शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

वायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणा, मात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2019 23:42 IST

शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागाने घेतल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथे लोकमतशी बोलताना केली.

ठळक मुद्देवायंगणीतून सी-वर्ल्ड प्रकल्प हलवणार, पर्यटनमंत्र्याची घोषणामात्र प्रकल्प सिंधुदुर्गातच होणार लोकमतशी खास संवाद

अनंत जाधवसावंतवाडी : शेतकरी जर स्वेच्छेने जमीन देत असतील तरच आम्ही मालवण तालुक्यातील तोंडवली-वायंगणी येथे सी-वर्ल्ड प्रकल्प केला असता. पण शेतकऱ्यांची जबरदस्ती जमीन सरकार घेणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणीतून हलवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय पर्यटन विभागाने घेतल्याची घोषणा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी मुंबई येथे लोकमतशी बोलताना केली.

सरकारकडे नव्या जागांचे प्रस्ताव आले आहेत. त्यावर अभ्यास सुरू असल्याचेही यावेळी मंत्री रावल म्हणाले. समुद्रातील विश्व पर्यटकांसाठी खुले होणार असून, हा आशिया खंडातील पहिला प्रकल्प सिंधुदुर्गमध्ये राबविण्यात येणार आहे, असे यावेळी मंत्री रावल म्हणाले. सिंधुदुर्गातील प्रकल्पाबाबत पर्यटन मंत्री जयकुमार रावल व पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यात मंगळवारी मुंबई येथे मंत्रालयात बैठक झाली. त्यावेळी विविध विषयावर चर्चा झाली.यावेळी मंत्री जयकुमार रावल म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्हा हा आम्हाला पर्यटनातील मॉडेल बनवायचे आहे. त्यामुळे राज्य सरकार प्रयत्न करत आहेत. १९९५ मध्ये सिंधुदुर्गमध्ये तीन पंचतारांकित हॉटेल प्रकल्प आले होते. त्यातील एका पंचतारांकित हॉटेलचा प्रकल्प हा पूर्ण झाला आहे. तर ताज या पंचतारांकित हॉटेलच्या प्रकल्पाचे काम प्रगतीपथावर आहे. तर तिसरे हॉटेल हे पर्यटन विभागाने उभे केले आहे. ही तीनही हॉटेल पूर्ण होतील तेव्हा मोठ्या प्रमाणात पर्यटक सिंधुदुर्गमध्ये येतील, असे यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.सी-वर्ल्ड प्रकल्प तोंडवली-वायंगणी येथे करण्यासाठी शासन आग्रही होते. पण तेथील शेतकरी जमिनी देण्यास इच्छुक नाहीत. शेतकरी जर स्वेच्छेने जमिनी देण्यास तयार नसतील तर आम्ही जमिनी हिसकावून घेऊन प्रकल्प करणार नाही. त्यामुळे सी-वर्ल्ड प्रकल्प या जागेवरून हलवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, असे यावेळी मंत्री रावल यांनी जाहीर केले आहे.

नवीन जागा अद्याप निश्चित झाली नाही. सरकारकडे तीन ते चार प्रस्ताव आले आहेत. त्यावर विचार करून निर्णय घेतला जाणार आहे. सी-वर्ल्ड प्रकल्पासाठी शंभर कोटी रूपयांचा निधी प्राप्त झाला होता. पण हा निधी आम्ही शासनाला परत दिला आहे. जेव्हा आम्हाला गरज लागेल तेव्हा शासन तो निधी देईल, असेही मंत्री रावल यांनी सांगितले.सिंधुदुर्ग जिल्ह्यात आशिया खंडातील पहिला प्रकल्प अंडर ग्राऊंड ग्लास समरीचा म्हणजेच पाण्यातील विश्व हे पर्यटकांना बघता येणार आहे. त्यासाठी चांदा ते बांदा योजनेतून निधीची तरतूद करण्यात आली आहे. पण हा प्रकल्प कुठे करायचा हे निश्चित झाले नाही. मात्र या प्रकल्पामुळे अधिकाधिक पर्यटक सिंधुदुर्ग जिल्ह्यात येतील असा आम्हाला विश्वास आहे, असेही यावेळी मंत्री रावल यांनी सांगितले.स्थानिक रोजगाराच्या दृष्टीने नवे धोरणपर्यटन विभाग स्थानिकांना रोजगार मिळावा यासाठी एक नवीन धोरण आणणार असून, यात स्थानिकांना कॉटेजीस बांधून दिले जाणार आहेत. यात पर्यटक राहतील. ही कॉटेजीस घराच्या समोर बांधून दिली जाणार आहेत. यासाठी जागतिक कंपनीशी चर्चा सुरू असल्याचेही यावेळी पर्यटनमंत्री रावल यांनी सांगितले.

टॅग्स :Jaykumar Rawalजयकुमार रावलDeepak Kesarkarदीपक केसरकर sindhudurgसिंधुदुर्ग