शहरं
Join us  
Trending Stories
1
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
2
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
3
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
4
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
5
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
6
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
7
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
8
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
9
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
10
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
11
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
12
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
13
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
14
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
15
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
16
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
17
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
18
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
19
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
20
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण

CoronaVirus Lockdown : पंधरा दिवसांत पन्नास हजार चाकरमानी कोकणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 13:32 IST

गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच पत्र सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले.

ठळक मुद्देजिल्हाधिकाऱ्यांच्या पत्राचे कोणी राजकारण करू नये : उदय सामंत प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज पसरवू नका

सावंतवाडी : गेल्या पंधरा दिवसांत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यात सुमारे ५० हजार चाकरमानी आले आहेत. त्यामुळे प्रशासन, लोकप्रतिनिधींच्या विरोधात गैरसमज आणि संभ्रम निर्माण करू नये. इतर जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांनी जसे मुख्यसचिव व महासंचालक यांना पत्र दिले. तसेच पत्र सिंधुदुर्ग व रत्नागिरीच्या जिल्हाधिकारी यांनी दिले. त्याचे राजकारण कोणी करू नये, असे आवाहन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी केले. त्यांनी रत्नागिरी येथून झुम अ‍ॅपद्वारे पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री सामंत म्हणाले, सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात चाकरमानी गेल्या काही दिवसांत येत आहेत. ई-पास दिले गेले आहेत. तरीही लोकांमध्ये संभ्रम निर्माण करून दिला जात आहे तो चुकीचा आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ई-पास घेऊन लोक येत आहेत. त्यामुळे त्यांच्या येण्याला आम्ही विरोध केलेला नाही. त्यामुळे गैरसमज पसरविणाऱ्यांपासून सावध असावे, असे सामंत म्हणाले.या पार्श्वभूमीवर शाळा, महाविद्यालय, हॉटेल व अन्य ठिकाणी संस्थात्मक क्वारंटाईन केले जात आहे, असे उदय सामंत म्हणाले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात लॅबवरून राजकारण सुरू झाले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर तपासणी यंत्रणा आली आहे. पण वापर करून घेतला नाही, अशी टीका सुरू आहे. ते योग्य नाही. कोरोना पार्श्वभूमीवर यंत्रणा आली नाही, असे ते म्हणाले.माकडताप तपासणी प्रयोगशाळा उभारण्यात येणार आहे. त्यासाठी माकड तापाचे रुग्ण तपासणीसाठी आणलेली मशीन आहे. केंद्र स्थापन झाल्यानंतर ती मशीन वापरात येईल.सरसकट ई-पास दिला जात आहे. त्यामुळे प्रशासनावर ताण येत आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे सिंधुदुर्ग, रत्नागिरी व कोल्हापूरच्या सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी पास देणाऱ्या यंत्रणेला पत्र दिले आहे.

पास टप्प्याटप्प्याने दिले जावेत, असे म्हटले आहे. केंद्र सरकारच्या गाईडलाईनचे पालन करून सर्वांना क्वारंटाईन करता येईल, अशी भूमिका जिल्हाधिकारी यांची आहे. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या या पत्राचे भांडवल करून विरोधक गैरसमज पसरवित आहेत, असेही उदय सामंत यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व विरोधी पक्षांच्या जिल्हाध्यक्षांच्या उपस्थितीत ही बैठक झाली. या बैठकीत चर्चा झाल्यावर तत्कालीन केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू, खासदार नारायण राणे आणि गोवा मुख्यमंत्री यांच्याशी मी बोललो आहे. त्यामुळे गैरसमज पसरविण्याचे कोणी सोयीस्कर राजकारण करू नये, असे सामंत म्हणाले.देवगडमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मशिनरी आली नाही. तर सिद्धिविनायक ट्रस्टच्या माध्यमातून डायलेसिस सेंटरसाठी यंत्रसामग्री आलेली आहे, हे लक्षात घ्यायला हवे.रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉ. तात्यासाहेब लहाने यांच्या अध्यक्षतेखाली समितीने होमिओपॅथिक गोळ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व जनतेपर्यंत गोळ्या पोहचविण्यासाठी निर्णय घेतला आहे, असे ते म्हणाले.रत्नागिरी जिल्ह्यात चार लाख ३० हजार तर सिंधुदुर्ग जिल्ह्यात ३ लाख आयुष्य मंत्रालयातील गोळ्या पुढील तीन महिन्यांसाठी कोविड- १९ फंडातून प्रत्येकाच्या घरात पोहोचतील यासाठी प्रयत्न राहील.माझ्यावर होणाऱ्या टीकेपेक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी आणि दक्षता घेण्यावर मी आणि प्रशासन देखील प्रयत्न करीत आहे, असे सामंत म्हणाले. त्यामुळे गैरवाजवी टीकेवर विचलित होण्याचे कारण नाही, असे ते म्हणाले.नारायण राणे यांच्या हॉस्पिटलमध्ये स्वॅब तपासणी निर्णयात मी खोडा घातलेला नाही. उलट त्यांच्याशी फोनवर संपर्क साधून चर्चा केली. त्यांनी शासनाच्या नियमाप्रमाणे योग्य त्या पूर्तता करून स्वॅब तपासणी लॅब सुरू करावी, असे उदय सामंत म्हणाले.जनतेसाठी सर्वांनी लढ्यात सहभागी झाले पाहिजेकोरोनाच्या पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग जिल्ह्यात डॉक्टर, नर्स पोलीस, महसूल यंत्रणाही योग्य पद्धतीने काम करीत आहे. उलट या यंत्रणेला सर्व श्रेय द्यावे लागेल. ते मी देतो, असे सामंत यांनी सांगून मी श्रेय घेत असल्याची होणारी टीका तथ्यहीन आहे, असेही सामंत यांनी सांगितले. सर्वांनी श्रेयासाठी नव्हे तर जनतेसाठी कोरोनाच्या विरोधातील लढ्यात सहभागी झाले पाहिजे, असे ते म्हणाले. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याsindhudurgसिंधुदुर्गUday Samantउदय सामंत