धोरण अवलंबण्यात आले नव्हते. मात्र, शैक्षणिक धोरण चांगले असले तरी त्याची अंमलबजावणी महत्त्वाची आहे. समानता आणण्यासाठी शैक्षणिक धोरणाचा फायदा होईल आणि ती अंमलबजावणी करताना पालकांना विश्वासात घेऊन केली पाहिजे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गVarun Sardesaiवरुण सरदेसाईDeepak Kesarkarदीपक केसरकर