शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

क्षमता असती तर भाजपने मंत्रिपद दिलं असतं, ठाकरे गटाच्या नेत्याकडून नितेश राणेंवर टीका

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 15:55 IST

शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले

कणकवली: केंद्रीयमंत्री नारायण राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्हयाचे नेतृत्व गेली अठावीस वर्षे केले. मात्र, अनेक पदे मिळूनही जिल्हयाचा सर्वांगीण विकास ते करु शकले नाहीत. तर  जनतेसाठी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्यासाठी आमदार नितेश राणे हे मंत्र्यांना निवेदने देत सुटले आहेत. मात्र, ते कणकवली मतदारसंघात कोणतेही महत्वपूर्ण काम करु शकले नाहीत. असा आरोप उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते संदेश पारकर यांनी केला.कणकवलीतील निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगरसेवक रुपेश नार्वेकर, अ‍ॅड. हर्षद गावडे, वैभव मालंडकर, आदीत्य सापळे, प्रसाद अंधारी उपस्थित होते.संदेश पारकर म्हणाले, आमदार नीतेश राणेंची कार्यपध्दती भाजप नेतृत्वाला माहिती असल्याने  त्यांना मंत्री पद दिलेले नाही. फोंडाघाट, करुळ, भुईबावडा या घाट रस्त्यांची  दुरावस्था झाली आहे. ही कामे करुन घेण्याची जबाबदारी आमदार राणेंची होती. मात्र, ते कोणतेही काम करु शकलेले नाहीत. त्यांची जर क्षमता असती तर भाजपने त्यांना मंत्रीपद दिले असते. त्यांची कार्यपध्दती योग्य नसल्याने मूळ भाजप कार्यकर्ते कंटाळले आहेत.हिंदूंच्या संदर्भात आमदार राणे आता भुमिका घेत आहेत, पण त्यांच्या भुमिका कायम बदलत असतात. पक्षाने मुळ भाजपमधील रवींद्र चव्हाण यांना कॅबिनेट मंत्रीपद देऊन सिंधुदुर्गचे पालकमंत्री पद दिले. राणेंचा राजकीय इतिहास सर्वांना माहिती आहे. सत्तेची अनेक पद भोगून झाल्यानंतर शिवसेना, काँग्रेस या पक्षांवर टीका करत ते पक्षाबाहेर पडले. ज्यांनी ज्यांनी त्यांच्यावर उपकार केले त्यांच्याच विरोधात ते गेले, हे भाजप नेतृत्वाला माहिती आहे. ज्यावेळी शिंदे गटाचा उदय झाला तेव्हाच राणेंचे अस्तित्व संपले आहे. भाजपमध्ये आता मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या रुपाने नवीन प्रस्थ निर्माण झाले आहे. नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन निवेदन दिले पण पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस तसेच पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेतली नाही. आपण थेट मुख्यमंत्र्यांना भेटू शकतो हे दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न होता.जनतेच्या हितासाठी शिवसेना रस्त्यावर उतरेलआमदार वैभव नाईक यांना केवळ त्रास देण्याच्या उद्देशाने त्यांची चौकशी लावण्यात आली आहे. नाईक कुटूंबिय गेली अनेक वर्षे प्रामाणिकपणे व्यवसाय करत आहेत. वैभव नाईकांचे नेतृत्व मोठे झाल्यानेच हे असले प्रकार भाजपकडून सुरु करण्यात आले आहेत. राणें विरुध्द टीकेचा आणि संविधानाचा संबंध काय? असा सवालही पारकर यांनी केला. आता जिल्हयाच्या पालकमंत्री पदी रवींद्र चव्हाण आहेत त्यांनी जिल्हा विकासासाठी प्रामाणिकपणे काम करावे, जनतेच्या हितासाठी शिवसेना पुढील काळात रस्त्यावर उतरून संघर्ष करेल. पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली जिल्हयात शिवसेना पक्षसंघटना अधिक मजबूत करु असेही संदेश पारकर यावेळी म्हणाले

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गNitesh Raneनीतेश राणे BJPभाजपा