शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

CoronaVirus Lockdown : नियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:55 IST

सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नका

सावंतवाडी : सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी उपस्थित होते. शहरातील दुकानदारांना नगरपालिकेने वेळ ठरवून दिली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी ही वेळ आहे. एक दिवसाआड एक दुकान सुरू ठेवावे अशीही अट घालण्यात आली आहे.

परब म्हणाले, शहरात ज्या लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे त्यांना घरचा डबा देण्याऐवजी कंटेनरमधून जेवण देण्यात यावे. कारण अशा लोकांना घराकडून दिलेला डबा पुन्हा धुऊन परत घरी पाठविला जातो असे निदर्शनास आले आहे.

विलगीकरण कक्षातील व्यक्ती जर कोरोनाबाधित आढळली तर या डब्याच्या माध्यमातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी हा धोका टाळण्यासाठी अशा लोकांना कंटेनरमधून जेवण देण्यात यावे असेही त्यांनी स्पष्ट केले.गरोदर महिला, स्तनदा माता, वृद्ध व्यक्ती, अपंग यांना गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. शासनाने अशा लोकांना शिथिलता दिली असली तरीही नियमांचे पालन होणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून जर नियम तोडला जात आहे असे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींसाठी पालिकेकडून चटई देण्यात आल्या आहेत. याचबरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून अशा ठिकाणी होमगार्डची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच तशी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी शहरात पुणे, मुंबई येथून काही जण येत आहेत. तसेच बाहेरच्या जिल्ह्यात जाणारे काही नागरिकही बाजारपेठेत फिरताना दिसून आले आहेत. अशाप्रकारे त्यांच्या फिरण्यामुळे शहरात धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्यात येणार असून अशा लोकांना शहराच्या हद्दीवर अडवून त्यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या गावात परत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी शहराच्या हिताच्या दृष्टीने दुकानदारांना नियम आखून दिले असतानाही दुकानदारांकडून ते पाळले जात नाहीत. नियमांची सरळसरळ पायमल्ली होत असल्याने आता कडक कारवाई म्हणून अशी दुकाने सील करण्यात येणार आहेत.

त्या अगोदर संबंधित दुकानदारांना नोटीस बजावून कल्पना देण्यात येणार आहे. मात्र तरीही यात सुधारणा न झाल्यास कारवाई हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे परब यांनी सांगितले.चाकरमान्यांची व्यवस्था करणारसावंतवाडी शहरात जे पेड क्वारंटाईनसाठी येणार आहेत अशा चाकारमान्यांना परवडतील असेच दर ठेवण्यात आले आहेत. आम्ही काही हॉटेल निवडली असून, त्या हॉटेलची नावे येणाऱ्या चाकरमान्यांसमोर ठेवण्यात येतील.

त्यांनी त्यातील हॉटेल निवडावे, असे आवाहन नगराध्यक्ष संंजू परब यांनी केले आहे. शहरात येणारे चाकरमानी हे शहरातीलच असतील. ग्रामीण भागातील चाकरमान्यांची व्यवस्था तहसीलदार कार्यालय करेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग