शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
2
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
3
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
4
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
5
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २२ डिसेंबर २०२५: प्रिय व्यक्तीची भेट होईल, अचानक पदोन्नती होण्याचीही शक्यता!
6
संपादकीय: नगरांचा जनादेश सत्तेला, काँग्रेस पक्ष राज्यात जिवंत असल्याचे...
7
U19 Asia Cup: 'हाय व्होल्टेज' राडा! भारतीय युवा संघाने गमावला आशिया चषक; पाक पीसीबी प्रमुखांच्या हस्ते पदक स्वीकारण्यास नकार
8
‘नगरां’च्या निवडणुकीत मारली बाजी; भाजप ‘धुरंधर’ तर ठाकरेंचा धुव्वा उडाला
9
पक्षाने माझी शक्ती कमी केली- मुनगंटीवार; सत्तारूढ अन् विरोधकांमधील नेत्यांनी कुठे राखली प्रतिष्ठा
10
भारताविरुद्ध बांगलादेशात षड्‌यंत्र! कोण कोण रचतेय...
11
महामुंबईत भाजप-शिंदेसेनेचाच ‘आवाज’; प्रत्येकी पाच नगराध्यपदांवर विजय; अजित पवार गटही दमदार
12
रेल्वे प्रवाशांना नवीन वर्षाचा 'झटका'! २६ डिसेंबरपासून भाडेवाढ लागू; लांब पल्ल्याचा प्रवास आणि 'AC' कोच महागणार
13
दिशाभूल करणाऱ्या प्रचारामुळे संघाबद्दल काही लोकांमध्ये गैरसमज; संघाचा कोणीही शत्रू नाही :  सरसंघचालक मोहन भागवत
14
आमदारांचे पगार की जनतेची थट्टा? ओडिशात २००% पगारवाढीने रणकंदन; पाहा महाराष्ट्रासह कोणत्या राज्यात किती मिळतो पगार!
15
‘हा फोटो बघ’ असा मेसेज तुम्हालाही आलाय का? व्हॉट्सॲप ‘हायजॅक’चे नवे संकट!
16
२४ डिसेंबरला ब्लूबर्ड ब्लॉक-२ चे हाेणार उड्डाण ; अमेरिकेतील एएसटी स्पेस मोबाइलसोबत इस्रोचा करार
17
काश्मीरमध्ये ‘चिल्ला-ए-कलां’ प्रारंभ; प्रचंड थंडीच्या मोसमाची सुरुवात
18
डे-वन टेक-ऑफ घेण्यासाठी नवी मुंबई विमानतळ सज्ज; २५ डिसेंबरपासून व्यावसायिक उड्डाणांना हाेणार सुरुवात
19
आज मुंबई आयआयटीत  रंगणार ‘टेकफेस्ट’चा जागर; तंत्रज्ञानाचा महाकुंभ अनुभवण्याची तरुणाईला संधी
20
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:27 IST

नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत.

सिंधुदुर्ग/मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तसेच नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुंबईत असलेल्या चाकरमान्यांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील गावी पाठवण्याच्या निर्णयाबाबत मोठे विधान केले आहे. 

सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर चाकरमान्यांना गावी आणू, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी परत आणण्याबाबत आमच्या मनात दुमत नाही. चाकरमानी आपल्या गावी येऊन सुरक्षित राहावेत अशीच आमची इच्छा आहे. पण असे असले तरी राज्य सरकारला केंद्राच्या नियमावलीनुसार काम करावे लागत आहे. त्यामुळे याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय झाल्यावर पालकमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन चाकरमान्यांना गावी आणेन.'

दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी लॉकडाऊनमुळे मुंबई आणि उपनगरात अडकून पडले आहेत. तसेच त्यापैकी अनेकजण छोट्या खोल्यांमध्ये राहत असल्याने त्यांचे हाल होत आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. तसेच येथे सापडलेले कोरोनाबाधित रुग्णही आता बरे होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग