शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2020 18:18 IST

bjp, vengurla, farmar, sindhdurgnews परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.

ठळक मुद्देशासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा, भाजपा किसान मोर्चाची मागणी वेंगुर्ला तहसीलदारांना निवेदन

वेंगुर्ला : परतीच्या पावसाने वेंगुर्ला तालुक्यातील भातशेतीचे नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून सरकारकडे अहवाल सादर करावा. शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा आणि तातडीने मदत शेतकऱ्यांच्या खाती जमा करावी अशी मागणी भाजपा किसान मोर्चा वेंगुर्ल्याच्यावतीने तहसीलदारांकडे करण्यात आली आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कृषी विभागाकडून नुकसानीचा अहवाल घेऊन शासनाकडे पाठवावा. तसेच प्रतीगुंठा १०० रुपये तुटपुंजी नुकसान भरपाई किमान प्रतीगुंठा ५०० रुपये करण्यात यावी. गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा लाभापासून अनेक लाभार्थी वंचित आहेत. तो लाभही तत्काळ देण्यात यावा. गेल्यावर्षी नुकसान भरपाईसाठी लागणाऱ्या सातबाऱ्यास सरकारकडून पैसे घेतले जात नव्हते. परंतु आता सातबारासाठी शासन पैसे घेत आहे ते शासनाने बंद करावे.या गोष्टींचा शासनाने सहानभूतीपूर्वक विचार करावा व केवळ घोषणा न करता ओला दुष्काळ जाहीर करून तातडीने शेतकऱ्यांना थेट मदत करावी. अन्यथा शासनाविरोधात शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करावे लागेल असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, किसान मोर्चा तालुकाध्यक्ष यशवंत उर्फ बापू पंडित, महिला तालुकाध्यक्षा स्मिता दामले, किसान मोर्चा उपाध्यक्ष मकरंद प्रभू, सरचिटणीस सत्यवान पालव, चिटणीस अपर्णा बोवलेकर, रामचंद्र गावडे, प्रकाश बांदवलकर, विनय गोरे, शांताराम तेली, दशरथ गडेकर, संदीप खोत, भूषण बांबार्डेकर इत्यादी किसान मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते. 

टॅग्स :BJPभाजपाFarmerशेतकरीVengurle Police Stationवेंगुर्ले पोलिस स्टेशनTahasildarतहसीलदार