शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
4
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
5
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
6
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
7
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
8
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
9
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
10
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
11
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
12
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
13
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
14
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
15
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
16
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
17
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
18
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
19
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
20
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटल्याने फोडाफोडी, काँग्रेस नेते सतेज पाटील यांची टीका

By अनंत खं.जाधव | Updated: August 9, 2023 16:50 IST

..त्यामुळे शरद पवारांबद्दल कोणाच्या मनात संभ्रम नाही

सावंतवाडी : महाराष्ट्रात भाजपचा जनाधार घटला आहे, त्यामुळेच त्यांना इतर पक्षाच्या नेत्यांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र त्यांनी कितीही प्रयत्न केले तरी काँग्रेसचा एकही नेता भाजपकडे जाणार नाही. आता काँग्रेसकडेच सर्वसामान्य जनता आशेचा किरण म्हणून पाहत आहेत असा विश्वास माजी मंत्री, आमदार सतेज ऊर्फ बंटी पाटील यांनी व्यक्त केला. ते सावंतवाडीत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.दीपक केसरकर हे कोल्हापूरचे पालकमंत्री असले तरी त्याचा मित्रपक्ष भाजपच त्याच्यावर नाराज आहेत. पर्यटनासाठी ते कोल्हापुरात येतात, असे त्यांचे म्हणणे मग त्याच्यावर न बोललेच बरे असे म्हणत पाटील यांनी मंत्री केसरकर यांना चिमटा काढला.आमदार सतेज पाटील हे लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोकण दौर्‍यावर आहेत. यावेळी त्यांनी राणी पार्वती देवी हायस्कुलमध्ये काँग्रेस पदाधिकार्‍यांशी चर्चा करत कामाचा आढावा घेतला. यावेळी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ईशाद शेख, विकास सावंत, महिला जिल्हाध्यक्षा साक्षी वंजारी, रविंद्र म्हापसेकर, राजू मसुरकर, महेंद्र सागेलकर, समीर वंजारी, विभावरी सूकी आदी उपस्थित होते.पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या  पार्श्वभूमीवर सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड जिल्ह्यातील काँग्रेसच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या बैठका घेवून त्याची मते जाणून घेण्यात येतील आणि तसा अहवाल प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना देण्यात येणार आहे. त्यावर ते निर्णय घेतील. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काँग्रेस संघटना अजूनही बळकट आहे. फक्त त्यांच्या पाठीशी राहण्याची गरज असल्याचे ते म्हणाले.काँग्रेसचा एकही नेता, आमदार भाजपकडे जाणार नाही महाराष्ट्रात सध्या राजकारणात कोणावर विश्वास ठेवायचा असा प्रश्न जनतेला पडला आहे. पण जनतेला काँग्रेस वर पूर्णपणे विश्वास असून त्याचा विश्वास काँग्रेस सार्थकी लावेल. एकही नेता किंवा आमदार भाजपकडे जाणार नसून याची आम्हाला खात्री आहे. मुळातच राज्यातील भाजपकडे जनाधार राहिला नसल्याने 105 आमदार असलेल्या भाजपला 14 मंत्री घेऊन समाधान मानावे लागत असून दुसरे पक्ष फोडावे लागत आहेत ही दुर्दैवाची गोष्ट.शरद पवार इंडिया आघाडी सोबतच अजित पवार यांच्या बरोबर काही आमदार जरी भाजप सोबत गेले असले तरी शरद पवार यांनी इंडिया आघाडी सोबत राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे कोणाच्या मनात संभ्रम नसल्याचे पाटील यांनी सांगितले.काँग्रेसच्या कोणाला ईडीची नोटीस नाहीकाँग्रेसच्या कोणत्याही नेत्याला ईडीची नोटीस आली नाही. भाजप सोबत गेलेल्यांना ईडी सीबीआयची नोटीस आली होती का याची माहिती पत्रकारांनीच घ्यावी असेही ते म्हणाले. 

टॅग्स :sindhudurgसिंधुदुर्गSatej Gyanadeo Patilसतेज ज्ञानदेव पाटीलBJPभाजपाlok sabhaलोकसभा