शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
"मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
3
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
4
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
5
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
6
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
7
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
8
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
9
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
10
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
11
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
12
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
13
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
14
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
15
घर खरेदीदारांच्या नुकसान भरपाईसाठी अधिकाऱ्यांची होणार नियुक्ती; राज्यभरात १२ जिल्हा नियंत्रक अधिकारी, महसूल वसुली अधिकारी
16
Pahalgam Terror Attack : Video- मोठी कारवाई! पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांची घरं केली उद्ध्वस्त
17
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
18
गुजरात पोलिसांची मोठी कारवाई! अहमदाबाद, सुरतमध्ये १ हजार बांगलादेशी ताब्यात
19
पर्यटकांवरील गोळीबाराच्या व्हिडीओंमुळे बेचैनी, अस्वस्थता वाढली, देशभरात नागरिकांमध्ये चिंता
20
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:09 IST

गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली.

ठळक मुद्देक्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराासिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतील काही मुद्दे बरोबर आहेत. सरपंच संघटना त्याचे समर्थन करते. गणेशोत्सवाला येणाºया चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच गणेश आगमन ते विसर्जन कालावधीपर्यंत किमान १५ ते २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये. त्यातील सूचनांचा उपयोग याठिकाणी करण्यात यावा, अशी मागणी  येथे झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा सण येत आहे. त्यासाठी गावात येणाऱ्याकरमान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीला अनेक गावचे सरपंच उपस्थित होते. यात संजना सावंत, रुचिता सावंत, रेश्मा गावकर, वर्षा वरक, केशव जाधव, सुभाष सावंत, निधी नाईक, जयेश सावंत, सुप्रिया मडगावकर, डॉ. मनस्वी राऊळ, अपर्णा तळवणेकर, प्रतिभा गावडे, शीतल जोशी, स्नेहा मिठबांवकर, स्मिता मोरजकर, रेखा घावरे, उत्कर्षा गावकर, अक्षरा पाडलोसकर, अभिलाष देसाई, भरत मयेकर, केशव जाधव, शरद नाईक, अंकुश कदम, देवेंद्र सावंत, विजय वालावलकर, भिकाजी केणी, साक्षी तोरसकर, अक्षता आरोंदेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी नाणोस सरपंच वासुदेव जोशी, माडखोल सरपंच संजय शिरसाट, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर दिनेश सावंत, वासुदेव मेस्त्री, गुंजन हिराप, शिवदत्त घोगळे, सुरेश राऊळ, रोशनी पारधी, पूजा पेडणेकर, दिनानाथ कसालकर आदींसह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौदा दिवस क्वारंटाईनबाबत केंद्र शासनाकडून आदेश आले आहेत. मात्र, त्यात नेमका बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे.त्या बदलाचा निर्णय सर्वच गावांना स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.

गोव्यातून चोरट्या पद्धतीने बोटीतून येणाºयांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले. गोवा आणि परजिल्ह्यातून येणाºया वाहनचालकांना बाहेर क्वारंटाईनची सोय केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पूजा, भजन आदी गोष्टींवर बंदीचा निर्णय

यावेळी सरपंच संघटनेच्यावतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. यात गणेश चतुर्थी काळात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास, त्या घरापुरता कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात यावा. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य, माहेरवाशीण, जावई यांना प्रवेश तर अन्य बाहेरून येणाºया पाहुण्यांना बंदी घालण्यात यावी, अशी कडक भूमिका यावेळी घेण्यात आली. पूजा, भजन आदी गोष्टींवरसुद्धा बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवारवरून पुरोहित (भटजी) येणार असतील तर अगोदर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे आणि ती जबाबदारी संबंधित गावातील समितीने घ्यावी, अशी सरपंचांनी भूमिका मांडली.शासन निर्णय सर्वांना बंधनकारक : म्हात्रे

शासन पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांनी पाळावा. तालुक्यातील पुरोहित, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मी आणि गटविकास अधिकारी वेगवेगळ्या बैठकीत गणेश चतुर्थी सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करणार आहोत, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग