शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

महाबोधी महाविहार मुक्तीसाठी बौद्ध बांधवांचा मोर्चा, सिंधुदुर्गनगरीत घडविले एकजुटीचे दर्शन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2025 17:28 IST

ओरोस : भारतासहित जगातील बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्रस्थळ असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ आणि अन्यायकारक ...

ओरोस : भारतासहित जगातील बौद्ध समाजासाठी अत्यंत पवित्रस्थळ असलेल्या बिहार राज्यातील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्तीच्या समर्थनार्थ आणि अन्यायकारक बोधगया मंदिर कायदा रद्द करावा तसेच महाबोधी महाविहारचे व्यवस्थापन पूर्णपणे बौद्धांच्या ताब्यात द्यावे, या मागणीसाठी सोमवारी जिल्ह्यातील बौद्ध समाजाने एकजुटीचे दर्शन घडवित आपल्या मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर  मोर्चा काढला. यावेळी विविध घोषणा देऊन येथील परिसर दणाणून सोडला.सम्राट अशोक यांनी इ.स. पूर्व तिसऱ्या शतकात महाबोधी महाविहाराचे बांधकाम केले. तथागत बुद्धाला ज्या बोधीवृक्षाखाली ज्ञानप्राप्ती झाली तो बोधीवृक्ष याच महाबोधी महाविहार परिसरात आहे. त्यामुळे देशातील नव्हे, तर जगभरातील बौद्ध अनुयायी भिक्खू आणि पर्यटक या स्थळाला भेट देतात. मात्र, या महाविहाराचे नियंत्रण आणि व्यवस्थापन आजही बौद्धांच्या ताब्यात नाही.महाबोधी विहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे, यासाठी १९९२पासून आंदोलन होत आहेत. तरी महाबोधी विहार व्यवस्थापन कायदा बदलण्यात आला नाही. तेथे पूजा आणि कर्मकांड केली जातात.  ज्या रूढी परंपरांना तथागत गौतम बुद्ध यांनी नाकारले तीच कर्मकांड येथे सुरू आहेत.सम्राट अशोक यांनी बिहार बोधगया येथे महाबोधी महाविहार निर्माण केले आहे.  त्यामध्ये बोधगया येथील महाबोधी महाविहार हे स्थळ आहे. चुकीच्या पद्धतीने करण्यात आलेला महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करावा व महाबोधी महाविहार मुक्त करावे यासाठी हा मोर्चा काढण्यात आला होता.

अनेक बौद्ध बांधव  झाले सहभागीसिंधुदुर्ग बौद्ध महासंघाच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील बौद्ध बांधवांनी ओरोस फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला अभिवादन करून ओरोस फाटा ते जिल्हाधिकारी कार्यालय असा शांततेत आणि शिस्तबद्ध  मोर्चा काढला. यावेळी भन्ते सचित बोधी, भन्ते प्रज्ञावंत, भन्ते अश्वजीत, विद्याधर कदम, अंकुश कदम, प्रभाकर जाधव, आनंद कासार्डेकर, सुषमा हरकुळकर, शारदा कांबळे, अंजली कदम, संदीप कदम, श्यामसुंदर जाधव, ॲड. एन पी. मठकर यांच्यासह अनेक बौद्ध बांधव या मोर्चाच्यावेळी  उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी अनिल पाटील  यांना निवेदन दिले.

शांततेत मार्गदर्शनमोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडकल्यानंतर मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. यावेळी बौद्धांच्या प्रार्थनेने सभेला सुरुवात करण्यात आली. सभेच्या सुरुवातीला पहलगाम येथे मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच यावेळी मान्यवरांनी उपस्थितांना सभेत मार्गदर्शन केले.

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गBiharबिहारBuddha Cavesबौद्ध लेणीagitationआंदोलन