शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

अतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी : उदय सामंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2020 15:04 IST

farmar, udaysamant, sindhdurgnews अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.

ठळक मुद्देअतिवृष्टीची नुकसान भरपाई दिवाळीपूर्वी वाटप सुरू होणार साडेपाच कोटींचा निधी प्राप्त : उदय सामंत

सिंधुदुर्ग : अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात २३ हजार हेक्टर शेतीचे नुकसान झाले आहे. या नुकसान भरपाईसाठीचे पहिल्या टप्प्यातील साडेपाच कोटी रुपये जिल्ह्याला प्राप्त झाले असल्याचे पालकमंत्री उदय सामंत म्हणाले. मालवण तालुक्यातील तळगाव तलाठी सजाचे उद्घाटन पालकमंत्री सामंत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक, प्रांताधिकारी वंदना खरमाळे, तहसीलदार मोल पाठक, निवासी तहसीलदार आनंद मालणकर, सरपंच अनघा वेंगुर्लेकर, उपसरपंच अनंत चव्हाण, जिल्हा परिषद सदस्य नागेंद्र परब, संग्राम प्रभुगावकर, संजय पडते, मुंबईचे माजी महापौर दत्ताजी दळवी आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.सर्वांशी संवाद साधता यावा व नागरिकांचे प्रश्न तातडीने मार्गी लावता यावेत यासाठी जनता दरबार सुरू करण्यात आला आहे. हे जनता दरबार तालुकास्तरावरही घेण्यात येणार आहेत. तळगाव ग्रामपंचायत इमारतीचे काम तातडीने पूर्ण करण्यात येईल, असे ते म्हणाले. तळगावच्या सरपंच अनघा वेंगुर्लेकर यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. यावेळी खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांचीही भाषणे झाली.खासदार, आमदारांचे कौतुकआदर्श खासदार कसे असावेत हे पाहण्यासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात यावे. या जिल्ह्याला बॅरिस्टर नाथ पै, मधु दंडवते यांचा वारसा लाभला आहे. याचे जतन खासदार राऊत करीत आहेत. आमदार नाईक यांचे कामही आदर्श आहे. कुडाळ-मालवण मतदारसंघात सर्वात जास्त तलाठी सजा आहेत. सर्वात जास्त निधी आणण्याचे कामही नाईक यानी केले आहे.स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करणारझाराप येथे वैद्यकीय महाविद्यालयासाठी शिक्षण विभागाची जागा देण्यास ४८ तासांत मान्यता दिली आहे. सामंत म्हणाले की, शेतकरी कुटुंबातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेमध्ये यश संपादन करता यावे यासाठी जिल्ह्यात जानेवारी महिन्यात स्पर्धा परीक्षा केंद्र सुरू करण्यात येणार आहे. 

टॅग्स :FarmerशेतकरीUday Samantउदय सामंतsindhudurgसिंधुदुर्ग