शहरं
Join us  
Trending Stories
1
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
2
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
3
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
4
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
5
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
6
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
7
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?
8
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
9
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
10
बाजारात जोरदार 'कमबॅक'! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी वाढ, हिरो मोटर्ससह 'या' शेअर्सचा बंपर परतावा
11
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
12
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
13
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
14
Viral Video: पाठीमागून आला अन् मिठी मारली, छातीलाही केला स्पर्श; भररस्त्यात महिलेसोबत घाणेरडं कृत्य!
15
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
16
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
17
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
18
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
19
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
20
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा

CoronaVirus Lockdown : नियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:55 IST

सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.

ठळक मुद्देनियम न पाळल्यास दुकाने सील, सावंतवाडी नगराध्यक्षांचा इशारा नागरिकांचे आरोग्य धोक्यात आणू नका

सावंतवाडी : सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळण्यात यावेत असे निर्बंध घातले असताना काही दुकानांमध्ये या नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. शहराच्या दृष्टीने हा धोका आहे. यापुढे पालिका गप्प बसणार नाही. अशा दुकानांवर कडक कारवाई करून ती सील करावी लागतील, असा इशारा सावंतवाडी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला आहे.ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी नगरसेवक सुधीर आडिवरेकर, आनंद नेवगी उपस्थित होते. शहरातील दुकानदारांना नगरपालिकेने वेळ ठरवून दिली आहे. सकाळी ७ ते सायंकाळी ७ अशी ही वेळ आहे. एक दिवसाआड एक दुकान सुरू ठेवावे अशीही अट घालण्यात आली आहे.

परब म्हणाले, शहरात ज्या लोकांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले आहे त्यांना घरचा डबा देण्याऐवजी कंटेनरमधून जेवण देण्यात यावे. कारण अशा लोकांना घराकडून दिलेला डबा पुन्हा धुऊन परत घरी पाठविला जातो असे निदर्शनास आले आहे.

विलगीकरण कक्षातील व्यक्ती जर कोरोनाबाधित आढळली तर या डब्याच्या माध्यमातून प्रादुर्भाव होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासाठी हा धोका टाळण्यासाठी अशा लोकांना कंटेनरमधून जेवण देण्यात यावे असेही त्यांनी स्पष्ट केले.गरोदर महिला, स्तनदा माता, वृद्ध व्यक्ती, अपंग यांना गृह विलगीकरण कक्षात ठेवण्यासाठी त्यांच्या नातेवाईकांकडून प्रतिज्ञापत्र घेण्यात येईल. शासनाने अशा लोकांना शिथिलता दिली असली तरीही नियमांचे पालन होणे सर्वांच्याच आरोग्याच्या दृष्टीने हितकारक आहे. त्यामुळे अशा व्यक्तींकडून व त्यांच्या कुटुंबीयांकडून जर नियम तोडला जात आहे असे निदर्शनास आल्यास त्यांच्यावरही कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

विलगीकरण कक्षाच्या ठिकाणी असलेल्या व्यक्तींसाठी पालिकेकडून चटई देण्यात आल्या आहेत. याचबरोबर सुरक्षेचा उपाय म्हणून अशा ठिकाणी होमगार्डची व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकरच तशी व्यवस्था केली जाईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी शहरात पुणे, मुंबई येथून काही जण येत आहेत. तसेच बाहेरच्या जिल्ह्यात जाणारे काही नागरिकही बाजारपेठेत फिरताना दिसून आले आहेत. अशाप्रकारे त्यांच्या फिरण्यामुळे शहरात धोका निर्माण झाला आहे.त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नगरपालिकेच्या माध्यमातून उपाययोजना राबविण्यात येणार असून अशा लोकांना शहराच्या हद्दीवर अडवून त्यांची तपासणी करून त्यांना त्यांच्या गावात परत पाठविण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.सावंतवाडी शहराच्या हिताच्या दृष्टीने दुकानदारांना नियम आखून दिले असतानाही दुकानदारांकडून ते पाळले जात नाहीत. नियमांची सरळसरळ पायमल्ली होत असल्याने आता कडक कारवाई म्हणून अशी दुकाने सील करण्यात येणार आहेत.

त्या अगोदर संबंधित दुकानदारांना नोटीस बजावून कल्पना देण्यात येणार आहे. मात्र तरीही यात सुधारणा न झाल्यास कारवाई हाती घेण्यात येणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवेतील दुकानदारांनीही सोशल डिस्टन्सिंग व नियमांचे पालन न केल्यास त्यांच्यावरही कारवाई होणार असल्याचे परब यांनी सांगितले.चाकरमान्यांची व्यवस्था करणारसावंतवाडी शहरात जे पेड क्वारंटाईनसाठी येणार आहेत अशा चाकारमान्यांना परवडतील असेच दर ठेवण्यात आले आहेत. आम्ही काही हॉटेल निवडली असून, त्या हॉटेलची नावे येणाऱ्या चाकरमान्यांसमोर ठेवण्यात येतील.

त्यांनी त्यातील हॉटेल निवडावे, असे आवाहन नगराध्यक्ष संंजू परब यांनी केले आहे. शहरात येणारे चाकरमानी हे शहरातीलच असतील. ग्रामीण भागातील चाकरमान्यांची व्यवस्था तहसीलदार कार्यालय करेल, असेही ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्ग