शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown : पंधरा दिवसांत पन्नास हजार चाकरमानी कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:32 IST

गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच पत्र सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचे कोणी राजकारण करू नये : उदय सामंत प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज पसरवू नका

सावंतवाडी : गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच पत्र सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. त्यांनी रत्नागिरी येथून झुम अ‍ॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमानी गेल्या काही दिवसांत येत आहेत. ई-पास दिले गेले आहेत. तरीही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून दिला जात आहे तो चुकीचा आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई-पास घेऊन लोक येत आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याला आम्ही विरोध केलेला नाही. त्यामुळे गैरसमज पसरविणाऱ्यांपासून सावध असावे, असे सामंत म्हणाले.या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय, हॉटेल व अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे, असे उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅबवरून राजकारण सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी यंत्रणा आली आहे. पण वापर करून घेतला नाही, अशी टीका सुरू आहे. ते योग्य नाही. कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणा आली नाही, असे ते म्हणाले.माकडताप तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माकड तापाचे रुग्ण तपासणीसाठी आणलेली मशीन आहे. केंद्र स्थापन झाल्यानंतर ती मशीन वापरात येईल.सरसकट ई-पास दिला जात आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूरच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पास देणाऱ्या यंत्रणेला पत्र दिले आहे.

पास टप्प्याटप्प्याने दिले जावेत, असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईनचे पालन करून सर्वांना क्वारंटाईन करता येईल, अशी भूमिका जिल्हाधिकारी यांची आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राचे भांडवल करून विरोधक गैरसमज पसरवित आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यावर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खासदार नारायण राणे आणि गोवा मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो आहे. त्यामुळे गैरसमज पसरविण्याचे कोणी सोयीस्कर राजकारण करू नये, असे सामंत म्हणाले.देवगडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिनरी आली नाही. तर सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून डायलेसिस सेंटरसाठी यंत्रसामग्री आलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीने होमिओपॅथिक गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जनतेपर्यंत गोळ्या पोहचविण्यासाठी निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.रत्नागिरी जिल्ह्यात चार लाख ३० हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख आयुष्य मंत्रालयातील गोळ्या पुढील तीन महिन्यांसाठी कोविड- १९ फंडातून प्रत्येकाच्या घरात पोहोचतील यासाठी प्रयत्न राहील.माझ्यावर होणाऱ्या टीकेपेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि दक्षता घेण्यावर मी आणि प्रशासन देखील प्रयत्न करीत आहे, असे सामंत म्हणाले. त्यामुळे गैरवाजवी टीकेवर विचलित होण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.नारायण राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वॅब तपासणी निर्णयात मी खोडा घातलेला नाही. उलट त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली. त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य त्या पूर्तता करून स्वॅब तपासणी लॅब सुरू करावी, असे उदय सामंत म्हणाले.जनतेसाठी सर्वांनी लढ्यात सहभागी झाले पाहिजेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर, नर्स पोलीस, महसूल यंत्रणाही योग्य पद्धतीने काम करीत आहे. उलट या यंत्रणेला सर्व श्रेय द्यावे लागेल. ते मी देतो, असे सामंत यांनी सांगून मी श्रेय घेत असल्याची होणारी टीका तथ्यहीन आहे, असेही सामंत यांनी सांगितले. सर्वांनी श्रेयासाठी नव्हे तर जनतेसाठी कोरोनाच्या विरोधातील लढ्यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत