शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

Sindhudurg: 'सायबानू काय ता करा; पण हत्तींका धरा ', हत्तीआपद्ग्रस्तांची उपवनसंरक्षकांना आर्त साद

By महेश विद्यानंद सरनाईक | Updated: July 3, 2024 18:45 IST

हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीम

वैभव साळकरदोडामार्ग : सायबानू काय ता करा; पण हत्तींका धरा, अशी आर्त विनवणी केर-मोर्ले परिसरातील हत्तीआपदग्रस्तांनी सिंधुदुर्गचे उपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांना केली. मंगळवारी त्यांनी वनाधिकाऱ्यांसह हत्तीनुकसानग्रस्त भागाचा दौरा केला. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची प्रत्यक्ष पाहणी करत त्यांच्याशी संवाद साधला. शेतकऱ्यांनीही आपल्या व्यथा त्यांच्यासमोर मांडून डोळ्यातील अश्रूंना वाट मोकळी करून दिली, तर रेड्डी यांनी तुमची मागणी शासनापर्यंत पोहोच; पण त्याचबरोबर तुमच्या मागण्यांबाबत काय पाठपुरावा केला हे दर पंधरा दिवसांनी तुम्हाला वनाधिकारी गावात येऊन कळवतील, असे आश्वासन दिले.यावेळी त्यांच्यासमवेत दोडामार्ग वनक्षेत्रपाल व्ही.एस. मंडल, सावंतवाडी वनक्षेत्रपाल मदन क्षीरसागर आदी उपस्थित होते. यावेळी हत्ती पकड या प्रमुख मोहिमेसह शेतकरी विमा, पंचनामा क्लिष्ट बाबी, वाढीव नुकसानभरपाई, समाविष्ट नसलेली पिके, शेतकरी शेतीत जात नसल्याने होणारे नुकसान, प्रतिकुटुंब अनुदान, सोलार- पथदीप, लघुउद्योग निर्मिती, फळबाग लागवड अनुदान यासह अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

वन विभागाने सातत्य ठेवावेउपवनसंरक्षक नवकिशोर रेड्डी यांनी थेट शेती नुकसानीपर्यंत पोहोचण्याचा जो निर्णय घेतला तो स्वागतार्ह असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. मात्र, यात सातत्य ठेवून जेव्हा वन विभाग शेतकऱ्यांच्या मागण्याचा पाठपुरावा करून दिलासा देईल त्याचवेळी आमचे खरे समाधान होईल, अशी भावना व्यक्त केली.

हत्ती तिलारी बुडीत क्षेत्रात नेण्यासाठी मोहीमसध्या हत्ती गावठाण क्षेत्रात आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी भीती व्यक्त केली. रेड्डी यांनी हे अंतरही पाहिले. ग्रामस्थांनी हत्तींना तिलारी बुडीत क्षेत्रापर्यंत न्या, अशी मागणी केली. त्याला अधिकाऱ्यांनी प्रतिसाद दिला. मात्र, पावसाळी हंगामातील अडचणीवर चर्चेअंती पाऊस कमी झाल्यावर याबाबतीत निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गFarmerशेतकरीforest departmentवनविभाग