शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

सिंधुदुर्गचा डोंगराळ’मध्ये समावेशाचा निर्णय

By admin | Updated: June 27, 2015 00:22 IST

वैभव नाईक : मालवण येथील बैठकीत माहिती

मालवण : शिक्षणाबरोबरच ग्रामीण आरोग्य यंत्रणा सुधारणे आवश्यक आहे. शिक्षण व आरोग्य योजनेच्या सक्षमीकरणासाठी शासन कटिबद्ध आहे. शिक्षणाचे सार्वत्रीकरण करून ते तळागाळापर्यंत पोहोचविणे आवश्यक असून, तालुक्यात विशेष आरोग्य सुविधा निर्माण करण्यासाठी मंत्री मंडळाच्या बैठकीत जिल्ह्याचा डोंगराळ प्रवर्गामध्ये समावेश करण्याबाबत निर्णय झाला असल्याची माहिती आमदार वैभव नाईक यांनी दिली.पंचायत समितीच्या छत्रपती संभाजीराजे सभागृहात आरोग्य व शिक्षण तालुका सनियंत्रण सल्लागार समितीची बैठक झाली. यावेळी समिती अध्यक्ष आमदार वैभव नाईक, तहसीलदार वनिता पाटील, गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर, सभापती सीमा परुळेकर, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीराम शिरसाट, जिल्हा परिषदेचे सदस्य संग्राम प्रभूगावकर, समिती सदस्या भाग्यता वायंगणकर, उदय दुखंडे, आरोग्य विस्तार अधिकारी सूरज बांगर, शिक्षण विस्तार अधिकारी वसंत महाले यांच्यासह अन्य अधिकारी वर्ग उपस्थित होते.तालुक्याच्या आरोग्यविषयक स्थितीची माहिती देताना समिती सचिव तथा वैद्यकीय अधिकारी डॉ. संजय पोळ म्हणाले, महाराष्ट्र राज्याचा जन्मदर १२ एवढा आहे. मात्र, मालवण तालुक्याचा जन्मदर ८.९ टक्के एवढा आहे. केरळ राज्यात देशात सर्वाधिक कमी ६ टक्के एवढा जन्मदर आहे. केरळ राज्याशी मालवणची स्पर्धा सुरू आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक कमी जन्मदर मालवण तालुक्यात आहे. अर्भक मृत्यूप्रमाण ११ टक्के आहे, तर गतवर्षी एकाही मातेचा मृत्यू झाला नाही, असे सांगितले.यावेळी आमदार नाईक म्हणाले, तालुक्यासाठी आरोग्य यंत्रणा सुधारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. यासाठी मंत्रिमंडळाच्या बैठकीत सिंधुदुर्ग जिल्ह्याला डोंगराळ भागाचा विशेष दर्जा देण्यात यावा यासाठी निर्णय झाला आहे. या निर्णयामुळे डॉक्टरांना अधिकाधिक सुविधा पुरविता येणे शक्य होणार आहे. वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानाच्या दुरुस्तीबाबतही प्रस्ताव तयार करून ते आपल्याकडे पाठवून द्या तसेच तालुक्यात कुपोषण निर्मूलनासाठी १० ते १२ लाख दरवर्षी खर्च केले जातात. भविष्यात तालुक्यात एकही कुपोषित बालक राहता कामा नये असे आमदार नाईक यांनी सांगितले.गटविकास अधिकारी राजेंद्र पराडकर म्हणाले, तालुक्यातील प्रत्येक शाळांमध्ये किमान एक तरी सुस्थितीतील संगणक असावा व तो पुरविण्याचा उपक्रम पंचायत समितीने हाती घेतला आहे. यासाठी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या १३ व्या वित्त आयोगाचा निधी खर्च करण्यात आला आहे. आरोग्यमंत्र्यांनी लक्ष द्यावेमालवण तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना १० वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र, यातील पाच पदे रिक्त आहेत. जिल्ह्यात ३८ प्राथमिक आरोग्य केंद्रे आहेत. यामध्ये ७६ एमबीबीएस पदे मंजूर आहेत. यातील २० पदे रिक्त आहेत, तर ६ पदे भरलेली आहेत. परंतु, तेही दुसरीकडे कार्यरत आहेत, तर ८ डॉक्टर पोस्ट ग्रॅज्युएशनसाठी सुटीवर आहेत. जिल्ह्याला ८ तालुका वैद्यकीय अधिकारी पदे मंजूर आहेत. मात्र, तीनच पदे कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे १०८ नंबरची रूग्णवाहिका केवळ गोवा व कोल्हापूर येथेच रूग्णांना घेऊन जाते. एखाद्या रुग्णाला मुंबईला घेऊन जायचे असेल तर ही रुग्णवाहिका पाठविली जात नाही. राज्याचे आरोग्यमंत्री या जिल्ह्याचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांनी किमान विशेष पॅकेज म्हणून लक्ष द्यावे, असे आवाहन संग्राम प्रभूगावकर यांनी केले.