शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
2
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
3
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
4
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
5
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
6
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
7
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
8
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
9
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
10
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
11
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
12
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
13
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
14
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका
15
लहान सीमारेषा क्रिकेटला साजेशी नाही; अश्विन : आयपीएलमध्ये सातत्याने उभारला जातोय धावडोंगर
16
छोट्या क्रिकेट मैदानांकडे दुर्लक्ष करू नका; सरफराझ खानने नवोदित क्रिकेटपटूंना दिला सल्ला
17
दीर्घ फलंदाजीचा अभाव; हार्दिक, जडेजाच्या खराब फॉर्मची चिंता
18
इंग्लंडचा संघ निवडण्यासाठी ‘एआय’चा वापर
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

कोकणच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी घातला खो, प्रमोद जठार यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 3:11 PM

ज्या कोकणाने शिवसेनेला सर्वाधिक आमदार दिले. त्याच कोकणातील विकास प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देऊन खो घातला आहे. शेखचिल्लीप्रमाणे ठाकरेंचे कामकाज दिसतेय. शिवसेनेच्या झाडाला ज्या कोकणने वाढवले. त्याच झाडाच्या फांद्या तोडायला ठाकरे निघाले असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली.

ठळक मुद्दे कोकणच्या विकासाला मुख्यमंत्र्यांनी घातला खो, प्रमोद जठार यांची टीका प्रकल्प सुरू न झाल्यास आंदोलन

कणकवली : ज्या कोकणाने शिवसेनेला सर्वाधिक आमदार दिले. त्याच कोकणातील विकास प्रकल्पांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती देऊन खो घातला आहे. शेखचिल्लीप्रमाणे ठाकरेंचे कामकाज दिसतेय. शिवसेनेच्या झाडाला ज्या कोकणने वाढवले. त्याच झाडाच्या फांद्या तोडायला ठाकरे निघाले असल्याची टीका भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी येथे केली.कणकवली येथील भाजप कार्यालयात शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा चिटणीस रवींद्र शेट्ये उपस्थित होते . प्रमोद जठार म्हणाले, शिवसेनेला रत्नागिरीतून चार, सिंधुदुर्गातून दोन तसेच ठाणे, रायगड आणि मुंबईतून सर्वाधिक आमदार मिळाले. याच आमदारांच्या पाठबळावर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होता आले आहे. मात्र, कोकणातील विकास प्रकल्पांना टाळे लावण्याची कामगिरी त्यांनी बजावली आहे.प्रकल्प बंद करणे खूप सोपे असते. पण प्रकल्पांना मान्यता मिळविण्यासाठी प्रचंड कालावधी लागत असतो. त्यामुळे विकास प्रकल्प बंद करण्याआधी त्यांची समीक्षा करा . पण कोकण विकासाच्या आड येऊ नका. कोकणातील विकास प्रकल्पांवरील स्थगिती मुख्यमंत्र्यांनी न उठवल्यास प्रकल्पाच्या ठिकाणी जाऊन भाजपतर्फे आंदोलन छेडणार असल्याचेही जठार यांनी यावेळी सांगितले.भाजपच्या सिंधुदुर्ग कोअर कमिटीची बैठक शनिवारी कणकवली येथे होणार आहे. यात आठही तालुकाध्यक्षांची निवड होणार आहे. खासदार नारायण राणे, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार नीतेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही निवड प्रक्रिया होईल. तसेच सावंतवाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवाराचेही नावही त्याचवेळी निश्चित होईल, असे जठार यांनी यावेळी सांगितले.शिवसेना पक्षच ठेवलाय गहाणआमदार नीतेश राणे हे कोकरू असल्याची टीका माजी पालकमंत्री दीपक केसरकर करत आहेत. पण काही वेळ त्यांनी नीतेश राणेंच्या बाजूला उभे राहून पहावे म्हणजे कोण कोकरू आणि कोण वाघ आहे ते समजून येईल . तसेच माझ्यावर पक्ष गहाण ठेवल्याची टीका करणाऱ्या केसरकरांनी काही वर्षापूर्वीच आमदारकीसाठी आपली निष्ठा आणि स्वाभिमान राणेंकडे गहाण ठेवला होता . आता तर त्यांच्या पक्षप्रमुखांनीच शिवसेना पक्ष पवार - गांधींच्या चरणी अर्पण केलाय. त्यामुळे केसरकरांनी आमच्यावर नाहक आरोप करू नयेत. तसेच राणे हे भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. त्यामुळे त्यांचा सन्मान आम्ही कायमच ठेवणार आहोत, असेही प्रमोद जठार यावेळी म्हणाले.

टॅग्स :Pramod Jatharप्रमोद जठारsindhudurgसिंधुदुर्ग