शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; स्ट्राँग रुम उघडण्यात आल्या, मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध बांधवांचा मोर्चा, सिंधुदुर्गनगरीत घडविले एकजुटीचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:28 IST

ओरोस : भारतासहित जगातील बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्रस्थळ असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ आणि अन्यायकारक ...

ओरोस : भारतासहित जगातील बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्रस्थळ असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ आणि अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा रद्द करावा तसेच महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील बौद्ध समाजाने एकजुटीचे दर्शन घडवित आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला.सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात. मात्र, या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी १९९२पासून आंदोलन होत आहेत. तरी महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. तेथे पूजा आणि कर्मकांड केली जातात.  ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तीच कर्मकांड येथे सुरू आहेत.सम्राट अशोक यांनी बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार निर्माण केले आहे.  त्यामध्ये बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

अनेक बौद्ध बांधव  झाले सहभागीसिंधुदुर्ग बौद्ध महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततेत आणि शिस्तबद्ध  मोर्चा काढला. यावेळी भन्ते सचित बोधी, भन्ते प्रज्ञावंत, भन्ते अश्वजीत, विद्याधर कदम, अंकुश कदम, प्रभाकर जाधव, आनंद कासार्डेकर, सुषमा हरकुळकर, शारदा कांबळे, अंजली कदम, संदीप कदम, श्यामसुंदर जाधव, ॲड. एन पी. मठकर यांच्यासह अनेक बौद्ध बांधव या मोर्चाच्यावेळी  उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील  यांना निवेदन दिले.

शांततेत मार्गदर्शनमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बौद्धांच्या प्रार्थनेने सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना सभेत मार्गदर्शन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBiharबिहारBuddha Cavesबौद्ध लेणीagitationआंदोलन