शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

वकील संघटनेची सरकारविरोधात निदर्शने, विविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2019 2:18 PM

केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देशातील वकिलांसाठी कल्याणकारी योजना समाविष्ट न केल्याने भारतीय विधिज्ञ परिषदेने पुकारलेल्या देशव्यापी निदर्शनं कार्यक्रमात मालवणातील वकिलांनी सहभाग घेतला. यावेळी वकिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मालवण दिवाणी न्यायाधीश व मालवण तहसीलदारांना सादर करत मालवण न्यायालयाबाहेर सरकार विरोधात निदर्शन करत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.

ठळक मुद्देविविध मागण्यांचे निवेदन तहसीलदारांना सादर कल्याणकारी योजनेत समावेश करण्याची आहे मागणी

मालवण : केंद्र सरकारने अर्थसंकल्पात देशातील वकिलांसाठी कल्याणकारी योजना समाविष्ट न केल्याने भारतीय विधिज्ञ परिषदेने पुकारलेल्या देशव्यापी निदर्शनं कार्यक्रमात मालवणातील वकिलांनी सहभाग घेतला. यावेळी वकिलांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन मालवण दिवाणी न्यायाधीश व मालवण तहसीलदारांना सादर करत मालवण न्यायालयाबाहेर सरकार विरोधात निदर्शन करत आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणाबाजी केली.यामध्ये मालवण तालुका बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. समीर गवाणकर, उपाध्यक्ष अ‍ॅड. हेमेंद्र गोवेकर, अ‍ॅड. गिरीश गिरकर, अ‍ॅड. सतीश धामापूरकर, अ‍ॅड. हर्षद तरवडकर, अ‍ॅड. अमेय कुलकर्णी, अ‍ॅड. अंबरीश गावडे, अ‍ॅड. सुदर्शन गिरसागर, अ‍ॅड. रोहित गरगटे, अ‍ॅड. अक्षय सामंत, अ‍ॅड. सुमित जाधव, अ‍ॅड. अमृता मोंडकर, अ‍ॅड. शिल्पा टिळक, अ‍ॅड. प्राची कुलकर्णी, अ‍ॅड. रश्मी मोंडकर, अ‍ॅड. सोनल पालव, अ‍ॅड. पूनम धुमाळ, अ‍ॅड. निवेदिता मयेकर, अ‍ॅड. मानसी चव्हाण, अ‍ॅड. प्रज्ञा जाधव, अ‍ॅड. स्नेहल यादव, अ‍ॅड. ममता पराडकर आदी वकील सहभागी झाले होते.देशातील वकिल बंधू व भगिनींसाठी केंद्र सरकारने अर्थसंकल्पात कल्याणकारी योजना समाविष्ट न केल्याने सर्व वकील संघांमध्ये सभा बोलावून केंद्र व राज्य सरकारकडे मागण्या मांडाव्यात असा ठराव भारतीय विधिज्ञ परिषदेने घेतला होता. त्यानुसार या देशव्यापी निदर्शन कार्यक्रमात आज मालवण वकील संघाने सहभागी होत आपल्या मागण्यांसाठी मालवण दिवाणी न्यायाधीश व तहसीलदार यांना निवेदने सादर केली.देशातील सर्व बार असोसिएशनमध्ये वकिलांसाठी चेंबर, पुरेशी बिल्डिंग, बसण्याची व्यवस्था, सुसज्ज लायब्ररी, ई- लायब्ररी, इंटरनेट व्यवस्था, शौचालय व्यवस्था, महिला वकिलांसाठी स्वतंत्र बसण्याची व शौचालयाची व्यवस्था व्हावी, वकिलांच्या कुटुंबियांसाठी वैद्यकीय सेवा मिळावी, नवीन नोंदणीकृत वकिलांसाठी मानधन तसेच ज्यांचा वकिली व्यवसाय ५ वर्षांपर्यंत आहे त्यांना महिन्याला कमीत कमी १० हजार रुपये मानधन मिळावे, वकिलांसाठी व त्यांच्या पक्षकारांसाठी नैसर्गिक मृत्यू, अक्षमता किंवा आजारपण व अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळावी, या सर्वांसाठी अर्थसंलकल्पात कल्याणकारी योजनेसाठी रुपये ५ हजार करोडची तरतूद करावी, वकिलांच्या निवासासाठी सरकारने कमीत कमी किंमतीत जागा उपलब्ध करून द्यावी, लिगल सर्व्हिसेस अ‍ॅथोरिटी अ‍ॅक्टमध्ये सुधारणा व दुरुस्ती करावी, निवृत्त न्यायाधीश विविध पदे दिलेल्या सर्व कायद्यात सुधारणा करावी जेणेकरून तेथे सक्षम वकिलांना नेमता येईल अशा विविध मागण्या यावेळी वकिलांनी निवेदनातून केल्या.

सध्या देशात वकिलांना अनेक अडचणींचा सामना करत काम करावे लागत असल्याने शासनाने या मागण्यांकडे लक्ष पुरवावे असे यावेळी मालवण वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. समीर गवाणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :advocateवकिलsindhudurgसिंधुदुर्ग