शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:09 IST

गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली.

ठळक मुद्देक्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराासिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतील काही मुद्दे बरोबर आहेत. सरपंच संघटना त्याचे समर्थन करते. गणेशोत्सवाला येणाºया चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच गणेश आगमन ते विसर्जन कालावधीपर्यंत किमान १५ ते २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये. त्यातील सूचनांचा उपयोग याठिकाणी करण्यात यावा, अशी मागणी  येथे झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा सण येत आहे. त्यासाठी गावात येणाऱ्याकरमान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीला अनेक गावचे सरपंच उपस्थित होते. यात संजना सावंत, रुचिता सावंत, रेश्मा गावकर, वर्षा वरक, केशव जाधव, सुभाष सावंत, निधी नाईक, जयेश सावंत, सुप्रिया मडगावकर, डॉ. मनस्वी राऊळ, अपर्णा तळवणेकर, प्रतिभा गावडे, शीतल जोशी, स्नेहा मिठबांवकर, स्मिता मोरजकर, रेखा घावरे, उत्कर्षा गावकर, अक्षरा पाडलोसकर, अभिलाष देसाई, भरत मयेकर, केशव जाधव, शरद नाईक, अंकुश कदम, देवेंद्र सावंत, विजय वालावलकर, भिकाजी केणी, साक्षी तोरसकर, अक्षता आरोंदेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी नाणोस सरपंच वासुदेव जोशी, माडखोल सरपंच संजय शिरसाट, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर दिनेश सावंत, वासुदेव मेस्त्री, गुंजन हिराप, शिवदत्त घोगळे, सुरेश राऊळ, रोशनी पारधी, पूजा पेडणेकर, दिनानाथ कसालकर आदींसह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौदा दिवस क्वारंटाईनबाबत केंद्र शासनाकडून आदेश आले आहेत. मात्र, त्यात नेमका बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे.त्या बदलाचा निर्णय सर्वच गावांना स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.

गोव्यातून चोरट्या पद्धतीने बोटीतून येणाºयांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले. गोवा आणि परजिल्ह्यातून येणाºया वाहनचालकांना बाहेर क्वारंटाईनची सोय केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पूजा, भजन आदी गोष्टींवर बंदीचा निर्णय

यावेळी सरपंच संघटनेच्यावतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. यात गणेश चतुर्थी काळात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास, त्या घरापुरता कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात यावा. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य, माहेरवाशीण, जावई यांना प्रवेश तर अन्य बाहेरून येणाºया पाहुण्यांना बंदी घालण्यात यावी, अशी कडक भूमिका यावेळी घेण्यात आली. पूजा, भजन आदी गोष्टींवरसुद्धा बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवारवरून पुरोहित (भटजी) येणार असतील तर अगोदर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे आणि ती जबाबदारी संबंधित गावातील समितीने घ्यावी, अशी सरपंचांनी भूमिका मांडली.शासन निर्णय सर्वांना बंधनकारक : म्हात्रे

शासन पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांनी पाळावा. तालुक्यातील पुरोहित, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मी आणि गटविकास अधिकारी वेगवेगळ्या बैठकीत गणेश चतुर्थी सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करणार आहोत, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग