शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्ली कॅपिटल्स जिंकले, राजस्थान रॉयल्सचे प्ले ऑफचे तिकीट पक्के झाले! गणित बिघडले
2
Rakhi Sawant : राखी सावंतची प्रकृती बिघडली, रुग्णालयातील फोटो व्हायरल, नेमकं काय झालंय?
3
जगातील कोणतीही शक्ती CAA ला रोखू शकत नाही; अमित शाहंचा TMC-काँग्रेसवर हल्लाबोल
4
छत्रपतींचा अपमान करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांना मराठी माणूस धडा शिकवेल; काँग्रेसची घणाघाती टीका
5
PM Modi Property in Affidavit, Lok Sabha Election 2024: वाराणसीतून पंतप्रधान मोदी यांनी भरला उमेदवारी अर्ज... पाहा त्यांची प्रॉपर्टी किती? शिक्षण किती?
6
इस्रायलच्या अडचणी वाढणार? आंतरराष्ट्रीय न्यायालयात होणार सुनावणी
7
पेटीएमवर UPI Lite Wallet कसे अ‍ॅक्टिव्हेट करायचे? जाणून घ्या प्रोसेस...
8
"गेल्या १० वर्षात देशाची प्रगती, आता भारताला कुणीच..."; रश्मिका मंदानानं केलं मुंबईच्या 'अटल सेतू'चं कौतुक!
9
KL Rahul चा अफलातून झेल पाहून संजीव गोएंका खूश झाले; टाळ्या वाजवताना दिसले, Video
10
Kangana Ranaut : 7 किलो सोनं, 60 किलो चांदी, 50 LIC पॉलिसी...; कोट्यवधींची मालकीण आहे कंगना राणौत
11
राहुल द्रविडनंतर BCCI मुख्य प्रशिक्षक म्हणून CSK च्या ताफ्यातील प्रमुख व्यक्तीचा करतेय विचार 
12
घाटकोपर होर्डिंगप्रकरणी दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, अंबादास दानवेंची मागणी
13
34 हजार कोटींचा बँक घोटाळा; DHFL चा माजी संचालक धीरज वाधवानला CBI ने घेतले ताब्यात
14
अजितदादा आणखी ५-६ दिवस थांबले असते तर शरद पवार 'तो' निर्णय घेणार होते; पाटलांचा खुलासा
15
VIP चोराची अजब कहाणी! वर्षभरात 200वेळा विमानप्रवास; फ्लाईटमधून कोट्यवधींचे दागिने लंपास
16
'कल्याणमध्ये ठाकरेसेना-शिंदेंसेनेची नुरा कुस्ती, निवडणुकीनंतर मोदी आणि ठाकरे एकत्र येतील', प्रकाश आंबेडकर यांचा दावा
17
आधी झापलं, मग जेवायला घरी बोलावलं! Sanjiv Goenka यांची लोकेश राहुलला झप्पी
18
"अग्निवीर योजना फाडून कचऱ्यात फेकून देऊ", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल 
19
'चंदा लो, धंदा दो' या महायुतीच्या धोरणामुळेच झाली होर्डिंग दुर्घटना; विजय वडेट्टीवारांचे टीकास्त्र
20
Arvind Kejriwal : "तुम्ही कमळाचं बटण दाबलंत तर मला पुन्हा जेलमध्ये जावं लागेल पण जर..."

दाभोलीत वीज वाहिनीमुळे धोका,ग्रामस्थांचा उद्रेक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 03, 2021 10:20 AM

mahavitaran Sindhudurg- कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देदाभोलीत वीज वाहिनीमुळे धोका,ग्रामस्थांचा उद्रेक जिल्हा पोलीस अधीक्षकांना दिले निवेदन

सिंधुदुर्ग : कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने दमदाटी करून व पोलीस मदतीच्या सहाय्याने महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे जबरदस्तीने नवीन ११ केव्हीची विद्युत लाईन घालण्यात येत आहे. यामुळे स्थानिक ग्रामस्थांचे नुकसान होणार आहे व धोका निर्माण झाला आहे.

यामुळे ग्रामस्थांचा उद्रेक होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार आहे. तरी ही विद्युतलाईन भविष्यातील धोका लक्षात घेऊन भूमिगत पद्धतीने घालून शांततेच्या मार्गाने हा प्रश्न सोडविण्यात सहकार्य करावे, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना देऊन त्यांचे लक्ष वेधले आहे.कुडाळ-दाभोली या वर्दळीच्या रस्त्याच्या बाजूने नवीन ११ केव्हीची विद्युतलाईन महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळातर्फे घालण्यात येत आहे. या विद्युतलाईनच्या लगत रहिवासी घरे, प्राथमिक शाळा, मंदिरे, शेती आणि बागायती असल्याने स्थानिक ग्रामस्थांचा या विद्युत लाईनकरिता विरोध आहे. तरी संबंधित विद्युतलाईन जास्त क्षमतेची व अतिशय धोकादायक असल्याने ती घरांपासून तसेच प्राथमिक शाळा, मंदिरे यापासून लांब असावी.

स्थानिक ग्रामस्थांना असलेला भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार संबंधित लाईन विद्युत खांबावरून न घेता संपूर्णपणे भूमिगत पद्धतीने घेण्यात यावी. याबाबत आपण जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, आमदार नीतेश राणे, जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांचे लक्ष वेधले आहेत.मात्र, असे निदर्शनास आले की, हे काम करताना महाराष्ट्र राज्य विद्युत महामंडळाकडून पोलीस दलाचे सहकार्य घेऊन दमदाटीने ही विद्युत लाईन टाकण्याचे काम केले जात आहे. याला स्थानिक ग्रामस्थांचा तीव्र विरोध आहे.प्रश्न शांततेच्या मार्गाने सोडवावानवीन ११ केव्ही विद्युत लाईन रस्त्यावरून गेल्याने भविष्यात स्थानिक ग्रामस्थांना धोका निर्माण होऊ शकतो. यामुळे स्थानिक ग्रामस्थांना होणारा भविष्यातील धोका विचारात घेता त्यांच्या मागणीनुसार हे काम करण्यात यावे. पोलीस दलाकडून दमदाटीचा वापर न करता सहकार्याच्या भूमिकेने व शांततेच्या मार्गाने ग्रामस्थांची समस्या सोडवावी, अन्यथा उद्रेक झाल्यास व कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास, विद्युत महामंडळ तसेच पोलीस प्रशासन याला जबाबदार राहील. तरी याबाबत आपण लक्ष घालून शांततेच्या मार्गाने प्रश्न सोडवावा, असे निवेदन जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांना दिले आहे व त्यांचे लक्ष वेधले आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरणsindhudurgसिंधुदुर्ग