शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
Iran-Israel Conflict: इस्त्रायल आकाराने लहान, लोकसंख्या अन् सैन्यातही इराणच्या मागे, तरीही युद्धात कसे पुढे? हे आहे कारण
3
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
4
जावेसमोर पतीची चप्पल मांडीखाली लपवली अन् फसली; पतीची हत्या करुन मृतदेहाचे तुकडे लपवले खड्ड्यात
5
पाक सीमेजवळ विमानांचे उड्डाण धोक्याचे, ४६५ वेळा जीपीएसमध्ये छेडछाडीच्या घटना!
6
'टेस्ट चॅम्पियन' टेम्बा बवुमाचा चिमुरड्या लेकाला सोबत घेऊन 'विक्टरी वॉक', पाहा क्यूट Video
7
पुढील २४ तासांसाठी 'या' जिल्ह्यांना रेड तर ६ जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट; वीज पडून ८ जण दगावले
8
Bhushan Gavai: संविधान हा सतत विकसित होणारा दस्तऐवज- सरन्यायाधीश
9
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
10
केंद्र सरकारतर्फे ५ लाखांपर्यंत मोफत उपचार! 'आयुष्मान ॲप'वरून कार्ड कसं डाउनलोड करायचं?
11
Radhika Subramaniam : कमाल! भारताची पहिली AI ट्रॅव्हल इन्फ्लुएन्सर, देशाची सफर घडवणाऱ्या राधिकाला पाहिलंत का?
12
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
13
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
14
बापहो, काळजी फक्त कमाईची नको; मुलांच्या यशासाठी त्यांना वेळ देणंही तितकंच मोलाचं! 
15
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
16
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
17
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
18
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
19
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
20
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!

शेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई, आशिष शेलार यांची ग्वाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2019 12:02 IST

अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देशेतकऱ्यांना तत्काळ नुकसान भरपाई, आशिष शेलार यांची ग्वाही कोलगाव येथील भातशेती नुकसानीची केली पाहणी

सावंतवाडी : अवेळी पडलेल्या पावसामुळे कोकणात सर्वत्र भातशेतीचे नुकसान झाले आहे. गुंठाभर जागेत भातशेती करायची झाली तर सातशे-आठशे रुपये खर्च येतो. पण शासन नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देते. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून बदल करण्याची मागणी करणार आहे. या संकटातून पुन्हा कोकण उभा करायचा आहे, असे मत राज्याचे शालेय शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केले.मंत्री शेलार यांनी शनिवारी कोलगाव येथील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर शेतकऱ्यांना दिलासा देताना सरकार कसे सकारात्मक आहे हे पटवून दिले.यावेळी आमदार नीतेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार, अतुल काळसेकर, दत्ता सामंत, तालुकाध्यक्ष महेश सारंग, अप्पर जिल्हाधिकारी मंगेश जोशी, तहसीलदार राजाराम म्हात्रे, जिल्हा बँक संचालक गुरुनाथ पेडणेकर, गटविकास अधिकारी गजानन भोसले, प्रभारी नगराध्यक्षा अन्नपूर्णा कोरगावकर, राजू राऊळ, प्रभाकर सावंत आदी उपस्थित होते.मंत्री शेलार यांनी प्रथम कोलगाव येथील सरमळकर यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. यावेळी भात पूर्णत: खाली पडले होते. तर काही कुजले होते. यावेळी शेतकरी सरमळकर यांनी आम्ही भाड्याने जागा घेऊन शेती करतो आणि अवेळी पावसामुळे आमचे पूर्ण नुकसान होते, अशी व्यथा मांडली. तोच मुद्दा मंत्री शेलार यांनी धरून शेतकऱ्यांना सरकार वाऱ्यावर सोडणार नाही, असे सांगितले. कोकणाला पुन्हा उभे करण्याची गरज आहे. यासाठी आपण सर्वांनी संघटित होऊन प्रयत्न केले पाहिजेत, असे स्पष्ट केले.आमदार नीतेश राणे म्हणाले, दोन महिन्यांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये अतिवृष्टी झाली होती. त्यावेळी झालेल्या नुकसानीची भरपाई अद्याप मिळाली नाही. त्यामुळे आता तरी नुकसान भरपाई त्वरित मिळावी.

भरपाईला वेळ झाला तर शेतकरी अडचणीत येतो. जर कोण पंधरा हजार नुकसान भरपाई मिळेल असे सांगत असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. शेतकºयांनी आपणास काय वाटते ते सांगितले पाहिजे. तरच परिपूर्ण अहवाल शासनापर्यंत पोहोचेल, असेही ते म्हणाले.निष्कर्ष बदलण्याची विनंती करणारजर एखाद्या शेतकऱ्याला गुंठ्यामागे सातशे रुपये खर्च येत असेल आणि शासन त्यांना नुकसान भरपाई म्हणून किरकोळ रक्कम देत असेल तर शेतकऱ्यांना कसे परवडेल? असा सवाल करीत मी आजच मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हे सर्व निष्कर्ष बदलण्याची विनंती करणार आहे. कारण सरकार सकारात्मक आहे. मला मुख्यमंत्र्यांनी पाठवले असल्याने यावर तातडीने निर्णय होईल, असा विश्वासही मंत्री शेलार यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Ashish Shelarआशीष शेलारFarmerशेतकरीsindhudurgसिंधुदुर्ग