शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
2
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
3
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
4
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
5
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
6
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
7
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
8
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
9
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
10
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
11
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
12
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
13
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
14
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
15
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
16
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
17
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
18
शतांक विपरीत राजयोग: ९ राशींना वक्री शनिचे वरदान, सुबत्ता भरभराट; भरघोस लाभ, शुभ कल्याण होईल!
19
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
20
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स

coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:27 IST

नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत.

सिंधुदुर्ग/मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तसेच नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुंबईत असलेल्या चाकरमान्यांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील गावी पाठवण्याच्या निर्णयाबाबत मोठे विधान केले आहे. 

सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर चाकरमान्यांना गावी आणू, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी परत आणण्याबाबत आमच्या मनात दुमत नाही. चाकरमानी आपल्या गावी येऊन सुरक्षित राहावेत अशीच आमची इच्छा आहे. पण असे असले तरी राज्य सरकारला केंद्राच्या नियमावलीनुसार काम करावे लागत आहे. त्यामुळे याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय झाल्यावर पालकमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन चाकरमान्यांना गावी आणेन.'

दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी लॉकडाऊनमुळे मुंबई आणि उपनगरात अडकून पडले आहेत. तसेच त्यापैकी अनेकजण छोट्या खोल्यांमध्ये राहत असल्याने त्यांचे हाल होत आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. तसेच येथे सापडलेले कोरोनाबाधित रुग्णही आता बरे होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग