शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

coronavirus : कोकणातील चाकरमान्यांना गावी पाठवण्याबाबत मंत्री उदय सामंत यांचे मोठे विधान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 15:27 IST

नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत.

सिंधुदुर्ग/मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता फैलाव रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. मात्र या लॉकडाऊनमुळे अनेक जण विविध ठिकाणी अडकून पडले आहेत. तसेच नोकरीधंद्यानिमित्त मुंबईत स्थायिक झालेल्या चाकरमान्यांचेही लॉकडाऊनमुळे हाल होत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आपल्याला गावी जाण्याची परवानगी देण्यात यावी, अशी मागणी मुंबईत असलेल्या चाकरमान्यांकडून वारंवार केली जात आहे. दरम्यान, राज्य सरकारमधील मंत्री आणि सिंधुदुर्गाचे पालकमंत्री उदय सामंत यांनी मुंबईतील चाकरमान्यांना कोकणातील गावी पाठवण्याच्या निर्णयाबाबत मोठे विधान केले आहे. 

सरकारने सकारात्मक निर्णय घेतल्यानंतर चाकरमान्यांना गावी आणू, असे आश्वासन उदय सामंत यांनी दिले आहे. याबाबत प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सामंत म्हणाले की, 'लॉकडाऊनमुळे मुंबईत अडकून पडलेल्या कोकणातील चाकरमान्यांना गावी परत आणण्याबाबत आमच्या मनात दुमत नाही. चाकरमानी आपल्या गावी येऊन सुरक्षित राहावेत अशीच आमची इच्छा आहे. पण असे असले तरी राज्य सरकारला केंद्राच्या नियमावलीनुसार काम करावे लागत आहे. त्यामुळे याबाबत केंद्र आणि राज्य सरकारचा सकारात्मक निर्णय झाल्यावर पालकमंत्री म्हणून मी स्वतः पुढाकार घेऊन चाकरमान्यांना गावी आणेन.'

दरम्यान, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लाखो चाकरमानी लॉकडाऊनमुळे मुंबई आणि उपनगरात अडकून पडले आहेत. तसेच त्यापैकी अनेकजण छोट्या खोल्यांमध्ये राहत असल्याने त्यांचे हाल होत आहे. तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचा फैलाव झालेला नाही. तसेच येथे सापडलेले कोरोनाबाधित रुग्णही आता बरे होत आहेत.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMumbaiमुंबईsindhudurgसिंधुदुर्ग