शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Budget session: आरोप प्रत्यारोपात सत्ताधारी-विरोधक व्यस्त, परशुराम उपरकरांची टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2022 15:02 IST

सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही.

कणकवली : सध्या सुरू असलेल्या राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभागृहाची प्रतिष्ठा राखली जात नाही. आमदारांचे विविध प्रश्न तसेच मतदारसंघाचा विकासनिधी, सांघिक विकासकामे याबाबत मांडणी केली जाते. मात्र सध्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमेकांची उणीधुनी काढत, लोकप्रतिनिधी कोट्यवधीची माया कशी जमा करतात हे दाखवून देत जनतेची करमणूक केली जात आहे. अशी टीका मनसे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली.कणकवली येथील मनसेच्या संपर्क कार्यलयात गुरुवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. परशुराम उपरकर म्हणाले, सध्या वाढलेली महागाई, अडचणी या सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नांवर विधिमंडळात चर्चा होताना दिसत नाही. प्रशासनातील अनेक अधिकारी मुजोर झाले आहेत. संबधित खात्याच्या मंत्र्याला जे जमणार नाहीत असे आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस हे तिन्ही पक्ष तसेच विरोधी भाजपा पक्ष बदनाम होत आहेत.टक्केवारीच्या राजकारणात जिल्हा नियोजन समिती अंतर्गत प्राप्त झालेला निधी मागील वर्षी अखर्चित राहिला होता. यावर्षीही तशीच स्थिती आहे. रिक्त असलेली जिल्हा शल्यचिकित्सक, प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टरांची पदे भरण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्यांना जनतेच्या आरोग्याचे तसेच इतर प्रश्नांचे काहीच वाटत नाही. त्यामुळे जनतेच्या विकासासाठी खर्च होणाऱ्या निधीवर स्वतः लक्ष ठेवून जनतेने दर्जेदार काम करून घेणे गरजेचे आहे. आता जनतेलाच या लोकप्रतिनिधींवर अंकुश ठेवावा लागेल. तरच काही प्रमाणाततरी परिस्थिती सुधारेल असे परशुराम उपरकर शेवटी म्हणाले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गvidhan sabhaविधानसभाVidhan Parishadविधान परिषदMNSमनसे