शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यात भारताचा १ जवान शहीद, एकाची प्रकृती गंभीर, तर तिघं..
2
नरेंद्र मोदी हे आठवडामंत्री झाले आहेत, कारण...; शरद पवारांचा घणाघात
3
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सहज जिंकला सामना, गुजरात टायटन्सला नमवून Mumbai Indians ला दिला धक्का 
4
२५ धावांत ६ विकेट्स ! RCB ने पायावर धोंडा मारला, जॉश लिटल GT चा नायक ठरला 
5
विराट कोहलीचा भीमपराक्रम! उत्तुंग षटकार पाहताच भारी होती अनुष्का शर्माची रिॲक्शन, Video
6
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
7
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
8
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
9
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
10
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान, ओला दुष्काळ जाहीर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 3:47 PM

जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.

ठळक मुद्दे जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे भातशेतीचे नुकसान पंचनामे करून ओला दुष्काळ जाहीर करा : रणजित देसाई यांची मागणी

कुडाळ : जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या भातशेती नुकसानीचे पंचनामे करून तत्काळ करून ओला दुष्काळ जाहीर करा, अशी मागणी प्रशासनाकडे प्रसिध्दीपत्रकातून जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष रणजित देसाई यांनी केली असून याबाबत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात येणार असेही सांगितले.या प्रसिध्दीपत्रकात रणजित देसाई यांनी नमुद केले की, संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आॅगस्ट व सप्टेंबर महिन्यात अनेक वेळा अतिवृष्टी झाल्यामुळे भात शेतीचे फार मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी भातशेती पाण्याखाली गेली असून काही ठिकाणी तर अक्षरश: कुजायला लागली आहे.

कोरोनाच्या कालावधीत अनेक सुशिक्षित बेरोजगार, चाकरमानी व शेतकरीवर्गाने आत्मनिर्भर होण्याच्यादृष्टीने वर्षानुवर्षे पडीक असलेल्या जमिनीवर शेती केली होती. दरवर्षीच्या तुलनेत यावर्षी भात शेती मोठ्या प्रमाणात करण्यात आली होती.जिल्ह्यातील शेतकरी हा आपल्याला संपूर्ण वर्षभर लागणारे तांदूळ व इतर धान्य हे स्वत:च्या शेतातच पिकवतात व त्यावर त्यांची गुजराण चालते. स्वत:चा उदरनिर्वाह करता लागणारे धान्य राखून उर्वरित सर्व धान्य हे विक्री करून त्यातच त्यांचा वर्षभराचा संसार चालतो. मात्र दुदैर्वाने गेल्या महिन्याभरात वारंवार होत असलेल्या मुसळधार पावसामुळे या सर्वांचे तोंडचे पाणी पळाले आहे.त्यामुळे शासनाने तातडीने या सर्व नुकसानीचे पंचनामे करावेत व संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर करावा.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याFarmerशेतकरी