शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:55 IST

शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले

कणकवली: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे नेतृत्व गेली अठावीस वर्षे केले. मात्र, अनेक पदे मिळूनही जिल्हयाचा सर्वांगीण विकास ते करु शकले नाहीत. तर  जनतेसाठी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी आमदार नितेश राणे हे मंत्र्यांना निवेदने देत सुटले आहेत. मात्र, ते कणकवली मतदारसंघात कोणतेही महत्वपूर्ण काम करु शकले नाहीत. असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी केला.कणकवलीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, अ‍ॅड. हर्षद गावडे, वैभव मालंडकर, आदीत्य सापळे, प्रसाद अंधारी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, आमदार नीतेश राणेंची कार्यपध्दती भाजप नेतृत्वाला माहिती असल्याने  त्यांना मंत्री पद दिलेले नाही. फोंडाघाट, करुळ, भुईबावडा या घाट रस्त्यांची  दुरावस्था झाली आहे. ही कामे करुन घेण्याची जबाबदारी आमदार राणेंची होती. मात्र, ते कोणतेही काम करु शकलेले नाहीत. त्यांची जर क्षमता असती तर भाजपने त्यांना मंत्रीपद दिले असते. त्यांची कार्यपध्दती योग्य नसल्याने मूळ भाजप कार्यकर्ते कंटाळले आहेत.हिंदूंच्या संदर्भात आमदार राणे आता भुमिका घेत आहेत, पण त्यांच्या भुमिका कायम बदलत असतात. पक्षाने मुळ भाजपमधील रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले. राणेंचा राजकीय इतिहास सर्वांना माहिती आहे. सत्तेची अनेक पद भोगून झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस या पक्षांवर टीका करत ते पक्षाबाहेर पडले. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले त्यांच्याच विरोधात ते गेले, हे भाजप नेतृत्वाला माहिती आहे. ज्यावेळी शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले आहे. भाजपमध्ये आता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने नवीन प्रस्थ निर्माण झाले आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले पण पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली नाही. आपण थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेलआमदार वैभव नाईक यांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी लावण्यात आली आहे. नाईक कुटूंबिय गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. वैभव नाईकांचे नेतृत्व मोठे झाल्यानेच हे असले प्रकार भाजपकडून सुरु करण्यात आले आहेत. राणें विरुध्द टीकेचा आणि संविधानाचा संबंध काय? असा सवालही पारकर यांनी केला. आता जिल्हयाच्या पालकमंत्री पदी रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी जिल्हा विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, जनतेच्या हितासाठी शिवसेना पुढील काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करु असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा