शहरं
Join us  
Trending Stories
1
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
2
...तर पाकिस्तान जागतिक नकाशावर दिसणार नाही! भारतीय लष्करप्रमुखांनी खडसावले 
3
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
4
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
5
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
6
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
7
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
8
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
9
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
10
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
11
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
12
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
13
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
14
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
15
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
16
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
17
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
18
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
19
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
20
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा

Coronavirus : क्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 19:09 IST

गणेशोत्सव काळात येणाऱ्या चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली.

ठळक मुद्देक्वारंटाईन कालावधी १४ दिवसांचा कराासिंधुदुर्ग जिल्ह्यातील सरपंच संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

सावंतवाडी : जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेल्या बैठकीतील काही मुद्दे बरोबर आहेत. सरपंच संघटना त्याचे समर्थन करते. गणेशोत्सवाला येणाºया चाकरमान्यांचा क्वारंटाईन कालावधी चौदा दिवसांचा असला पाहिजे, अशी भूमिका सावंतवाडी तालुक्यातील सरपंचांच्या बैठकीत घेण्यात आली. तसेच गणेश आगमन ते विसर्जन कालावधीपर्यंत किमान १५ ते २० जणांना उपस्थित राहण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी सरपंच संघटनेच्यावतीने करण्यात आली.

जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीचे इतिवृत्त सरसकट रद्द करू नये. त्यातील सूचनांचा उपयोग याठिकाणी करण्यात यावा, अशी मागणी  येथे झालेल्या सरपंच संघटनेच्या बैठकीत करण्यात आली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवरच गणेश चतुर्थीचा महत्त्वाचा सण येत आहे. त्यासाठी गावात येणाऱ्याकरमान्यांबाबत निर्णय घेण्यासाठी येथील तहसीलदार कार्यालयात तहसीलदार राजाराम म्हात्रे व गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली.

या बैठकीला अनेक गावचे सरपंच उपस्थित होते. यात संजना सावंत, रुचिता सावंत, रेश्मा गावकर, वर्षा वरक, केशव जाधव, सुभाष सावंत, निधी नाईक, जयेश सावंत, सुप्रिया मडगावकर, डॉ. मनस्वी राऊळ, अपर्णा तळवणेकर, प्रतिभा गावडे, शीतल जोशी, स्नेहा मिठबांवकर, स्मिता मोरजकर, रेखा घावरे, उत्कर्षा गावकर, अक्षरा पाडलोसकर, अभिलाष देसाई, भरत मयेकर, केशव जाधव, शरद नाईक, अंकुश कदम, देवेंद्र सावंत, विजय वालावलकर, भिकाजी केणी, साक्षी तोरसकर, अक्षता आरोंदेकर आदी उपस्थित होते.

सावंतवाडी तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष निरवडे सरपंच प्रमोद गावडे यांनी अनेक मुद्दे उपस्थित करून सकारात्मक चर्चा घडवून आणली. यावेळी नाणोस सरपंच वासुदेव जोशी, माडखोल सरपंच संजय शिरसाट, तांबोळी सरपंच अभिलाष देसाई, तळवडे सरपंच संदीप आंगचेकर दिनेश सावंत, वासुदेव मेस्त्री, गुंजन हिराप, शिवदत्त घोगळे, सुरेश राऊळ, रोशनी पारधी, पूजा पेडणेकर, दिनानाथ कसालकर आदींसह तालुक्यातील सरपंच मोठ्या संख्येने उपस्थित होते.

चौदा दिवस क्वारंटाईनबाबत केंद्र शासनाकडून आदेश आले आहेत. मात्र, त्यात नेमका बदल करण्याबाबत चर्चा सुरू आहे.त्या बदलाचा निर्णय सर्वच गावांना स्वीकारणे बंधनकारक राहणार आहे.

गोव्यातून चोरट्या पद्धतीने बोटीतून येणाºयांना रोखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे म्हणाले. गोवा आणि परजिल्ह्यातून येणाºया वाहनचालकांना बाहेर क्वारंटाईनची सोय केली जावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पूजा, भजन आदी गोष्टींवर बंदीचा निर्णय

यावेळी सरपंच संघटनेच्यावतीने वेगवेगळे मुद्दे मांडण्यात आले. यात गणेश चतुर्थी काळात एखादा रुग्ण पॉझिटिव्ह आढळून आल्यास, त्या घरापुरता कंटेन्मेंट झोन जाहीर करण्यात यावा. त्याचबरोबर कुटुंबातील सदस्य, माहेरवाशीण, जावई यांना प्रवेश तर अन्य बाहेरून येणाºया पाहुण्यांना बंदी घालण्यात यावी, अशी कडक भूमिका यावेळी घेण्यात आली. पूजा, भजन आदी गोष्टींवरसुद्धा बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला.

कारवारवरून पुरोहित (भटजी) येणार असतील तर अगोदर १४ दिवस क्वारंटाईन करण्यात यावे आणि ती जबाबदारी संबंधित गावातील समितीने घ्यावी, अशी सरपंचांनी भूमिका मांडली.शासन निर्णय सर्वांना बंधनकारक : म्हात्रे

शासन पातळीवर जो निर्णय घेतला जाईल तो सर्वांनी पाळावा. तालुक्यातील पुरोहित, मुख्याध्यापक, पोलीस पाटील, तलाठी, ग्रामसेवक यांच्या मी आणि गटविकास अधिकारी वेगवेगळ्या बैठकीत गणेश चतुर्थी सण आनंदाने साजरा करण्यासाठी नियोजन करणार आहोत, असे तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी सांगितले. 

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याcollectorजिल्हाधिकारीsindhudurgसिंधुदुर्ग