शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

आंबा-काजू उत्पादकांना मोठा दिलासा; अधिवेशन संपण्यापूर्वीच नुकसानभरपाई, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 18, 2026 16:20 IST

कोकणातील बागायतदारांना मदतीचा हात

कणकवली (सिंधुदुर्ग) : कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांच्या यंदाच्या हंगामातील नुकसानीची दखल घेत राज्य शासनाने ठोस भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांना समाधानकारक नुकसानभरपाई देण्यात येणार असल्याची स्पष्ट ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. सध्या सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या समाप्तीपूर्वीच याची अधिकृत घोषणा केली जाईल, असे त्यांनी मुंबईतील आढावा बैठकीत सांगितले.विधानभवनातील मंत्रिमंडळ सभागृहात मंगळवारी (दि. १७) झालेल्या या उच्चस्तरीय बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कृषिमंत्री दत्ता भरणे, खासदार नारायण राणे, खासदार सुनील तटकरे, सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे, उद्योगमंत्री तथा रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले, गृहराज्यमंत्री योगेश कदम, आमदार नीलेश राणे, दीपक केसरकर, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड, ज्ञानेश्वर म्हात्रे, भास्कर जाधव, महेंद्र दळवी आणि किरण सामंत यांच्यासह कोकणातील सर्व आमदार व सचिव स्तरावरील अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्र्यांकडून गांभीर्याने दखलनुकसानभरपाईची अधिकृत घोषणा सुरू असलेल्या अधिवेशनातच होणार असून, ही मदत याच आर्थिक वर्षात देण्याचा सरकारचा ठाम निर्धार आहे. हवामान बदल आणि पीकनुकसानीवर मंत्रिमंडळ सभागृहात सविस्तर चर्चा करण्यात आली असून, कोकणातील सर्व मंत्री आणि आमदारांनी मांडलेली वस्तुस्थिती मुख्यमंत्र्यांनी गांभीर्याने ऐकली आहे.मुख्यमंत्री काय म्हणाले?कोणत्याही परिस्थितीत आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे. बागायतदारांना पूर्ण न्याय मिळेल आणि मिळणारी भरपाई समाधानकारक असेल असे सांगतानाच, शेतकऱ्यांच्या पाठीशी शासन खंबीरपणे उभे असून तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले आहेत.

कोकणच्या अर्थकारणाला चालना मिळणारपालकमंत्री नितेश राणे यांनी शेतकऱ्यांच्या आक्रोश मोर्चात दिलेले आश्वासन या निर्णयामुळे यशस्वी होताना दिसत आहे. कृषी विभाग आणि जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना नुकसानीचे अंतिम अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, यामुळे कोकणच्या आंबा-काजू अर्थकारणाला मोठी नवसंजीवनी मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Relief for Mango-Cashew Farmers: Compensation Before Session Ends, CM Assures

Web Summary : Maharashtra government assures mango and cashew farmers in Konkan will receive adequate compensation for crop losses before the current assembly session concludes. Chief Minister Fadnavis affirmed support, directing immediate implementation to revitalize Konkan's economy.